शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

सुकलेल्या धानाच्या पेंड्यांसह शेतकरी धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2016 00:46 IST

पाऊस चांगला पडल्याने अधिक धान पिकतील या आशेत असलेल्या शेतकऱ्यांना आता मावा तुडतुडा आणि कडा करपाने ग्रासले आहे.

कडा करपा, मावा तुडतुड्याने ग्रासले : हजारो हेक्टरमधील धान सुकलाचंद्रपूर : पाऊस चांगला पडल्याने अधिक धान पिकतील या आशेत असलेल्या शेतकऱ्यांना आता मावा तुडतुडा आणि कडा करपाने ग्रासले आहे. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख हेक्टर धान पीकच या रोगाने नष्ट झाल्याने शेतकरी बेहाल झाला आहे. निसर्गामुळे कोलमडलेल्या या शेतकऱ्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्तवात शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. चक्क त्यांच्या कार्यालयात जावून धानाच्या पेंड्या त्यांना दाखविल्या आणि मदतीची मागणी केली.मागील दोन दिवसांपासून आमदार विजय वडेट्टीवार यांनी मूल, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. सावली तालुक्यातील नऊ गावांमध्ये जावून शेतातील धान पिकाची पहाणी केली. मावा आणि तुडतुड्यांनी हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पिक नष्ट झाल्याचे यावेळी निदर्शास आले. तर धान पिकावर कडा करपा रोग पडल्याने निवसण्याच्या तयारी असलेला धान पूर्णत: सुकून गेल्याचे पहाण्यात आले. शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा धान पिकांवर रोग आल्याने हे शेतकरी कोलमडले आहेत. अधिक प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतातील धान मृतप्राय झाला आहे. त्यामुळे हवालदील झालेल्या सुमारे २०० शेतकऱ्यांना घेऊन आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र प्रशासनाला शेतकरी येणार असल्याची कसलीही कल्पना नव्हती. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या कक्षालगतच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. शेतकऱ्यांसह आमदार आल्याचे कळताच एकच धावपळ उडाली. अखेर बैठक थांबवून आशुतोष सलील यांनी शेतकऱ्यांना आत बोलावून घेतले. सुकलेले धान, करपलेल्या पेंडा, आणि दाणा न भरलेल्या ओंब्या पाहून जिल्हाधिकारीही स्तब्ध झाले. सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले, सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. मुख्यमंत्र्यांनी या समस्येकडे लक्ष देवून एकरी २० हजार रूपयांची मदत द्यावी. खरिप हंगामात सावली तालुक्यातील २४ हजार ९१४ हेक्टर, ब्रह्मपुरीतील २८ हजार ९० हेक्टर, सिंदेवाहीतील १८ हजार ७२५ धान पिकाला बसल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर लोकसभा क्षेत्र युवक कांग्रेस अध्यक्ष शिवा राव, दिनेश चोखारे, रजनी हजारे तसेच शेतकरी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)पंधराशे कोटींच्या विम्याचा लाभच नाहीया वेळी पत्रकारांशी बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली पंतप्रधान पीक विमा योजना बिनकामाची आहे. राज्य सरकारने यासाठी एक हजार ५४० कोटी रूपये रिलायंस कंपनीमार्फत भरून विमा उतरविला आहे. मात्र ६५ टक्के व त्यापेक्षा अधिक पाऊल पडला असल्यास मदत मिळणार नाही, अशी तरतुद आहे. मात्र शेतकऱ्यानां हे माहीत नसल्याने मोठी फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला. खाजगी कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारची ही योजना असल्याचा आरोपही त्यांनी केला.