शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:07 IST

भारतीय शेतकऱ्यांनी हजारो वर्षांपासून शेतीचा विकास करण्यात व धान्याच्या नव्या प्रजाती शोधून काढण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

ठळक मुद्देकिसान दिन : शेतकरी, माजी सैनिक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आॅनलाईन लोकमतकावली (वसाड) : भारतीय शेतकऱ्यांनी हजारो वर्षांपासून शेतीचा विकास करण्यात व धान्याच्या नव्या प्रजाती शोधून काढण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. पूर्वीपासूनच शेतीला मानाचे स्थान असताना आधुनिक काळात ते मागे पडू लागले. शेतीचा विकास व्हावा, असे वाटत असेल तर शेतकऱ्यांनी पुढे यावे, असा सूर धामणगाव तालुक्यातील कावली येथे पार पडलेल्या किसान दिन कार्यक्रमातून शेतकरी व मान्यवरांनी काढला.कावली येथील लाभचंद मुलचंद राठी विद्यामंदिरात लाभचंदजी राठी, श्रीकृष्णदास राठी व चाले गुरूजी यांचा स्मृतीदिन ‘किसान दिन’ म्हणून नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यनारायण टावरी होते.यावेळी राजेश चांडक, प्रा. प्रफुल्ल कडू, सुरेंद्र बहातकर उपस्थित होते. दरम्यान शेतीनिष्ठ शेतकरी रमेश ढोले (कावली), अंबादास पडोळे (गव्हानिपाणी), कांचन ढोमणे (वसाड), जगदीश गोविंदराव महाजन (नारगवंडी) यांचा संस्थेचे सचिव यांनी शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये मोहिनी प्रकाश उईके हिला डॉ. ओंकारदास राठी पुरस्कार, प्रज्ज्वल भूषण पाचकवडे, जयश्री शंकरराव भोंगाडे, दर्शना श्रीधरराव भोंगाडे, श्रेया राजकुमार टाले यांचा गौरव करण्यात आला.यावेळी मुकुंद राठी, राजेश चांडक, प्रफुल्ल कडू, अंबादास पडोळे, जगदीश महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक सिद्धार्थ हेंडवे यांनी केले. संचालन ओंकार उंदरे व रेखा इंगळे यांनी, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक प्रकाश वाहुरवाघ यांनी केले.कार्यक्रमाला श्रीराम पचारे, सुभाषराव मोरे, सुरेश बद्रे, शालिग्राम हिरुळकर, सरपंच नंदा कावरे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी, माता पालक संघ यांच्यासह शेतकरी, पालक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.