शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
4
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
5
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
6
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
7
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
8
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
9
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
10
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
11
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
12
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
13
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
14
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
15
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
16
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
17
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
18
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
19
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपूरक व्यवसायाला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:47 IST

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीचे तंत्र बदलले पाहिजे. शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत तयार करून शासकीय योजनांचा पुरेपुर लाभ घ्यावा.

ठळक मुद्देनरेश पुगलिया : प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी

आॅनलाईन लोकमतराजुरा : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीचे तंत्र बदलले पाहिजे. शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत तयार करून शासकीय योजनांचा पुरेपुर लाभ घ्यावा. आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत करावे व शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य द्यावे, असे मार्गदर्शन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले.राजुरा तालुक्यातील प्रगतशिल शेतकऱ्यांच्या शेतीला त्यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. राजुरा तालुक्यातील उच्चशिक्षित तरुणांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचीे कास धरली व पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीला प्राधान्य दिले. यामुळे मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे. याचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी प्रगतशिल शेतकºयांच्या भेटी घेतल्या व शेतीचे तंत्रज्ञान जाणून घेतले.यात गोवरी येथील रामदास बोथले, पवनी येथील देविदास पडोळे, कापनगाव येथील नंदू रागीट व चनाखा येथील सुहास आसेकर व रिंकु मरस्कोल्हे यांच्या शेतीची पाहणी केली.याप्रसंगी माजी आमदार प्रभाकर मामुलकर, जिल्हा परिषद सदस्य गोदरू पा. जुमनाके, शिवचंद काळे, गजानन गावंडे, देवेंद्र बेले, डॉ. सुरेश महाकुलकर, प्रवीण पडोळे, माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, अशोक नागापूरे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अ‍ॅड. अरुण धोटे, नासीर खान यांची उपस्थिती होती.गोवरी येथील रामदास बोथले यांनी चार एकरात विविध पिकांची लागवड केली आहे. अद्रकच्या शेतीतून मोठा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. पवनी येथील देविदास पडोळे यांनी चार एकरात मागील चार वर्षापासून व्ही.एन.आर. जातीचे पेरू, अ‍ॅपल बोर, सरस्वती सिताफळ, डाळींब लागवड केली आहे. यामुळे कमी जागेत भरपूर उत्पन्न मिळाले आहे. नंदू रागीट यांनी पिझ्झामध्ये वापर होणाऱ्या अ‍ॅल्यपिना जातीची मिरची लागवड केली. चनाखा येथील तरुण शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्र सुरू केले आहे.आधुनिक शेती करताना शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. यासाठी तालुका पातळीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मदत केंद्र उभारले जावे. सुसज्ज माती परीक्षण लॅब, तज्ञ मार्गदर्शकांची चमू, पशुवैद्यकीय अधिकारी यांची सक्षम टीम कार्यरत असणे गरजेचे आहे.- अविनाश जाधवमाजी जि.प. सदस्य.