शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By admin | Updated: October 5, 2014 23:02 IST

‘हत्ती आणि हलक्या प्रतिच्या धानाची माती’ अशी युक्ती ग्रामीण भागात प्रचलित आहे. हस्त या नक्षत्रात हमखास पाऊस पडतो, असे ग्रामीणांचे मत आहे. मात्र, हस्त नक्षत्र लागून आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे.

भारनियमनाचा फटका : पिके करपण्याच्या मार्गावरचंद्रपूर : ‘हत्ती आणि हलक्या प्रतिच्या धानाची माती’ अशी युक्ती ग्रामीण भागात प्रचलित आहे. हस्त या नक्षत्रात हमखास पाऊस पडतो, असे ग्रामीणांचे मत आहे. मात्र, हस्त नक्षत्र लागून आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे. तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे हलक्या तसेच जड प्रतीच्या धानाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. महावितरणच्या भारनियमनाचा सार्वाधीक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कृषी पंपाचा वापर वाढल्याने निर्माण झालेली वीज टंचाईचा कारण समोर करुन महावितरणने जिल्ह्यातील १०३ वाहिन्यांवर भारनियमन सुरु केले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कृषी पंप आहे त्यांनाही शेताला पाणी देण्यास अडचणी येत आहेत. पावसाच्या हुलकावणीमुळे वातावरणातील उष्णता वाढली आहे. परिणामी विजेची मागणीही वाढली आहे. अचानक उद्भवलेल्या परिस्थीमुळे भारनियमन करण्यात येत असल्याचे महावितरनने म्हटले आहे. गेल्या एक महिन्यापासून पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे, धान, सोयाबिन, कपाशी पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अ गटात ३२ विजवाहिन्या, बी गटात ३६, सी गटात ६, डी गटात ६१२, इ गटात ५, एफ गटात ८ तर जी गटात १० विजवाहिन्या आहेत. यामध्ये अ गटातील वीज वाहिन्यांवर ३५ मिनिट, बी गटात ४५ मिनिट, सी गटात ४ तास ४५ मिनिट, तर डी गटातील विज वाहिनीवर ३० मिनिटाचे भारनियमन करण्यात येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)