शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

पाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By admin | Updated: October 5, 2014 23:02 IST

‘हत्ती आणि हलक्या प्रतिच्या धानाची माती’ अशी युक्ती ग्रामीण भागात प्रचलित आहे. हस्त या नक्षत्रात हमखास पाऊस पडतो, असे ग्रामीणांचे मत आहे. मात्र, हस्त नक्षत्र लागून आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे.

भारनियमनाचा फटका : पिके करपण्याच्या मार्गावरचंद्रपूर : ‘हत्ती आणि हलक्या प्रतिच्या धानाची माती’ अशी युक्ती ग्रामीण भागात प्रचलित आहे. हस्त या नक्षत्रात हमखास पाऊस पडतो, असे ग्रामीणांचे मत आहे. मात्र, हस्त नक्षत्र लागून आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे. तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे हलक्या तसेच जड प्रतीच्या धानाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. महावितरणच्या भारनियमनाचा सार्वाधीक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कृषी पंपाचा वापर वाढल्याने निर्माण झालेली वीज टंचाईचा कारण समोर करुन महावितरणने जिल्ह्यातील १०३ वाहिन्यांवर भारनियमन सुरु केले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कृषी पंप आहे त्यांनाही शेताला पाणी देण्यास अडचणी येत आहेत. पावसाच्या हुलकावणीमुळे वातावरणातील उष्णता वाढली आहे. परिणामी विजेची मागणीही वाढली आहे. अचानक उद्भवलेल्या परिस्थीमुळे भारनियमन करण्यात येत असल्याचे महावितरनने म्हटले आहे. गेल्या एक महिन्यापासून पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे, धान, सोयाबिन, कपाशी पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अ गटात ३२ विजवाहिन्या, बी गटात ३६, सी गटात ६, डी गटात ६१२, इ गटात ५, एफ गटात ८ तर जी गटात १० विजवाहिन्या आहेत. यामध्ये अ गटातील वीज वाहिन्यांवर ३५ मिनिट, बी गटात ४५ मिनिट, सी गटात ४ तास ४५ मिनिट, तर डी गटातील विज वाहिनीवर ३० मिनिटाचे भारनियमन करण्यात येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)