शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची कर्नाटक, तेलंगणात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 02:27 IST

महाराष्ट्रात बियाणांचे दर दुप्पट वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी स्वत: बियाणे घेण्यासाठी कर्नाटक व तेलंगाणा राज्यात धाव घेत आहेत.

महागाईचा वरवंटा : बियाणांच्या किमतीत झाली दुप्पट वाढसंतोष कुंडकर/जयंत जेनेकर चंद्रपूर/कान्हळगाव (कोरपना) :महाराष्ट्रात बियाणांचे दर दुप्पट वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी स्वत: बियाणे घेण्यासाठी कर्नाटक व तेलंगाणा राज्यात धाव घेत आहेत. शेतकरी एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसत असताना दुसरीकडे बियाण्यांच्या दरवाढीने शेतकऱ्यांचे अवसानच गळाले आहे. यंदाचा खरीपाचा हंगाम साधण्यासाठी शेतकरी परराज्यातून बियाणे खरेदी करणे पसंत करीत आहेत. जिल्ह्यात कापूस उत्पादक क्षेत्र असलेल्या कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, जिवती तालुक्यात शेतकरी बियाणांचे दर कमी असल्याने कर्नाटकातील बिदर व तेलंगाणातील बेला, आदिलाबाद, निर्मल बाजारपेठेकडे वळले आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदा बि-बियाणे, किटकनाशके यांच्या किंमतीत ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मागील हंगामात शेतकऱ्यांना उत्पादन झाले असले तरी उत्पादनाला आवश्यक तेवढा भाव मिळाला नाही. त्यातून त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे ठाकले. कर्जाच्या वाढत्या बोझ्यामुळे व बँकांच्या तगाद्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. उत्पादनापेक्षा खर्च अधिक, अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. बँकांकडून ३१ जुलैपर्यत कर्जाचे वाटप केले जाणार आहे. मात्र पावसाचे आगमन होण्याची चिन्हे असल्याने शेतकऱ्यांनी उसणवारी व प्रसंगी खासगी सावकाराकडून हंगामसाठी पैसे घेतले आहेत. या पैशातून बि-बियाणे व खते खरेदी करण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहेत. अशातच राज्यात ‘महाबीज’ च्या बियाणांची दरवाढ घोषित झाल्याने शेतकरी हादरून गेला आहे. बियाणांच्या वाढलेल्या दरामुळे पारंपरिक कृषी बाजारपेठांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. थोड्याफार पैशांची बचत होईल, या आशेनं शेतकरी बियाणे खरेदीसाठी तेलंगणा व कर्नाटक राज्याची वाट धरीत आहेत. हे शेतकरी आदिलाबाद, नांदेड मार्गे कर्नाटकातील बिदर येथे पोहचत आहेत.