शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:28 IST

नागभीड : तालुक्यात पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार रुपये जमा करून शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली आहे. ...

नागभीड : तालुक्यात पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार रुपये जमा करून शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली आहे. ही रक्कम बघून भीक नको पण कुत्रा आवर, असे म्हणण्याची पाळी आली आहे.

गत हंगामाचा विचार केला तर अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांनी तालुक्यातील धान पीक पुरते नेस्तनाबूत झाले. प्रत्येक गावातील जाहीर करण्यात आलेली शासकीय पैसेवारीही ५० टक्क्यांच्या आत आहे. तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार रुपयांची रक्कम टाकून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा उपमर्द केल्याची भावना शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे.

नागभीड तालुक्यात धानाचे एकमेव पीक घेतले जाते. एकूण क्षेत्रफळापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात हे पीक घेण्यात येते. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने हे पीक घेण्यासाठी शेतकरी गावातील सेवा सहकारी आणि आदिवासी विविध कार्यकारी संस्था या सोसायट्यांमार्फत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्जाची उचल करीत असतात. हे कर्ज उचलत असताना कर्जाऊ रकमेतून जिल्हा मध्यवर्ती बँक पीक विम्याचा प्रती एकरी ३५० रुपये हप्ता कपात करून विमा कंपनीकडे हप्त्याची रक्कम जमा करीत असते. अशीच पद्धत इतर राष्ट्रीयीकृत बँकाही अवलंबत असतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेचाच विचार करता ही बँक दरवर्षी सहा ते सात हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देत असल्याची माहिती आहे. काही शेतकरी वैयक्तिकरीत्याही आपल्या शेतीचा पीक विमा काढत असतात, असेही शेतकरी शेकडोच्या घरांत आहेत.

गत हंगामात नागभीड तालुक्यात धानावर अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर मावा, तुडतुडा, करपा यासारख्या विविध रोगांनी धान पीक पार नेस्तनाबूत केले. मळणीनंतर दर एकरी पाच-सहा पोती उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातात आले होते. या उत्पन्नाने शेतकरी पार हादरून गेले होते. म्हणूनच शेतकऱ्यांकडून पीक विम्याची मागणी करण्यात येत होती. आता नुकतीच या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम टाकणे सुरू केले आहे. तालुक्यांतर्गत येनोली येथील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम आली आहे. ही रक्कम बघून शेतकऱ्यांच्या अंगाचा तिळपापड होत आहे.

कोट

येनोली येथे शेतकऱ्यांच्या खात्यांवर विमा कंपन्यांनी केवळ एक हजार रुपये जमा केले आहेत. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच नाही तर विमा कंपनीने ही रक्कम जमा करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. त्यापेक्षा ही रक्कम दिली नसती तरी बरे झाले असते.

- अमोल बावणकर, सरपंच येनोली