शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:28 IST

नागभीड : तालुक्यात पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार रुपये जमा करून शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली आहे. ...

नागभीड : तालुक्यात पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार रुपये जमा करून शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली आहे. ही रक्कम बघून भीक नको पण कुत्रा आवर, असे म्हणण्याची पाळी आली आहे.

गत हंगामाचा विचार केला तर अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांनी तालुक्यातील धान पीक पुरते नेस्तनाबूत झाले. प्रत्येक गावातील जाहीर करण्यात आलेली शासकीय पैसेवारीही ५० टक्क्यांच्या आत आहे. तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार रुपयांची रक्कम टाकून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा उपमर्द केल्याची भावना शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे.

नागभीड तालुक्यात धानाचे एकमेव पीक घेतले जाते. एकूण क्षेत्रफळापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात हे पीक घेण्यात येते. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने हे पीक घेण्यासाठी शेतकरी गावातील सेवा सहकारी आणि आदिवासी विविध कार्यकारी संस्था या सोसायट्यांमार्फत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्जाची उचल करीत असतात. हे कर्ज उचलत असताना कर्जाऊ रकमेतून जिल्हा मध्यवर्ती बँक पीक विम्याचा प्रती एकरी ३५० रुपये हप्ता कपात करून विमा कंपनीकडे हप्त्याची रक्कम जमा करीत असते. अशीच पद्धत इतर राष्ट्रीयीकृत बँकाही अवलंबत असतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेचाच विचार करता ही बँक दरवर्षी सहा ते सात हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देत असल्याची माहिती आहे. काही शेतकरी वैयक्तिकरीत्याही आपल्या शेतीचा पीक विमा काढत असतात, असेही शेतकरी शेकडोच्या घरांत आहेत.

गत हंगामात नागभीड तालुक्यात धानावर अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर मावा, तुडतुडा, करपा यासारख्या विविध रोगांनी धान पीक पार नेस्तनाबूत केले. मळणीनंतर दर एकरी पाच-सहा पोती उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातात आले होते. या उत्पन्नाने शेतकरी पार हादरून गेले होते. म्हणूनच शेतकऱ्यांकडून पीक विम्याची मागणी करण्यात येत होती. आता नुकतीच या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम टाकणे सुरू केले आहे. तालुक्यांतर्गत येनोली येथील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम आली आहे. ही रक्कम बघून शेतकऱ्यांच्या अंगाचा तिळपापड होत आहे.

कोट

येनोली येथे शेतकऱ्यांच्या खात्यांवर विमा कंपन्यांनी केवळ एक हजार रुपये जमा केले आहेत. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच नाही तर विमा कंपनीने ही रक्कम जमा करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. त्यापेक्षा ही रक्कम दिली नसती तरी बरे झाले असते.

- अमोल बावणकर, सरपंच येनोली