शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळे शेतकरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राच्या माहितीनुसार, जून महिन्यात विविध भागात पाऊस बरसणार आहे.  शिवाय यंदाचा मान्सून सरासरीच्या १०१ टक्के असेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला. दरम्यान पुणे वेधशाळेनेही विदर्भात पुढचे  चार दिवस मान्सूनपूर्व पावसाचे असल्याची शक्यता वर्तविली आहे.  यामुळे शेतकºयांनी शेतमालाची काळजी घ्यावी अशाही सूचना दिल्या आहेत. 

ठळक मुद्देहवामान स्थिती पोषक : चार लाख ८२ हजार ८८ हेक्टरवर लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केरळमध्ये गुरुवारी मान्सूनचे आगमन झाले. त्यामुळे राज्यात येत्या चार-पाच दिवसात आगमनाचे संकेत मिळत आहेत. दरम्यान शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी दिली.  मोसमी वाऱ्यांची वाटचाल अशीच कायम राहिल्यास मान्सूनचा पाऊस जिल्ह्यातील कृषी व्यवस्थेला नवीन संजीवनी देऊ शकतो. यंदा चार लाख ८२ हजार ८८ हेक्टरवर होणार खरीप लागवडीचे नियोजन  करण्यात आले आहे.भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राच्या माहितीनुसार, जून महिन्यात विविध भागात पाऊस बरसणार आहे. शिवाय यंदाचा मान्सून सरासरीच्या १०१ टक्के असेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला. दरम्यान पुणे वेधशाळेनेही विदर्भात पुढचे  चार दिवस मान्सूनपूर्व पावसाचे असल्याची शक्यता वर्तविली आहे.  यामुळे शेतकºयांनी शेतमालाची काळजी घ्यावी अशाही सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात चार दिवसांपासून दररोज सायंकाळी  ढगाळ वातावरण तयार होत आहे. रात्रीचे तापमानही आता कमालीचे खाली घसरले. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी दिली. शेतकरी आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला. मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाने उकाडाही कमी झाला आहे. 

बियाण्यांबाबत व्हॉट्‌स अ‍ॅपवर करता येणार तक्रारखरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मान्सूनचे आगमन झाल्यास कृषी निविष्ठा खरेदीसाठी बाजारात वर्दळ वाढेल. अशावेळी विक्रेते शेतकऱ्यांकडून जादा रकम वसूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी आयुक्तांच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना तक्रारी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. कृषी निविष्ठांसाठी जादा रक्कम घेतल्यास शेतकऱ्यांनी व्हॉट्‌स अ‍ॅपवर व कृषी विभागाच्या ई-मेलवर पुराव्यांसह तक्रारी करता येणार आहेत.

बीटी कपाशीची नऊ लाख ८६ हजार पाकिटेजिल्ह्यात यंदा कापूस व सोयाबीन लागवड क्षेत्र वाढणार आहे. यासाठी कृषी विभागाने बीटी कपाशीच्या नऊ लाख ८६ हजार पाकिटांची मागणी कृषी संचालकांकडे नोंदविली आहे.याशिवाय भात २ हजार ८०० क्विंटल, तूर २ हजार ८०० क्विंटल, सोयाबीन ३१ हजार ४४३ क्विंटल बियाणे जिल्ह्यासाठी मागविण्यात आले. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने शेतकरी पेरणीपूर्व कामांसाठी लगबग करीत असल्याचे दिसून येत आहे

बियाणे बाजारपेठ संशयाच्या भोवऱ्यात

बियाणे कायदा १९६६ अनुसार, कोणतेही बियाणे विकताना शेतकऱ्यांकडून हमीपत्र भरून घेण्यास मनाई आहे. मात्र काही विक्रेते अशा प्रकारचे हमीपत्र भरून घेण्यास शेतकऱ्यांना तगादा लावत असल्याची माहिती. ७० टक्क्यांपेक्षा कमी उगवण क्षमता असणारे बियाणे विकता येत नाही. जादा नफा मिळविण्याच्या हव्यासात विक्रेते काही कंपन्यांकडून बियाणे खरेदी करतात. शेतकऱ्यांना हे बियाणे विकताना हमीपत्र भरून घेण्याचा आग्रह करीत आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही. पण, विशेषत: सोयाबीन बियाणे बाजारपेठ संशयाच्या भोवऱ्यात आहे. कृषी विभागाने विक्रेत्यांची चौकशी करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आता शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. यावर्षी बियाण्यांची टंचाईदेखील होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती