शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

रात्री पिकाला पाणी देणे शेतकऱ्याच्या जिवावर बेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : तालुक्यातील महालगाव येथील एका शेतकऱ्याचा रात्री पिकांना पाणी देत असताना करंट लागून मृत्यू झाला. ...

ठळक मुद्देविद्युत धक्क्याने मृत्यू : महावितरणचा कारभार दोषी असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तालुक्यातील महालगाव येथील एका शेतकऱ्याचा रात्री पिकांना पाणी देत असताना करंट लागून मृत्यू झाला. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळेच तरुण शेतकऱ्याचा बळी गेल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला असून दोषीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी मृतदेह वरोरा येथील महावितरणच्या कार्यालयाच्या दालनात ठेवला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.वसंता नामदेव जांभुळे (३४) रा.महालगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वसंता जांभुळे हा गुरुवारी रात्री २ वाजताच्या सुमारास गावापासून दोन किलोमीटरवर असलेल्या आपल्या शेतामध्ये मोटारपंपद्वारे पिकांना पाणी देण्यासाठी गेला असता विजेचा धक्का बसला. उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वरोरा येथील महावितरण कार्यालयाच्या दालनात शेतकºयाचा मृतदेह ठेवल्याने तणाव निर्माण झाला. सदर शेतकºयाचा मृत्यू हा महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे झाला असल्याचा आरोप मृत शेतकऱ्याच्या वडिलांनी केला. यावेळी उपसभापती राजू चिकटे व शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश भालेराव, मनोज दानव, नगरसेवक पंकज नाशिककर, सन्नी गुप्ता, दिनेश यादव आदी उपस्थित होते.आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागेमुख्य कार्यकारी अभियंता हे पोलीस बंदोबस्तात महावितरण कार्यालयात आले असता उपस्थित शेतकºयांनी त्यांच्या विरोधात नारेबाजी करीत आपला संतात व्यक्त केला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी मान्य केली असून अंतविधीसाठी २० हजार रुपयांचा धनादेश मृतकाच्या कुटुंबीयांना दिला आहे. तसेच सदर घटनेचा तपास केल्यानंतर आलेल्या अहवालानुसार उर्वरित चार लाख रुपयांची मदत केली जाईल, असे अभियंता प्रशांत राठी यांनी सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.शासकीय आदेशाला केराची टोपलीमागील काही दिवसांपासून भारनियमन बंद करण्यासाठी विविध पक्षाने आंदोलन केली. त्यानंतर अध्यक्ष तथा वयवस्थापकीय संचालक महावितरण यांनी परिपत्रक काढून १ नोव्हेंबरपासून दिवसा थ्री फेज वीजपुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र वरोºयात तसे करण्यात आले नाही.