शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

रबीसाठी शेतकरी सावकाराच्या दारी

By admin | Updated: November 8, 2014 01:05 IST

दिवाळीपूर्वी कापसाची विक्री करून शेतकरी रबीच्या तयारीला लागत होते. मात्र यावर्षी वरुणराजाच्या...

चंद्रपूर : दिवाळीपूर्वी कापसाची विक्री करून शेतकरी रबीच्या तयारीला लागत होते. मात्र यावर्षी वरुणराजाच्या वक्रदृष्टीने शेतकऱ्यांना यंदा मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कापूस संकलन केंद्र अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे कापूस शेतकऱ्यांच्या घरीच आहे. रबीची तयारी म्हटले की, पुन्हा पैसे लागणार आहे. त्यामुळे शेतकरी बँक, सावकारांच्या घरच्या चकरा मारत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस दिवाळीपूर्वीपासून निघून घरी पडलेला आहे. कापूस संकलन केंद्र सुरू न झाल्ळाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे दिवाळी अंधारात गेली. रब्बी पिकांच्या पेरण्यासाठी बियाणे घ्यायला देखील त्यांच्याकडे पैसे नाही. त्यामुळे तातडीने कापूस संकलन केंद्र सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वरोरा विधानसभा अध्यक्ष प्रशांत काळे यांनी केली आहे.शेतकरी आपली जमापुंजी लावून शेतात राबराव राबतो. पीक घेतो पण, ते पीक विकायची वेळ आल्यावर सरकार खरेदी केंद्र सुरू करीत नाही. परिणामी दिवाळी पूर्वीपासून कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडला आहे. पैसे हातात न आल्यामुळे यावेळी बाजारही थंंडाच होता. याचा परिणाम व्यापारावही झाला. अनेकांना अंधारातच दिवाळी साजरी करावी लागली. जनतेच्या अपेक्षा घेऊन नवीन सरकार स्थापन झाले. सरकार स्थापनेच्या जल्लोषात व्यस्त आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)