शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मेहनतीला मोल नाही

By admin | Updated: November 13, 2015 01:14 IST

प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या राज्यवस्थेनेच अकुशल व अडाणी ठरविले आहे. त्यांच्या मेहनतीचे मोल इतकी कमी केले की, त्यात ते धड पोटही भरु शकत नाहीत.

गेवरा: प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या राज्यवस्थेनेच अकुशल व अडाणी ठरविले आहे. त्यांच्या मेहनतीचे मोल इतकी कमी केले की, त्यात ते धड पोटही भरु शकत नाहीत. मग इतर गरजा भागविणे तर दूरच. त्यांचा कच्चा माल मातीमाल विकावा लागतो. तोच माल शहरातील कारखान्यात पक्का झाला म्हणजे त्यांना तोच चौपट भावाने विकत घ्यावा लागतो. त्यामुळे शेतकरी राजा कसा सुखी होईल? असा सवाल ग्रामगिताचार्य नारखेडे दादा यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी ‘लोकमत’शी बातचीत करताना बोलत होते.शेतकरी श्रम करून शेती पिकवितात. परंतु त्यांच्याच नशिबी उपाशी राहण्याची वेळ येते. त्यामुळे जगण्यासाठी त्यांना सतत कर्ज काढावे लागते. कर्ज काढून केलेल्या शेतीवर निसर्गाचाही कोप येतो. त्यामुळे जे कर्जाचे व्याजही भरु शकत नाहीत. शेती विकूनही ते कर्ज फेडू शकत नाही, असे ते म्हणाले.शासनाकडून शेतकऱ्यांसाठी शेती साहित्य, खते बियाणांसाठी अनुदानावर अनेक योजना राबविल्या जातात. त्या मिळविण्यासाठी व घरापर्यंत आणण्यासाठी त्यांना शेतीची कामे सोडून प्रवास, वेळ खर्च करुन शासकीय कार्यालयाकडे चकरा माराव्या लागतात. कर्मचाऱ्यांची हाजी हाजी करावी लागते. प्रत्येक कामासाठी लाच घेतल्याशिवाय शेतकऱ्यांची कामे वेळवर होत नाहीत. अशा अनेक कारणांनी शेतकऱ्यांना आर्थिक गुलामगिरी व निसर्गाचा फटका सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांना आत्महत्तेशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. हे महाभयंकर पाप राज्यवस्थेकडून होत असल्याचे दादा म्हणाले. आता तर पैशाअभावी आधुनिक पद्धतीने शेती उत्पादन करु शकत नाही. त्यामुळे शेती सोडून ती भांडवलदारांकडे द्या, असा उरफाटा सल्ला शेतकऱ्यांना दिला जात आहे. भांडवलदारांकडे शोषणाचा इतका अमाप पैसा आहे की, शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही, असे सांगून ेमनमानी भावाने त्यांच्या शेती खरेदी केल्या जात आहे. या चक्रात शेतकरी अडकत चालला आहे. शेती परवडत नाही म्हणून पैशाचे लोभाने शेतकरी सर्रास शेती विकत आहे. शेतकऱ्यांजवळ आलेला पैसा भांडवलदारांकडे परत येईल. अशा अनेक योजना भांडवलदाराकडे आहेतच. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीही जाणार व पैसाही जाणार शेतीचे सर्व श्रमावर आधारीत धंदे यंत्रावर होवू लागल्यामुळे तेही भांडवलदाराकडे गेले. त्यामुळे सर्व शेतकरी व श्रमिकांच्या हाताला कामच राहिले नाही, आता शेतकऱ्यांसहीत श्रमजीवी समाजाला स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी लाचारी पत्करावी का? असा सवालही नारखेडे दादा यांनी यावेळी उपस्थित केला. (वार्ताहर)