शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

शेतकऱ्यांच्या मेहनतीला मोल नाही

By admin | Updated: November 13, 2015 01:14 IST

प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या राज्यवस्थेनेच अकुशल व अडाणी ठरविले आहे. त्यांच्या मेहनतीचे मोल इतकी कमी केले की, त्यात ते धड पोटही भरु शकत नाहीत.

गेवरा: प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या राज्यवस्थेनेच अकुशल व अडाणी ठरविले आहे. त्यांच्या मेहनतीचे मोल इतकी कमी केले की, त्यात ते धड पोटही भरु शकत नाहीत. मग इतर गरजा भागविणे तर दूरच. त्यांचा कच्चा माल मातीमाल विकावा लागतो. तोच माल शहरातील कारखान्यात पक्का झाला म्हणजे त्यांना तोच चौपट भावाने विकत घ्यावा लागतो. त्यामुळे शेतकरी राजा कसा सुखी होईल? असा सवाल ग्रामगिताचार्य नारखेडे दादा यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी ‘लोकमत’शी बातचीत करताना बोलत होते.शेतकरी श्रम करून शेती पिकवितात. परंतु त्यांच्याच नशिबी उपाशी राहण्याची वेळ येते. त्यामुळे जगण्यासाठी त्यांना सतत कर्ज काढावे लागते. कर्ज काढून केलेल्या शेतीवर निसर्गाचाही कोप येतो. त्यामुळे जे कर्जाचे व्याजही भरु शकत नाहीत. शेती विकूनही ते कर्ज फेडू शकत नाही, असे ते म्हणाले.शासनाकडून शेतकऱ्यांसाठी शेती साहित्य, खते बियाणांसाठी अनुदानावर अनेक योजना राबविल्या जातात. त्या मिळविण्यासाठी व घरापर्यंत आणण्यासाठी त्यांना शेतीची कामे सोडून प्रवास, वेळ खर्च करुन शासकीय कार्यालयाकडे चकरा माराव्या लागतात. कर्मचाऱ्यांची हाजी हाजी करावी लागते. प्रत्येक कामासाठी लाच घेतल्याशिवाय शेतकऱ्यांची कामे वेळवर होत नाहीत. अशा अनेक कारणांनी शेतकऱ्यांना आर्थिक गुलामगिरी व निसर्गाचा फटका सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांना आत्महत्तेशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. हे महाभयंकर पाप राज्यवस्थेकडून होत असल्याचे दादा म्हणाले. आता तर पैशाअभावी आधुनिक पद्धतीने शेती उत्पादन करु शकत नाही. त्यामुळे शेती सोडून ती भांडवलदारांकडे द्या, असा उरफाटा सल्ला शेतकऱ्यांना दिला जात आहे. भांडवलदारांकडे शोषणाचा इतका अमाप पैसा आहे की, शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही, असे सांगून ेमनमानी भावाने त्यांच्या शेती खरेदी केल्या जात आहे. या चक्रात शेतकरी अडकत चालला आहे. शेती परवडत नाही म्हणून पैशाचे लोभाने शेतकरी सर्रास शेती विकत आहे. शेतकऱ्यांजवळ आलेला पैसा भांडवलदारांकडे परत येईल. अशा अनेक योजना भांडवलदाराकडे आहेतच. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीही जाणार व पैसाही जाणार शेतीचे सर्व श्रमावर आधारीत धंदे यंत्रावर होवू लागल्यामुळे तेही भांडवलदाराकडे गेले. त्यामुळे सर्व शेतकरी व श्रमिकांच्या हाताला कामच राहिले नाही, आता शेतकऱ्यांसहीत श्रमजीवी समाजाला स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी लाचारी पत्करावी का? असा सवालही नारखेडे दादा यांनी यावेळी उपस्थित केला. (वार्ताहर)