शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मूल उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: February 4, 2016 01:04 IST

बी-बियाणे, खत, कीटकनाशके, शेतमजुरांची मजुरी दहा पट वाढलेली असतानाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळालेला नाही, ...

विविध मागण्या : बैलबंडीसह सहभाग, सर्वपक्षीय नेते एकवटलेमूल : बी-बियाणे, खत, कीटकनाशके, शेतमजुरांची मजुरी दहा पट वाढलेली असतानाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळालेला नाही, त्यामुळे शासनाने आधी स्वामीनाथन आयोग लागू करावा. नंतरच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सातवा वेतन लागू करण्याचा विचार करावा. यासह विविध मागण्यासाठी बुधवारी मूल तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील तहसील कार्यालयावर स्वयंस्फूर्तीने बैलबंडी मोर्चा काढला. मोर्चाकऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांना दिले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून निघालेल्या मोर्च्यात शेकडो बैलबंडीसह शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व मूल तालुका धान उत्पादक परिषदेचे अध्यक्ष श्यामराव मोहुले यांनी केले. शेतकऱ्यांप्रती शासनाच्या अन्यायकारक धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे कुटुंबाचा व्यवस्थित उदरनिर्वाह करू शकत नाही. शेती उत्पादन खर्चापेक्षा लागत जास्त असल्यामुळे शेती करावी की नाही, अशा द्विधा मनस्थितीत आता शेतकरी आपले जीवन जगत आहेत. २०१४ पेक्षाही तीव्र दुष्काळ असताना शासनाकडून कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शासनकर्त्यांना आपल्यावरील अन्यायाचा जाब विचारण्यासाठी बैलबंडी मोर्चा काढला. या मोर्चात शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकीय भेद विसरून सर्व पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आल्याने या मोर्चाला सर्वपक्षीय स्वरूप आले होते. शेतकऱ्यांवरील सततच्या अन्यायाविरूद्ध शासनाचा निषेध नोंदवीत मोर्चेकरी शेतकऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार चंदावार यांचेकडे सुपूर्द केले. शेतकऱ्यांनी शासनाला सादर केलेल्या मागण्यांमध्ये विदर्भाचे स्वतंत्र राज्य करण्यात यावे, सातवा वेतन व आमदार खासदाराचे मानधनात वताढ करण्यापुर्वी शेतकऱ्यांचा स्वामीनाथन आयोग लागू करा, धानाला ३५०० रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्या, चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून दुष्काळी मदत द्या व शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे पैसे द्या, शेतकऱ्यांच्या शेतमाल निर्यातबंदी मुक्त करा, शेतीला उद्योगाचा दर्जा देवून शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीवर आधारीत कुक्कुटपालन, दुग्धपालन व्यवसाय करण्यासाठी खासगी कंपन्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाप्रमाणे अनुदान देण्यात यावे, निवृत्तीवेतन १० हजार रुपये देण्यात यावे, गाव पातळीवर प्रत्येक गावाची वेगवेगळी आणेवारी करण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश होता.सदर मोर्च्यात शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, मूल पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य संजय पाटील मारकवार, युवक बिरादरीचे संघटनेचे अध्यक्ष कवडु येनप्रेड्डीवार, ओमदेव मोहुर्ले, नितेश येनप्रेड्डीवार, अरविंद चिंतावार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक धनंजय चिंतावार, संदीप कारमवार, धान उत्पादक शेतकरी संघटनेचे सचिव विवेक मांदाडे, संजय कुंटावार, वसंत पेटेवार, अशोक मार्गनवार, प्रकाश खोब्रागडे यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)