शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची पायपीट

By admin | Updated: May 11, 2015 01:04 IST

जिवती तालुक्याचा बळीराजा आधीच अस्मानी संकटांनी हैरान असताना शासनातर्फेही त्यांची थट्टाच सुरु असल्याचे चित्र जिवती तालुक्यात दिसत आहे.

पाटण : जिवती तालुक्याचा बळीराजा आधीच अस्मानी संकटांनी हैरान असताना शासनातर्फेही त्यांची थट्टाच सुरु असल्याचे चित्र जिवती तालुक्यात दिसत आहे.तालुक्यात पावसाच्या लहरीपणामुळे गेल्या हंगामात शेतकऱ्यांना कापसाच्या उत्पन्न एकरी दोन ते तीन क्विंटल झाले. यातही अनेक शेतकऱ्यांनी समाधान मानून घेतले. मात्र यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यात शासनातर्फे शेतकऱ्यांना दोन हेक्टरवरील पट्टेधारकाला चार हजार पाचशे तर दोन हेक्टरच्या आतील पट्टेधारक शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये याप्रमाणे अपुरे पण काहीतरी मदत देण्यात आली. परंतु जिवती तालुक्यात अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे व बँकांच्या उदासीनपणामुळे ५० टक्के शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कोणतीच मदत मिळालेली नाही. यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आले असून बँक व तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. जिवतीचे तहसीलदार यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपण सुटीवर असल्याचे उत्तर देऊन बोलण्यास नकार दिला.शासन व शासनाच्या या अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे जगावे की मरावे, असा प्रश्न पडला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी जिवती तालुक्यातून होत आहे. (वार्ताहर)