: केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरीविरोधी कायद्यांच्या विरुद्ध दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. यावर विचार करण्यासाठी शेतकरी शेतमजूर महासंघाची सभा महासंघचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत कार्याध्यक्ष अरविंद जयस्वाल यांनी आंदोलनास पाठिंबा देण्याचा प्रस्ताव मांडला.
केंद्र सरकारने मंजूर केलेले तीनही कृषी कायदे काॅर्पोरेट व धनाढ्य उद्योगपतींच्या फायद्यासाठी असून शेतकरी या कायद्यामुळे देशोधडीला लागणार आहे. हे जाचक कायदे मागे घेण्यासाठी व शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी शेतकरी मुलाबाळांसह आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला शेतकरी शेतमजूर महासंघाने जाहीर पाठिंबा व्यक्त केला. सभेला प्रामुख्याने अशोक तुम्मे, माधव आदे, अशोक सागुळले, वामन कोकोडे, नामदेव वरकडवार, श्यामसुंदर बनसोड, अण्णा कामडी, अब्दुल हक, जानकीराम वाघमारे, भगवान धात्रक, लोकमित्र गेडाम, ऋषी लोखंडे, अजय कोलप्याकवर, बाबुराव गेडाम, प्रकाश सहारे, ईश्वर शेंडे, विनायक कावळे, राजेंद्र पशिने, अरुण कोलते, यादव पाटील, सुधाकर चंदन खेडे, चिंतामण ठिकरे, गणपत मस्के, प्रणिता रामटेके, लता गेडाम, सोमा भरडकर, नथ्यू ठाकरे, राजेश्वर साहारे, उकाजी दांडवे, राजू ताडाम, चंद्रशेखर चान्ने, मुखरू बनसोड, वासुदेव पाटील, रवी बोरकर उपस्थित होते.