शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:32 IST

आजपासून मृग नक्षत्राची सुरुवात होत असली तरी पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वाढत्या तापमानाने शेतकरीवर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असून आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्देपेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण : मृग नक्षत्राला प्रारंभ, पण पावसाचा पत्ता नाही

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : आजपासून मृग नक्षत्राची सुरुवात होत असली तरी पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वाढत्या तापमानाने शेतकरीवर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असून आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.शेतकरी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडयापासून शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकण्यात व्यस्त असतो. यावेळी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली. सूर्याचा पारा सातत्याने ४५ अंशापार जात राहिला. तरीही शेतकऱ्यांनी उसंत घेतली नाही. परंतु यावर्षी मृग नक्षत्र लागला तरी पावसाने अद्यापही हजेरी न लावल्याने तापमान कमी होण्याऐवजी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. २५ मेपासून रोहिणी नक्षत्रास प्रारंभ झाला. परंतु सदर नक्षत्र अत्यंत तप्त आणि कोरडा गेल्याने आजपासून लागणाऱ्या मृग नक्षत्राकडे शेतकºयांच्या नजरा लागून आहेत. आतातरी पाऊस येईल या आशेने शेतकरी आकाशाकडे टक लावून बघत आहे. परंतु आकाश निरभ्र दिसत असून सूर्याचे आग ओकणेही सुरूच आहे, त्यामुळे शेतकरी काहिसा चिंताग्रस्त झाला आहे. रोहिणी नक्षत्राने शेतकºयांना हुलकावणी दिल्याने तसेच उन्हाचा तडाखा अजूनही सुरूच असल्याने पुढे कशी स्थिती राहील, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.पूर्वीच्या काळी शेतकरी घरातील पारंपरिक बि-बियाण्यांचा वापर करीत असे. परंतु बदलत्या काळाच्या ओघात काही वर्षांपासून पेरणीसाठी संकरित बि-बियाण्यांचा वापर करीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून सध्या बि-बियाणे, खते यांची जमवाजमव सुरू असून आवश्यक तयारीत शेतकरी गुंतला आहे. तालुक्यात सर्वत्र भातपिकाचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. भात पेरणीपूर्वी मशागतीसाठी बहुसंख्य शेतकरी ट्रॅक्टर, पॉवर ट्रील यांना प्राधान्य देत असतात. या यंत्राद्वारे मशागतीची कामे पूर्ण झाली असून पावसाची प्रतीक्षा आहे.उन्हाळी पीक निघालेब्रह्मपुरी तालुक्यात अनेक शेतकºयांनी उन्हाळी धान पिकांची लागवड केली होती. आता हा हंगाम संपला असून अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पीक काढले आहे. आता हेच शेतकरी पुन्हा खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. मात्र शेतकºयांना आता पावसाची प्रतीक्षा आहे.कृषी केंद्र ओसमृग नक्षत्र लागूनही पावसाचा अजूनही थांगपत्ता नसल्याने तसेच पावसाचे कुठलेही लक्षण दिसत नसल्याने शेतकºयांनी बि-बियाण्यांच्या व खतांच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे तालुक्यातील कृषी केंद्रे ओस पडली आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती