शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

‘किसान ॲप’पासून जिल्ह्यातील शेतकरी अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:32 IST

चंद्रपूर : संगणकीय युग आले असले तरी आजही ग्रामीण भागामध्ये वातावरणातील बदलाबाबत पाहिजे तशी शेतकऱ्यांना माहितीच होत नसल्याचे चित्र ...

चंद्रपूर : संगणकीय युग आले असले तरी आजही ग्रामीण भागामध्ये वातावरणातील बदलाबाबत पाहिजे तशी शेतकऱ्यांना माहितीच होत नसल्याचे चित्र आहे. त्यातच कृषी विभागाचे असलेले किसान ॲपबाबतही अनेकांना माहिती नाही. त्यामुळे कृषी विभागाने अधिक गतीने जनजागृती करून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हवामानाबाबतची अद्ययावत माहिती पुरविण्यासाठी यंत्रणा विकसित करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. कापूस, सोयाबीन, धान, तूर हे मुख्य पीक असले तरी अन्य पिकेही शेतकरी घेतात. सोबतच सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी भाजीपाला लावतात. मात्र, निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना हवामानाबाबत अद्ययावत माहिती हवी असते. त्यानुसार ते आपल्या शेतातील पिकांची जोपासना करू शकेेल. मात्र, बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी किसान ॲप डाऊनलोड केले आहे. मात्र, त्यांनाही अद्ययावत माहिती पोहोचत नसल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे, नुकतेच आलेल्या वादळाची माहिती उशिराने मिळाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळे ॲप असूनही कामाचे नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नैसर्गिक नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने अद्ययावत यंत्रणा तयार करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

किसान ॲपवर काय मिळते माहिती

१. दररोजच्या हवामानाचा अंदाज देण्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहे.

२.शेती आणि शेतामधील विविध प्रश्न सोडविण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

कीड रोग नियंत्रण करणे, माती परीक्षण यावर विविध विषयांचे मार्गदर्शन

सतर्कतेचा इशारा, हवामान अंदाज, अतिवृष्टीसारखा इशारा, आदी.

बाॅक्स

अपडेट वेळेत मिळावे...

शेतकऱ्यांना वेळेमध्ये संपूर्ण माहिती मिळावी, अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या विविध योजना यावर माहिती आणि नवीन तंत्रज्ञान याची माहिती मिळावी.

हवामानाचा अंदाज वेळेपूर्वी मिळाल्यास कृषी क्षेत्रातील नियोजन शेतकऱ्यांना करता येते.

कोट -

माहिती वेळेपूर्वी मिळावी

शेती निसर्गाच्या भरवशावर असते. निसर्गाने साथ दिली तर शेतकऱ्यांचा फायदा, नाही तर तोटा होतो. अनेकवेळा नुकसानीलाच सामोर जावे लागते. कृषी विभागाने अद्ययावत यंत्रणा तयार करून प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती पुरविली तर नुकसान टाळता येईल.

- केतन बोबाटे

-

हवामान, तसेच इतर माहिती तत्काळ मिळाल्यास शेतकरी अलर्ट होतील. परिणाम नुकसान टाळणे शक्य होईल. मात्र, अद्ययावत माहिती मिळत नाही. दिवसेंदिवस शेती करणे परवडण्यासारखे नाही. त्यातच भावही मिळत नाही. नैसर्गिक नुकसान तर वेगळेच आहे.

मारोती कोंडेकर

-

प्रत्येक शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही. त्यामुळे काही जण निसर्गावरच अवलंबून आहे. जेव्हा वादळ-वाऱ्यातून जे शिल्लक राहील ते शेतकऱ्यांचे अशी अवस्था आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर अशी यंत्रणा विकसित करणे गरजेचे आहे.

-द्रौणाचार्य गेडाम

--

कोट

किसान ॲपबाबात अद्याप एकही तक्रार कार्यालयात आली नाही. हवामानाच्या अंदाजाबाबात तसेच इतर माहिती सध्या उपलब्ध असलेल्या विविध साधनांद्वारे, तसेच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवीत असतो.

-भाऊसाहेब बऱ्हाटे

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर.