शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चंद्रपुरातील शेतकऱ्यांनी अप्पर तहसीलदारांना दिली रोगग्रस्त धानाची पेंढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 11:02 IST

धानपिकाचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क अप्पर तहसीलदार विक्रम राजपुत यांना रोगाने ग्रस्त धानाची पेंढी भेट दिली.

ठळक मुद्देएकरी फक्त दोन ते पाच पोते धानाचे उत्पादनशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर: धानपिकावर यावर्षी मावा-तुडतुडा, लाल्या यासारख्या रोगांनी आक्रमण केले आहे. पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत आहे. वारंवार मागणी करूनही शासकीय यंत्रणेमार्फत सर्व्हेक्षण सुरू झालेले नाही. धानपिकाचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क अप्पर तहसीलदार विक्रम राजपुत यांना रोगाने ग्रस्त धानाची पेंढी भेट दिली.तळोधी भागातील शेतकरी वर्ग गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळाच्या छायेत जगत आहे. यावर्षीसुद्धा कमी पावसामुळे व नंतर रोगांनी केलेल्या आक्रमणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास हिसकावला जात आहे. मावा-तुडतुडा, लाल्या यासारख्या रोगांमुळे पीक उद्ध्वस्त होत असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी उत्पादनासाठी लावलेला खर्चही निघण्याचे चिन्ह नाही. एकरी दोन ते पाच पोते उत्पादन होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे वीज बिल पृूर्णपणे माफ करण्यात यावे, धानाला कमीतकमी तीन हजार रु. प्रति क्विंटल हमीभाव देण्यात यावा, धानपिकाचे सर्व्हेक्षण करून हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीचे निवेदन तळोधी (बा.) व सावरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी रोगग्रस्त धानाची पेंढी अप्पर तहसीलदारांना देत सादर केले. यावेळी जि.प.सदस्य खोजराम मस्कोल्हे जि.प. सदस्य नैना गेडाम, श्रीराम बोरकर उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी