शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

शेतकऱ्यांनो सावधान; बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून मापात घोळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:06 IST

बाजारात शेतकऱ्यांची लूट : बाजार समितीने करावी चौकशी

शशिकांत गणवीर लोकमत न्यूज नेटवर्क भेजगाव : मूल तालुक्यात सद्य:स्थितीत शेतकऱ्यांची धान पिकांची मळणी जोमात सुरू झाली आहे. त्यामुळे मळणी करून धान विक्रीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, याच संधीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी बाजार समितीत सुरू असलेल्या दरापेक्षा जास्त दराने खरेदीचे आमिष दाखवत वजनकाट्यातून सर्रास लूट करीत असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत.

बहुतांश शेतकरी पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत धान विक्री करायचे. मात्र, या ठिकाणी चुकारा पैसे मिळण्यास वेळ लागतो व गावात व्यापारी जास्त दर देऊन नगदी पैसे देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल बांधावरच विक्री करण्यात वाढला आहे. शेतकरी धान पीक लागवडीपूर्वी बँकांचे कर्ज, महिला बचत गटांचे कर्ज वेळप्रसंगी हातउसने पैसे घेऊन शेती पिकवितो. मात्र, घेतलेल्या कर्जाचे देणे घेणे करण्याकरिता धान हातात आल्याबरोबर शेतकऱ्यांना पैसे हवे असतात. त्यामुळे धानाची मळणी झाल्याबरोबर धान पीक शेतकरी लगबगीने विकतो. याचाच फायदा व्यापारी घेत असल्याची ओरड आहे. 

चढ्या भावाने खरेदी तरी नफा कसा मिळतो ? व्यापारी गावात फिरून किंवा मळणी झाल्याबरोबर लगेच शेतातच येतात. तिथेच शेतकरी व्यापाऱ्याला धान विक्री करीत आहेत. मात्र, यावेळी व्यापाऱ्यांनी मूल येथील बाजारपेठेपेक्षा १०० ते १५० रुपये क्विंटलमागे जास्त दर देऊन खरेदी सुरू केली आहे. मूलला नेऊन राईस मिलला हे धान विक्री करतात. असे असले तरी जास्तीचा दर व मूलपर्यंतचे भाडे क्चिटलमागे जवळपास ६० रुपये हा खर्च कुठून काढत असतील. तोट्यात तर व्यवसाय करणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मापातच पाप आहे, असा आरोप सुज्ञ शेतकयांनी केला आहे.

इलेक्ट्रिक काट्यात सेटिंग? वाहतुकीसाठी सोईस्कर व्हावे म्हणून अनेक व्यापारी इलेक्ट्रिक काट्यांनी धान खरेदी करतात. मात्र, या काट्यामध्ये तीन ते पाच किलोंची सेटिंग होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे.

"धान मळणी सुरू असून कर्जाचे देणेघेणे असल्याने मळणी झाल्याबरोबरच धान विक्री करावी लागत आहे. गावातच बांधावर शेतकरी धान विकणे पसंत करीत आहेत. मात्र व्यापाऱ्यांकडून वजनमापात बदल करीत आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे प्रशासनाने वजन काट्यांची चौकशी करावी."- भीमराव डोर्लीकर, शेतकरी गडसुर्ला.

"दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून दोन व्यापाऱ्यांचे वजन काटे जप्त केले होते. अधिक नफा कमविण्याच्या लालसेने असे प्रकार घडतात. शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल." - अजय गंटावर, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती मूल.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती