शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतकऱ्यांनो सावधान; बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून मापात घोळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:06 IST

बाजारात शेतकऱ्यांची लूट : बाजार समितीने करावी चौकशी

शशिकांत गणवीर लोकमत न्यूज नेटवर्क भेजगाव : मूल तालुक्यात सद्य:स्थितीत शेतकऱ्यांची धान पिकांची मळणी जोमात सुरू झाली आहे. त्यामुळे मळणी करून धान विक्रीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, याच संधीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी बाजार समितीत सुरू असलेल्या दरापेक्षा जास्त दराने खरेदीचे आमिष दाखवत वजनकाट्यातून सर्रास लूट करीत असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत.

बहुतांश शेतकरी पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत धान विक्री करायचे. मात्र, या ठिकाणी चुकारा पैसे मिळण्यास वेळ लागतो व गावात व्यापारी जास्त दर देऊन नगदी पैसे देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल बांधावरच विक्री करण्यात वाढला आहे. शेतकरी धान पीक लागवडीपूर्वी बँकांचे कर्ज, महिला बचत गटांचे कर्ज वेळप्रसंगी हातउसने पैसे घेऊन शेती पिकवितो. मात्र, घेतलेल्या कर्जाचे देणे घेणे करण्याकरिता धान हातात आल्याबरोबर शेतकऱ्यांना पैसे हवे असतात. त्यामुळे धानाची मळणी झाल्याबरोबर धान पीक शेतकरी लगबगीने विकतो. याचाच फायदा व्यापारी घेत असल्याची ओरड आहे. 

चढ्या भावाने खरेदी तरी नफा कसा मिळतो ? व्यापारी गावात फिरून किंवा मळणी झाल्याबरोबर लगेच शेतातच येतात. तिथेच शेतकरी व्यापाऱ्याला धान विक्री करीत आहेत. मात्र, यावेळी व्यापाऱ्यांनी मूल येथील बाजारपेठेपेक्षा १०० ते १५० रुपये क्विंटलमागे जास्त दर देऊन खरेदी सुरू केली आहे. मूलला नेऊन राईस मिलला हे धान विक्री करतात. असे असले तरी जास्तीचा दर व मूलपर्यंतचे भाडे क्चिटलमागे जवळपास ६० रुपये हा खर्च कुठून काढत असतील. तोट्यात तर व्यवसाय करणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मापातच पाप आहे, असा आरोप सुज्ञ शेतकयांनी केला आहे.

इलेक्ट्रिक काट्यात सेटिंग? वाहतुकीसाठी सोईस्कर व्हावे म्हणून अनेक व्यापारी इलेक्ट्रिक काट्यांनी धान खरेदी करतात. मात्र, या काट्यामध्ये तीन ते पाच किलोंची सेटिंग होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे.

"धान मळणी सुरू असून कर्जाचे देणेघेणे असल्याने मळणी झाल्याबरोबरच धान विक्री करावी लागत आहे. गावातच बांधावर शेतकरी धान विकणे पसंत करीत आहेत. मात्र व्यापाऱ्यांकडून वजनमापात बदल करीत आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे प्रशासनाने वजन काट्यांची चौकशी करावी."- भीमराव डोर्लीकर, शेतकरी गडसुर्ला.

"दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून दोन व्यापाऱ्यांचे वजन काटे जप्त केले होते. अधिक नफा कमविण्याच्या लालसेने असे प्रकार घडतात. शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल." - अजय गंटावर, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती मूल.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती