शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

हमीभावासाठी शेतकऱ्यांच्या हल्लाबोल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:08 IST

व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सरकारी खरेदी करून शेतकऱ्यांचा माल हभीभावाप्रमाणे खरेदी करावा, या मागणीसाठी शुक्रवारी राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकऱ्यांनी हल्लाबोल करीत मोर्चा काढला.

ठळक मुद्देबाजार समितीवर मोर्चा : पोलिसांचा तगडा बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सरकारी खरेदी करून शेतकऱ्यांचा माल हभीभावाप्रमाणे खरेदी करावा, या मागणीसाठी शुक्रवारी राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकऱ्यांनी हल्लाबोल करीत मोर्चा काढला.सदर मोर्चा किसान क्रांती समन्वय समितीच्या नेतृत्वात करण्यात काढण्यात आला. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी राजुराचे ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची खासगी व्यापारी अक्षरक्ष: लूट करीत आहे. सोयाबिनचा हमीभाव ३४५० रूपये असताना व्यापारी कमी दर देत आहेत. ही शेतकऱ्यांची पिळवणूक असून ती थांबविण्यासाठी हमीभावाप्रमाणे शेतमालाची खरेदी करावी, बाजार समितीने सरकारी खरेदी सुरू करावी, अशी मागणी किसान क्रांती समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली.यावेळी शेतकऱ्यांसोबत किसान क्रांती समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बोबडे, गणेश झाडे, मारोती कूरवटकर, बालाजी भोंगळे, प्रकाश ताजणे, बापुराव मडावी, सुनील मुसळे, भिवराज सोनी, संतोष दोरखंडे, अरविंद वांढरे, राजेश देवरवार, गौरव चाफले, ज्ञानेश आत्राम, महादेव चाफले, महेश धोगंडे उपस्थित होते. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती कवडू पोटे यांच्याशी चर्चा करून हमीभावाप्रमाणे शेतमाल खरेदी करण्याची मागणी केली.मात्र, खासगी व्यापारी बाजार समितीमध्ये हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यास तयार नसलयाने सायंकाळपर्यंत शेतकरी तिथेच ठिय्या मांडून होते. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला सोयाबिन बाजार समितीच्या आवारात तसाच पडून होता. सकाळपासून आलेले शेतकरी शेतमाल विक्रीच्या प्रतीक्षेत होते. मात्र त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणीही सवड काढली नाही.वृत्त लिहिपर्यंत यावर कोणताही तोडगा निघाला नव्हता.अन् शेतकरी तहानेने व्याकुळलेशेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासूनच शेतमाल विक्रीसाठी आणला होता. मात्र, बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने पिण्याच्या पाण्याची कोणतीच व्यवस्था केली नाही. त्यामुळे शेतकरी पाण्यासाठी इतरत्र भटकताना दिसत होते. त्यामुळेही शेतकरी संतप्त झाले.