शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावासाठी शेतकऱ्यांच्या हल्लाबोल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:08 IST

व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सरकारी खरेदी करून शेतकऱ्यांचा माल हभीभावाप्रमाणे खरेदी करावा, या मागणीसाठी शुक्रवारी राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकऱ्यांनी हल्लाबोल करीत मोर्चा काढला.

ठळक मुद्देबाजार समितीवर मोर्चा : पोलिसांचा तगडा बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सरकारी खरेदी करून शेतकऱ्यांचा माल हभीभावाप्रमाणे खरेदी करावा, या मागणीसाठी शुक्रवारी राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकऱ्यांनी हल्लाबोल करीत मोर्चा काढला.सदर मोर्चा किसान क्रांती समन्वय समितीच्या नेतृत्वात करण्यात काढण्यात आला. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी राजुराचे ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची खासगी व्यापारी अक्षरक्ष: लूट करीत आहे. सोयाबिनचा हमीभाव ३४५० रूपये असताना व्यापारी कमी दर देत आहेत. ही शेतकऱ्यांची पिळवणूक असून ती थांबविण्यासाठी हमीभावाप्रमाणे शेतमालाची खरेदी करावी, बाजार समितीने सरकारी खरेदी सुरू करावी, अशी मागणी किसान क्रांती समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली.यावेळी शेतकऱ्यांसोबत किसान क्रांती समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बोबडे, गणेश झाडे, मारोती कूरवटकर, बालाजी भोंगळे, प्रकाश ताजणे, बापुराव मडावी, सुनील मुसळे, भिवराज सोनी, संतोष दोरखंडे, अरविंद वांढरे, राजेश देवरवार, गौरव चाफले, ज्ञानेश आत्राम, महादेव चाफले, महेश धोगंडे उपस्थित होते. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती कवडू पोटे यांच्याशी चर्चा करून हमीभावाप्रमाणे शेतमाल खरेदी करण्याची मागणी केली.मात्र, खासगी व्यापारी बाजार समितीमध्ये हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यास तयार नसलयाने सायंकाळपर्यंत शेतकरी तिथेच ठिय्या मांडून होते. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला सोयाबिन बाजार समितीच्या आवारात तसाच पडून होता. सकाळपासून आलेले शेतकरी शेतमाल विक्रीच्या प्रतीक्षेत होते. मात्र त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणीही सवड काढली नाही.वृत्त लिहिपर्यंत यावर कोणताही तोडगा निघाला नव्हता.अन् शेतकरी तहानेने व्याकुळलेशेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासूनच शेतमाल विक्रीसाठी आणला होता. मात्र, बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने पिण्याच्या पाण्याची कोणतीच व्यवस्था केली नाही. त्यामुळे शेतकरी पाण्यासाठी इतरत्र भटकताना दिसत होते. त्यामुळेही शेतकरी संतप्त झाले.