शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

हमीभावासाठी शेतकऱ्यांच्या हल्लाबोल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:08 IST

व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सरकारी खरेदी करून शेतकऱ्यांचा माल हभीभावाप्रमाणे खरेदी करावा, या मागणीसाठी शुक्रवारी राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकऱ्यांनी हल्लाबोल करीत मोर्चा काढला.

ठळक मुद्देबाजार समितीवर मोर्चा : पोलिसांचा तगडा बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सरकारी खरेदी करून शेतकऱ्यांचा माल हभीभावाप्रमाणे खरेदी करावा, या मागणीसाठी शुक्रवारी राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकऱ्यांनी हल्लाबोल करीत मोर्चा काढला.सदर मोर्चा किसान क्रांती समन्वय समितीच्या नेतृत्वात करण्यात काढण्यात आला. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी राजुराचे ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची खासगी व्यापारी अक्षरक्ष: लूट करीत आहे. सोयाबिनचा हमीभाव ३४५० रूपये असताना व्यापारी कमी दर देत आहेत. ही शेतकऱ्यांची पिळवणूक असून ती थांबविण्यासाठी हमीभावाप्रमाणे शेतमालाची खरेदी करावी, बाजार समितीने सरकारी खरेदी सुरू करावी, अशी मागणी किसान क्रांती समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली.यावेळी शेतकऱ्यांसोबत किसान क्रांती समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बोबडे, गणेश झाडे, मारोती कूरवटकर, बालाजी भोंगळे, प्रकाश ताजणे, बापुराव मडावी, सुनील मुसळे, भिवराज सोनी, संतोष दोरखंडे, अरविंद वांढरे, राजेश देवरवार, गौरव चाफले, ज्ञानेश आत्राम, महादेव चाफले, महेश धोगंडे उपस्थित होते. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती कवडू पोटे यांच्याशी चर्चा करून हमीभावाप्रमाणे शेतमाल खरेदी करण्याची मागणी केली.मात्र, खासगी व्यापारी बाजार समितीमध्ये हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यास तयार नसलयाने सायंकाळपर्यंत शेतकरी तिथेच ठिय्या मांडून होते. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला सोयाबिन बाजार समितीच्या आवारात तसाच पडून होता. सकाळपासून आलेले शेतकरी शेतमाल विक्रीच्या प्रतीक्षेत होते. मात्र त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणीही सवड काढली नाही.वृत्त लिहिपर्यंत यावर कोणताही तोडगा निघाला नव्हता.अन् शेतकरी तहानेने व्याकुळलेशेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासूनच शेतमाल विक्रीसाठी आणला होता. मात्र, बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने पिण्याच्या पाण्याची कोणतीच व्यवस्था केली नाही. त्यामुळे शेतकरी पाण्यासाठी इतरत्र भटकताना दिसत होते. त्यामुळेही शेतकरी संतप्त झाले.