शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी यंदाही आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 05:00 IST

वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान उत्पादित मालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरी पारंपारिक पिकांकडे वढले आहेत. मात्र सोयाबिन कमी खर्चाचे पीक असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असल्याने यंदा सोयाबिनच्या व कापसाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततधार पावसामुळे पिकांवर खोडकिडा, चक्रीभुंगा अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना फवारणीच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे.

ठळक मुद्देकर्जमाफीनंतरही हंगाम धोक्यात : सोयाबीनवर विविध रोगांचा प्रादूर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदा सोयाबिन व कापसाच्या पेऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आहे. मात्र कर्जमाफीनंतरचा हा पहिलाच हंगाम असूनही शेतकऱ्यांपुढे येत असलेल्या नवनव्या अडचणीमुळे यावर्षीही आर्थिक अडचणींना सामोर जावे लागण्याची शक्यता शेतकरी वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.नेहमीच शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांना सामोर जावे लागते. वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान उत्पादित मालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरी पारंपारिक पिकांकडे वढले आहेत. मात्र सोयाबिन कमी खर्चाचे पीक असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असल्याने यंदा सोयाबिनच्या व कापसाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततधार पावसामुळे पिकांवर खोडकिडा, चक्रीभुंगा अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना फवारणीच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक पिवळे पडले. शेगांना गळती लागली आहे.मृग नक्षत्राच्या पावसावर सोयाबीनची पेरणी झाली. समाधानकारक पाऊसही पडला. पीक बहरायला लागले. पिकांची वाढही झाली. शेंगा लागल्या. मात्र वातावरणातील सततच्या बदलामुळे शेंगाच भरल्याच नाही. परिणामी शेतकरी पुन्हा हताश झाले आहेत. यंदा झालेल्या शेतकरी कर्जमाफीमुळे चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र पीकाची सध्याची परिस्थिती बघता केलेला सोयाबीनवर केलेला खर्चही निघतो की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांचे अर्थच्रक कोलमडेल की काय, अशी भीती व्यक्त होताना दिसून येत आहे.उताऱ्याकडे शेतकऱ्यांचे लक्षयंदा अनेक शेतकरी सोयाबीन पिकांकडे वळले आहेत. परंतु, यंदा हवामानामुळे हे पीक न परवडणारे ठरतील की काय, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. काहींनी उभ्या पिकांत जनावरे सोडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही शेतात पीक उभे आहे. अवघ्या काही दिवसावर मळणी पाहता किती उतारा होतो. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आधिच सततची नापिकी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खरिपाच्या उत्पन्नावर आर्थिक देवाण-घेवाण अवलंबून असते. मात्र यावर्षी आलेल्या सततच्या संकटामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती