शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

बियाणे दरवाढीने शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST

गतवर्षी खरीप पिकांवर किडीचा प्रादुर्भाव, ओला दुष्काळ, रब्बी व उन्हाळी पिकांना बसलेला अवकाळी पावसासह वादळवाºयाचा फटका याला तोंड देताना बळीराजा मेटाकुटीस आल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. कापूस विक्रीची नोंद करुनही विक्रीचा मुहूर्त लवकर साधला जात नाही. अतिवृष्टीमुळे सोयाबिन, ज्वारी, तूर, उडीद, मुग आदी पिकांची मोठी हाणी झाली. उभ्या कापसाच्या सरकीला अंकुर फुटले.

ठळक मुद्देआर्थिक ताण : मागील वर्षीच्या तुलनेत बियाण्यांच्या दरात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मान्सूनची चाहूल लागल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागती करुन खरीप पेरणीसाठी सज्ज झाला आहे. खरीप पेरणी तोंडावर असताना शेतकरी वर्ग बि-बियाण्यांच्या खरेदीसाठी अािर्थक जुळवाजुळव करण्यात गुंतला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाणांच्या दरात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरत आहे.गतवर्षी खरीप पिकांवर किडीचा प्रादुर्भाव, ओला दुष्काळ, रब्बी व उन्हाळी पिकांना बसलेला अवकाळी पावसासह वादळवाºयाचा फटका याला तोंड देताना बळीराजा मेटाकुटीस आल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. कापूस विक्रीची नोंद करुनही विक्रीचा मुहूर्त लवकर साधला जात नाही. अतिवृष्टीमुळे सोयाबिन, ज्वारी, तूर, उडीद, मुग आदी पिकांची मोठी हाणी झाली. उभ्या कापसाच्या सरकीला अंकुर फुटले. ओल्या दुष्काळाने शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला. त्याननंतर कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संचारबंदीचा फटका भाजीपाला, उत्पादकांना बसला. थकबाकीदार शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाचा गुंता अद्यापही कायम असल्याने खरिपाचे पीक कर्ज वाटप अद्यापही प्रलंबित आहे. त्यात अनुदानावर खते, बियाणे मिळण्याची आशा धुसर दिसत असताना बियाणे दरात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. गतवर्षी सोयाबीन बियाणे विविध वाणाची बॅग, एक हजार ७०० रुपये ते एक हजार ९०० पन्नास रुपयांपर्यंत होती, तर यावर्षी दोन हजार २०० ते दोन हजार ६०० रुपये प्रती बॅगचे दर असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी उडीद, मूग, बियाणे प्रती किलो १२० रुपये होते. यंदा मात्र हे बियाणे प्रती किलो १८० रुपयांपर्यंत वाढले आहे, तर तुरीच्या बियाणातसुद्धा ३० ते ४० रुपये प्रती किलो भाववाढ झाल्याचे समजते.ओलावा झाल्यानंतरच पेरणी करांदिवसांपासून वातावरणात बदल होताना दिसत आहे. त्यामुळे हवामान खात्याने जरी पावसाचा अंदाज बांधला असला तरी पाऊस कधी येईल, हे सांगणे अवघड आहे. वेळेवर पाऊस आला तर शेतकऱ्यांना सुरळीत पेरणी करता येणार आहे. त्यासाठी शेतकºयांनी चांगला ओलावा झाल्यानंतरच पेरणी करावी, असे तज्ज्ञांचे मत आहे.शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षाचांगला पाऊस झाला की, लगेच खरिपाची पेरणी करावी, असा विचार शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यात खरिपाची पेरणी करावी, असा समाधानकारक पाऊसच झाला नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा कोरोना काळात देखील शेतकºयांनी उन्हाळ्यात खरीप लागवडीच्या पूर्वतयारीची सर्व कामे पूर्ण केली आहेत. लॉकडाऊनमुळे मशागतीची कामे थांबली होती. काही दिवसानंतर जिल्हा प्रशासनाने शेतीच्या कामांना मुभा दिल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. सध्या जिल्ह्यात खरीप पेरणीसाठी काही ठिकाणी पाऊस झाला आहे. या पावसाने जमीन एक फूट पण भिजेल इतकाही पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे नजरा लावून बसले आहेत. चांगला पाऊस झाल्यानंतरच खरिपाची पेरणी करता येणार आहे. यंदा जरी हवामान खात्याने चांगला पाऊस असल्याचे सांगितले असले तरी ऐनवेळी वाऱ्यांमुळे पाऊस पुढे जात आहे. वातावरणामध्ये सारखा बदल होत आहे. मात्र, पाऊस येईल, असे वातावरण निर्माण होत नाही आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती