शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

पावसाच्या सरीने शेतकरी सुखावला

By admin | Updated: July 24, 2014 23:47 IST

तालुक्यातील सर्व परिसरात बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावून शेतात पेरलेल्या बियानांच्या अंकुराना जीवदान मिळाले आहे. बऱ्याच कास्तकाराने जून महिन्यात पेरणी केली.

राजुरा : तालुक्यातील सर्व परिसरात बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावून शेतात पेरलेल्या बियानांच्या अंकुराना जीवदान मिळाले आहे. बऱ्याच कास्तकाराने जून महिन्यात पेरणी केली. परंतु पावसाने दगा दिल्यामुळे पेरणी वाया गेली. शेतकरी आर्थिक व मानसिकरित्या हतबल झाला होता. अचानक पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला आहे.यंदा पावसाने शेतकऱ्यांना संकटात टाकले. पाऊस निसर्गाची देण आहे. त्यावर कोणाचे नियंत्रण नाही. तसेच आवश्यकता व मर्जीनुसार पाऊस पडणे अद्याप शक्य झाले नाही. असे असताना शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे महागडे बियाणे खरेदी करून जून महिन्यात पेरणी केली. परंतु पावसाने दगा दिला. जून महिना कोरडा गेला.वातावरणातील उष्णतेमुळे अंकुर वाळून गेले. शेतकरी ढगाकडे पाहून दुबार पेरणीची वाट पाहत होते. थोडा पाऊस पडताच दुबार पेरणी केली व येरे येरे पावसा तुला देतो पैसा करीत वरुणराजाला साकडे घालीत होते. नुकतेच ३-४ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली व बियाणाच्या अंकुरांना जिवदान मिळाले आहे. सध्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.तरीपण दीड महिन्याचा कालावधी लोटल्यामुळे पिकावर त्याचा परिणाम होणार आहे. सध्या कापूस व सोयाबीनचे बियाणे उगवले आहे. त्याचा वाढ होण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे.यावर्षी शेतकऱ्यांनी बँकेतून पिक कर्ज घेवून शेतात बियान्याची पेरणी केली. परंतु प्रथम केलेली पेरणी वाया गेली. बिकट परिस्थितीत दुबार पेरणी केली व पावसाने साथ दिल्यामुळे थोडेफार उत्पन्न घेण्याची आशा निर्माण झाली आहे. यावर्षी उत्पन्नात निश्चित घट होणार आहे. पंरतु शेतकऱ्यांना खर्च नेहमीप्रमाणे करावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट व खर्चाच्या मोबदल्यात पिकाचे उत्पन्न होण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यास योग्य दर मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच त्यांची स्थिती सुधारू शकते. (तालुका प्रतिनिधी)