शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

एका तपापासून शेतकरी मोबदल्यापासून वंचित

By admin | Updated: April 25, 2015 01:28 IST

चिमूर तहसील अंतर्गत येणाऱ्या डोगर्ला येथे सन २००२ मध्ये सिंचाई विभागाद्वारे मामा तलावाचा विस्तार करण्यात आला.

खडसंगी : चिमूर तहसील अंतर्गत येणाऱ्या डोगर्ला येथे सन २००२ मध्ये सिंचाई विभागाद्वारे मामा तलावाचा विस्तार करण्यात आला. त्याकरिता जाभुळविहिरा साजातील डोंगर्ला गावातील ११ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली आल्या. या शेतकऱ्याच्या जमिनी शासनाने हस्तांतरित करून घेतल्या. मात्र तलावात जमिनी गेलेले ११ शेतकरी एका तपापासून मोबदल्यापासून वंचित आहेत.शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, म्हणून शासन गावाशेजारी असलेल्या पुरातन तलावाचे विस्तारीकरण करून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ देते. याकरिता मौजा डोगर्ला येथील मामा तलावाचे विस्तारीकरण करण्यात आले. या तलावाच्या विस्तारीकरणाचे डोंगर्ला येथील ११ शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली आल्या. त्यामुळे या शेतकऱ्यांना या जमिनीवर पीक घेता येत नसल्याने शासनाने त्यांना शासकीय दरानुसार मोबदला देण्याचा नियम आहे. प्रभावित शेतकऱ्याने रितसर सिंचन विभागाकडे मागणी केली. मात्र मागील १३ वर्षांपासून या शेतकऱ्यांचे प्रस्ताव कार्यालयातच धूळखात पडले आहेत.बाधित शेतकरी अनेक वर्षांपासून चिमूर येथील सिंचाई विभागाचे उंबरठे झिजवीत आहे. मात्र येथील अधिकारी शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तर देऊन पीडित शेतकऱ्यांना आल्या पावली परत पाठवितात. त्यामुळे शेतकऱ्यांनी विदर्भवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संयोजक नारायण जांभुळे याच्याकडे आपबिती सांगितली असता, जांभुळे यांनी शुक्रवारी दुपारी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेवून लघु सिंचाई कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या अन्यायग्रस्त शेतकऱ्याच्या ठिय्या आंदोलनाचा धसका घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी एक महिन्यात या शेतीचा प्रस्ताव पाठविल्याचे आश्वासन अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना दिले.