शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
Stock Markets Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरण; निफ्टी २५,००० च्या खाली, Wipro, Tata Motors, BEL मध्ये तेजी
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
8
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
9
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
10
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
11
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
12
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
13
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
14
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
15
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
16
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
17
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
18
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
19
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
20
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे

शेतकरी नवरा नको गं बाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST

पूर्वी मुला-मुलींचे लग्न आई-वडिलांकडून ठरविण्यात येत होते. बऱ्याचदा मुला व मुलींचे विचारसुद्धा विचारात घेण्यात येत नव्हते. मात्र, आता परिस्थिती ...

पूर्वी मुला-मुलींचे लग्न आई-वडिलांकडून ठरविण्यात येत होते. बऱ्याचदा मुला व मुलींचे विचारसुद्धा विचारात घेण्यात येत नव्हते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. बहुतेक मुले व मुली स्वत: आपल्या पसंतीच्या मुलांची तर मुले आपल्या पसंतीच्या मुलींची निवड करतात. आता ऑनलाईन संकेतस्थळावर अनेक लग्न जुळविणाऱ्या संस्था सुरू झाल्या आहे. त्यावर नोंदणी करुन अनेकजण आपला जोडीदार निवडत आहेत तर विवाह मेळाव्यातूनसुद्धा लग्न जुळत आहेत. मात्र, संकेतस्थळावर किंवा विवाह मेळाव्यात मुलींनी नोंदविलेल्या अपेक्षा बघितल्या तर त्यांना सरकारी नोकरदार मुलगा पाहिजे, तर शहरातील उच्चशिक्षित मुलींना परदेशातील मोठा पगार कमावणारा नवरा हवा आहे. काही मुलींना व्यावसायिक किंवा खासगी ठिकाणी नोकरीवर असलेल्या मुलालासुद्धा पसंती दर्शविली आहे. मात्र, अनेक मुलींनी चक्क शेतकरी मुलाला नाकारल्याचे दिसून येत आहे.त्यासोबतच मुलांनीसुद्धा रंग, रूपापेक्षा कमवत्या मुलीला अधिक पसंती देत असल्याची माहिती आहे.

बॉक्स

अटी मान्य असतील तरच बोला

दिवसेंदिवस मुलींच्या अपेक्षा वाढत आहे. मुलींना उच्चशिक्षित, शासकीय नोकरदार, दिसायला स्मार्ट, कुटुंबापासून विभक्त असणारा, निर्व्यसनी मुलगा अशी अपेक्षा मुलींकडून व्यक्त होत आहे तर शहरातील मुलींना परदेशात राहणारा, श्रीमंत व दिसायला, भारी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या मुलाला पसंती देत आहेत.

बॉक्स

सर्वाधिक मागणी डॉक्टर व इंजिनिअरला

मुलींकडून डॉक्टर व इंजिनिअर मुलाला अधिक पसंती दिली जात आहे. बीएससी, एमबीए, अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेण्याऱ्या मुलींना डॉक्टर व इंजिनिअर मुलगाच हवा आहे.

अधिकारी संवर्गातील मुलींना किंवा मुलांना त्याच क्षेत्रातील अधिकारी मुलगा लग्नासाठी हवा आहे. काही अधिकारी संवर्गातील मुलींकडून डॉक्टरांनासुद्धा पसंती दिली जात आहे.

शासकीय नोकरदारालासुद्धा मोठी मागणी आहे. शिक्षक, तलाठी, क्लार्क यांनासुद्धा पसंती देण्यात येत आहे. बहुतांश मुलींना मुलगा हवा आहे. परंतु, शेतकरी मुलगा नसावा, असे वधू-वर सूचक केंद्राकडे दिलेल्या बायोडाटावरून दिसून येत आहे.

कोट

मी स्वत: शेतकरी आहे. रान हिरवेगार दिसले तरी घरी पीक येईपर्यंत काहीच भरोसा नाही. उत्पन्न चांगले झाले तर भाव मिळत नाही. मीच माझ्या मुलाला शेतात येऊ देत नाही. त्यामुळे मुलीला एखाद्या शेतकऱ्याला देण्यासाठी विचारच करावा लागतो.

-विठोबा पिंपळकर, कोराडी, चंद्रपूर

-----

मुलीकडच्या मंडळीकडून पहिला प्रश्न मुलगा काय करतो, असा विचारला जातो. शेतकरी असल्याचे सांगताच चेहऱ्यावरील हावभावच बदलत असल्याचा अनुभव अनेकदा आला आहे. आम्ही पिढ्यान्‌-पिढ्या शेतीच करत आलो आहोत. कष्टाने आणि स्वाभिमानाने जगत आहोत.

- मारोती दुधकोर, चंद्रपूर

------

मुलींकडून शासकीय नोकरदारास पहिल्यांदा प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानंतर व्यावसायिक, खासगी नोकरदारांना पसंती आहे. मोठ्या प्रमाणात शेती असली तरी मुलींची नकारघंटाच असते.

- मोरेश्र्वर खैरे, वधू वर सूचक केंद्र, चंद्रपूर

-------