शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:19 IST

पावसाचे रोहिणी व मृग नक्षत्र संपले असून या नक्षत्रात जिल्ह्यात दमदार पाऊस बरसलाच नाही. केवळ एक ते दोन वेळा हलकासा पाऊस झाला. पावसाळ्यासारखे वातावरण असूनही पावसाने अजूनही जोर धरला नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत.

ठळक मुद्देमृग संपला : खरीप हंगामातील धानपिकाची लागवड लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कअअचंद्रपूर : पावसाचे रोहिणी व मृग नक्षत्र संपले असून या नक्षत्रात जिल्ह्यात दमदार पाऊस बरसलाच नाही. केवळ एक ते दोन वेळा हलकासा पाऊस झाला. पावसाळ्यासारखे वातावरण असूनही पावसाने अजूनही जोर धरला नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत. परिणामी दमदार पाऊस होत नसल्याने शेतकरी विवंचनेत सापडले आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसापूर्वी आलेल्या पावसामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असतानच पावसाने पुन्हा दडी मारली आहे.मृग नक्षत्र संपला असला तरी जोरदार पावसाचा पत्ता नाही. दुसरीकडे शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. २१ जूनला मृग नक्षेत्र संपला असून २२ जूनपासून आद्रा नक्षेत्रास प्रारंभ झाला आहे. सधारणत: धानपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसाच्या आद्रा नक्षेत्रात पूर्ण होत असतात. आद्रा नक्षेत्राच्या उत्तरार्ध दुसºया आठवड्यात आषाढी एकादशीच्या दरम्यान प्रत्यक्ष धानपिकाच्या रोवणीस मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. मात्र यावर्षी वरुण राजाची वक्रदृष्टी असल्याने खरीप हंगामातील बाह्य मशागतीची सुद्धा अनेक कामे अद्यापही पूर्ण झाली नाही. जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतजमीन नागरणीचे कामही रखडले आहे. सिंचन व्यवस्था असलेल्या काही शेतकºयांनी आपल्या शेतजमिनीत धानपिकांची पेरणी केली आहे. काही ठिकाणचे पºहेही उगवले आहे.आता सुरु झालेल्या आद्रात नक्षत्रात पावसाने जोर मारल्यास जिल्ह्याच्या कही भागात धान रोवणीच्या कामास प्रारंभ होण्याची शक्यता आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. परिणामी नदी, नाले, तलावातील पाण्याने मार्च महिन्यापासून तळ गाठला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकºयांच्या निसर्गाकडे नजरा लागल्या आहेत.लागवडीसाठी शेतकऱ्यांची धडपडमागील वर्षी पीक हातात येण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दगा दिला. त्यामुळे अनेकांचे धान पीक करपले. तसेच पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाल्याने काही शेतकऱ्यांनी धानाची कापणीच केली नाही. तसेच उत्पादनातही मोठी घट आली होती. आर्थिक तसेच मानसिक संकट असतानाही शेतकरी पु्न्हा नव्या उमेदीने चालु वर्षातील हंगामाच्या तयारीला लागला आहे. मात्र निसर्ग साथ देत नसल्याने त्याची चिंता अधिकच वाढली आहे. सोयाबीन, कापूस उत्पादकाचीही हिच अवस्था असून अनेकांनी धूळपेरणी केली आहे. मात्र पावसाअभावी उगवणी झालीच नसल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती