शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:19 IST

पावसाचे रोहिणी व मृग नक्षत्र संपले असून या नक्षत्रात जिल्ह्यात दमदार पाऊस बरसलाच नाही. केवळ एक ते दोन वेळा हलकासा पाऊस झाला. पावसाळ्यासारखे वातावरण असूनही पावसाने अजूनही जोर धरला नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत.

ठळक मुद्देमृग संपला : खरीप हंगामातील धानपिकाची लागवड लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कअअचंद्रपूर : पावसाचे रोहिणी व मृग नक्षत्र संपले असून या नक्षत्रात जिल्ह्यात दमदार पाऊस बरसलाच नाही. केवळ एक ते दोन वेळा हलकासा पाऊस झाला. पावसाळ्यासारखे वातावरण असूनही पावसाने अजूनही जोर धरला नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत. परिणामी दमदार पाऊस होत नसल्याने शेतकरी विवंचनेत सापडले आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसापूर्वी आलेल्या पावसामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असतानच पावसाने पुन्हा दडी मारली आहे.मृग नक्षत्र संपला असला तरी जोरदार पावसाचा पत्ता नाही. दुसरीकडे शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. २१ जूनला मृग नक्षेत्र संपला असून २२ जूनपासून आद्रा नक्षेत्रास प्रारंभ झाला आहे. सधारणत: धानपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसाच्या आद्रा नक्षेत्रात पूर्ण होत असतात. आद्रा नक्षेत्राच्या उत्तरार्ध दुसºया आठवड्यात आषाढी एकादशीच्या दरम्यान प्रत्यक्ष धानपिकाच्या रोवणीस मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. मात्र यावर्षी वरुण राजाची वक्रदृष्टी असल्याने खरीप हंगामातील बाह्य मशागतीची सुद्धा अनेक कामे अद्यापही पूर्ण झाली नाही. जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतजमीन नागरणीचे कामही रखडले आहे. सिंचन व्यवस्था असलेल्या काही शेतकºयांनी आपल्या शेतजमिनीत धानपिकांची पेरणी केली आहे. काही ठिकाणचे पºहेही उगवले आहे.आता सुरु झालेल्या आद्रात नक्षत्रात पावसाने जोर मारल्यास जिल्ह्याच्या कही भागात धान रोवणीच्या कामास प्रारंभ होण्याची शक्यता आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. परिणामी नदी, नाले, तलावातील पाण्याने मार्च महिन्यापासून तळ गाठला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकºयांच्या निसर्गाकडे नजरा लागल्या आहेत.लागवडीसाठी शेतकऱ्यांची धडपडमागील वर्षी पीक हातात येण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दगा दिला. त्यामुळे अनेकांचे धान पीक करपले. तसेच पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाल्याने काही शेतकऱ्यांनी धानाची कापणीच केली नाही. तसेच उत्पादनातही मोठी घट आली होती. आर्थिक तसेच मानसिक संकट असतानाही शेतकरी पु्न्हा नव्या उमेदीने चालु वर्षातील हंगामाच्या तयारीला लागला आहे. मात्र निसर्ग साथ देत नसल्याने त्याची चिंता अधिकच वाढली आहे. सोयाबीन, कापूस उत्पादकाचीही हिच अवस्था असून अनेकांनी धूळपेरणी केली आहे. मात्र पावसाअभावी उगवणी झालीच नसल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती