शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:19 IST

पावसाचे रोहिणी व मृग नक्षत्र संपले असून या नक्षत्रात जिल्ह्यात दमदार पाऊस बरसलाच नाही. केवळ एक ते दोन वेळा हलकासा पाऊस झाला. पावसाळ्यासारखे वातावरण असूनही पावसाने अजूनही जोर धरला नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत.

ठळक मुद्देमृग संपला : खरीप हंगामातील धानपिकाची लागवड लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कअअचंद्रपूर : पावसाचे रोहिणी व मृग नक्षत्र संपले असून या नक्षत्रात जिल्ह्यात दमदार पाऊस बरसलाच नाही. केवळ एक ते दोन वेळा हलकासा पाऊस झाला. पावसाळ्यासारखे वातावरण असूनही पावसाने अजूनही जोर धरला नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत. परिणामी दमदार पाऊस होत नसल्याने शेतकरी विवंचनेत सापडले आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसापूर्वी आलेल्या पावसामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असतानच पावसाने पुन्हा दडी मारली आहे.मृग नक्षत्र संपला असला तरी जोरदार पावसाचा पत्ता नाही. दुसरीकडे शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. २१ जूनला मृग नक्षेत्र संपला असून २२ जूनपासून आद्रा नक्षेत्रास प्रारंभ झाला आहे. सधारणत: धानपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसाच्या आद्रा नक्षेत्रात पूर्ण होत असतात. आद्रा नक्षेत्राच्या उत्तरार्ध दुसºया आठवड्यात आषाढी एकादशीच्या दरम्यान प्रत्यक्ष धानपिकाच्या रोवणीस मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. मात्र यावर्षी वरुण राजाची वक्रदृष्टी असल्याने खरीप हंगामातील बाह्य मशागतीची सुद्धा अनेक कामे अद्यापही पूर्ण झाली नाही. जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतजमीन नागरणीचे कामही रखडले आहे. सिंचन व्यवस्था असलेल्या काही शेतकºयांनी आपल्या शेतजमिनीत धानपिकांची पेरणी केली आहे. काही ठिकाणचे पºहेही उगवले आहे.आता सुरु झालेल्या आद्रात नक्षत्रात पावसाने जोर मारल्यास जिल्ह्याच्या कही भागात धान रोवणीच्या कामास प्रारंभ होण्याची शक्यता आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. परिणामी नदी, नाले, तलावातील पाण्याने मार्च महिन्यापासून तळ गाठला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकºयांच्या निसर्गाकडे नजरा लागल्या आहेत.लागवडीसाठी शेतकऱ्यांची धडपडमागील वर्षी पीक हातात येण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दगा दिला. त्यामुळे अनेकांचे धान पीक करपले. तसेच पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाल्याने काही शेतकऱ्यांनी धानाची कापणीच केली नाही. तसेच उत्पादनातही मोठी घट आली होती. आर्थिक तसेच मानसिक संकट असतानाही शेतकरी पु्न्हा नव्या उमेदीने चालु वर्षातील हंगामाच्या तयारीला लागला आहे. मात्र निसर्ग साथ देत नसल्याने त्याची चिंता अधिकच वाढली आहे. सोयाबीन, कापूस उत्पादकाचीही हिच अवस्था असून अनेकांनी धूळपेरणी केली आहे. मात्र पावसाअभावी उगवणी झालीच नसल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती