शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

धानाची उतारी घटल्याने शेतकरी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 23:53 IST

नागभीड तालुका भात पिकाकरिता प्रसिद्ध आहे. यावर्षी परिसरात वरुणराजाने उशिरा का होईना, पण बºयापैकी हजेरी लावली. बळीराजाने रक्ताचे पाणी केल्याने शेतामध्ये धान पीक मोठ्या डौलाने उभे होते.

ठळक मुद्दे शेतकरी चिंतेत : शासनाने भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमिंडाळा : नागभीड तालुका भात पिकाकरिता प्रसिद्ध आहे. यावर्षी परिसरात वरुणराजाने उशिरा का होईना, पण बºयापैकी हजेरी लावली. बळीराजाने रक्ताचे पाणी केल्याने शेतामध्ये धान पीक मोठ्या डौलाने उभे होते. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न हाती येईल, अशी आशा होती. परंतु बदलत्या हवामानाचा धान पिकावर परिणाम झाला. बेरड, मावा, तुडतुडा, करपा आणि कडा करपा अशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला. परिणामी यंदा धानाच्या उतारीत मोठी घट आली आहे. त्यामुळे शेतकरी बेजार झाले आहेत.परिसरातील शेतकºयांनी भंडारा जिल्ह्यातील पवनी व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा या दूरच्या शहरातील कृषी केंद्रामधून औषधी खरेदी करून पिकावर फवारणी केली. परंतु, धान पिकावरील रोग आटोक्यात येण्याचे चिन्ह दिसत नव्हते. बळीराजाने शेवटच्या क्षणापर्यंत पिकावर औषधांची फवारणी केली. पण पिकात काहीच सुधारणा झाली नाही.परिसरातील तुकूम तिव्हर्ला या शिवारातील शेतकरी वसंत बळीराम चिलबुले यांची गट नं. ३०१ मध्ये ४४ हे.आर. शेत जमीन आहे. त्यांनी रोवणी केली. जेव्हा पीक कापणीला आले तेव्हा धानाचे लोंब अपूर्ण अवस्थेत भरलेले दिसले. नमुना म्हणून एका बांधीतील धानाची कापणी व मळणी करून पाहिली. तेव्हा उतारी फार कमी आली.या शेतकºयाने धान पिकाकरिता जवळपास दीड लाख रुपये खर्च केले. मात्र उत्पादन फार कमी झाल्यामुळे सावकार व बँकेचे पीक कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत ते सापडले आहेत. असाच प्रकार अनेक शेतकºयांसोबत घडला असून धानाची मळणी केल्यानंतर त्यांना सुद्धा एकरी तीन ते चार पोते उत्पादन हाती आले आहे.बजेट कोलमडलेगेवरा (बु) : धानाच्या मळणीला सुरुवात झाली आहे. मात्र यावर्षी विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे भरघोष उत्पन्नाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. एकरी धानाची उतारी सहा ते सात पोते उत्पन्न होत असल्याने शेतकºयांचे संपूर्ण बजेट बिघडल्याने नैराश्य दिसून येत आहे. उशिराच्या पावसाने का होईना, धान जोमात वाढून आले. परंतु मावा, तुडतुडा, कीड यासारख्या अनियंत्रीत रोगांनी धान पीक उद्धवस्त करून टाकले. मळणीच्या शेवटी पोत्यांची नव्हे तर एकरी बोली लावण्याची वेळ आली आहे. शेतकºयांच्या शेतात एकरी बांधण्यात आलेले भारे धानाच्या गंजीत जास्त दिसत असले तरी उतारी फार अत्यल्प आहे. त्यामुळे मळणी यंत्राच्या इंधन खर्चाबरोबर मजुरांना पोत्यामागे देण्यात येणारी मजुरी सुद्धा निघणे कठीण आहे. दुसरीकडे रोवणी, कापणी आणि बांधणीचे यावर्षी वाढलेले मजुरीचे दर, कीटकनाशकांच्या बेसुमार किंमतीचा खर्च या सर्व बाबींचा विचार केल्यास धान उत्पादकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.विमा काढूनही लाभ मिळणार की नाही ?यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत बँक व सेवा सहकारी सोसायट्यांकडून धान पिकाचा विमा उतरवून घेतला आहे. त्याकरिता हप्ता सुद्धा भरलेला आहे. परंतु उत्पादन फक्त २० टक्केही झाले नसताना आजपर्यंत शासनाचा व विमा कंपनीच्या कोणत्याही प्रतिनिधीने प्रत्यक्ष बांधावर जावून पंचनामे केले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार की नाही, या विवंचनेत शेतकरी आहेत.