शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

धानाची उतारी घटल्याने शेतकरी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 23:53 IST

नागभीड तालुका भात पिकाकरिता प्रसिद्ध आहे. यावर्षी परिसरात वरुणराजाने उशिरा का होईना, पण बºयापैकी हजेरी लावली. बळीराजाने रक्ताचे पाणी केल्याने शेतामध्ये धान पीक मोठ्या डौलाने उभे होते.

ठळक मुद्दे शेतकरी चिंतेत : शासनाने भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमिंडाळा : नागभीड तालुका भात पिकाकरिता प्रसिद्ध आहे. यावर्षी परिसरात वरुणराजाने उशिरा का होईना, पण बºयापैकी हजेरी लावली. बळीराजाने रक्ताचे पाणी केल्याने शेतामध्ये धान पीक मोठ्या डौलाने उभे होते. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न हाती येईल, अशी आशा होती. परंतु बदलत्या हवामानाचा धान पिकावर परिणाम झाला. बेरड, मावा, तुडतुडा, करपा आणि कडा करपा अशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला. परिणामी यंदा धानाच्या उतारीत मोठी घट आली आहे. त्यामुळे शेतकरी बेजार झाले आहेत.परिसरातील शेतकºयांनी भंडारा जिल्ह्यातील पवनी व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा या दूरच्या शहरातील कृषी केंद्रामधून औषधी खरेदी करून पिकावर फवारणी केली. परंतु, धान पिकावरील रोग आटोक्यात येण्याचे चिन्ह दिसत नव्हते. बळीराजाने शेवटच्या क्षणापर्यंत पिकावर औषधांची फवारणी केली. पण पिकात काहीच सुधारणा झाली नाही.परिसरातील तुकूम तिव्हर्ला या शिवारातील शेतकरी वसंत बळीराम चिलबुले यांची गट नं. ३०१ मध्ये ४४ हे.आर. शेत जमीन आहे. त्यांनी रोवणी केली. जेव्हा पीक कापणीला आले तेव्हा धानाचे लोंब अपूर्ण अवस्थेत भरलेले दिसले. नमुना म्हणून एका बांधीतील धानाची कापणी व मळणी करून पाहिली. तेव्हा उतारी फार कमी आली.या शेतकºयाने धान पिकाकरिता जवळपास दीड लाख रुपये खर्च केले. मात्र उत्पादन फार कमी झाल्यामुळे सावकार व बँकेचे पीक कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत ते सापडले आहेत. असाच प्रकार अनेक शेतकºयांसोबत घडला असून धानाची मळणी केल्यानंतर त्यांना सुद्धा एकरी तीन ते चार पोते उत्पादन हाती आले आहे.बजेट कोलमडलेगेवरा (बु) : धानाच्या मळणीला सुरुवात झाली आहे. मात्र यावर्षी विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे भरघोष उत्पन्नाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. एकरी धानाची उतारी सहा ते सात पोते उत्पन्न होत असल्याने शेतकºयांचे संपूर्ण बजेट बिघडल्याने नैराश्य दिसून येत आहे. उशिराच्या पावसाने का होईना, धान जोमात वाढून आले. परंतु मावा, तुडतुडा, कीड यासारख्या अनियंत्रीत रोगांनी धान पीक उद्धवस्त करून टाकले. मळणीच्या शेवटी पोत्यांची नव्हे तर एकरी बोली लावण्याची वेळ आली आहे. शेतकºयांच्या शेतात एकरी बांधण्यात आलेले भारे धानाच्या गंजीत जास्त दिसत असले तरी उतारी फार अत्यल्प आहे. त्यामुळे मळणी यंत्राच्या इंधन खर्चाबरोबर मजुरांना पोत्यामागे देण्यात येणारी मजुरी सुद्धा निघणे कठीण आहे. दुसरीकडे रोवणी, कापणी आणि बांधणीचे यावर्षी वाढलेले मजुरीचे दर, कीटकनाशकांच्या बेसुमार किंमतीचा खर्च या सर्व बाबींचा विचार केल्यास धान उत्पादकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.विमा काढूनही लाभ मिळणार की नाही ?यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत बँक व सेवा सहकारी सोसायट्यांकडून धान पिकाचा विमा उतरवून घेतला आहे. त्याकरिता हप्ता सुद्धा भरलेला आहे. परंतु उत्पादन फक्त २० टक्केही झाले नसताना आजपर्यंत शासनाचा व विमा कंपनीच्या कोणत्याही प्रतिनिधीने प्रत्यक्ष बांधावर जावून पंचनामे केले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार की नाही, या विवंचनेत शेतकरी आहेत.