शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:31 PM

वेकोलिने कोळसा उत्खनन केल्यानंतर माती ढिगारे शेताजवळच टाकत असल्याने त्यावर झुडपी जंगल वाढल्याचे चित्र राजुरा तालुक्यातील विविध गावांत दिसून येत आहे.

ठळक मुद्देवेकोलिचे ढिगारे : सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतगोवरी : वेकोलिने कोळसा उत्खनन केल्यानंतर माती ढिगारे शेताजवळच टाकत असल्याने त्यावर झुडपी जंगल वाढल्याचे चित्र राजुरा तालुक्यातील विविध गावांत दिसून येत आहे. या जंगलात दबा धरून बसणाºया वन्यप्राण्यांकडून पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे सर्वेक्षण करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, चिंचोली, मानोली, बाबापूर, कढोली, गोयेगाव, अंतरगाव येथील बराचसा भाग वेकोलि परिसराला लागून आहे. कोळसा उत्खनन केल्यानंतर वेकोलि प्रशासनाकडून ही माती शेताजवळच टाकत आहे. त्यामुळे अनेक गावांच्या शेताजवळ टेकडी तयार झाली. सातरी, चनाखा, विहिरगाव, पंचाळा परिसराला जंगल अगदी लागून असल्याने या ठिकाणी नेहमी वन्यप्राण्यांचे कळप आढळतात. यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी आधीच हतबल झाला आहे. बोंडअळीने शेती उद्ध्वस्त झाली. पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन मोठी घट झाली आहे.बोंड अळीने शेतकºयांचा कापूस पूर्णत: वाया गेला. दरम्यान, अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिटीने शेतमालाचे नुकसान झाले. रब्बी हंगामात भाजीपाला व अन्य पिके शेतात उभी असताना वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला. यातही शेतीचे नुकसान होत आहे. शेतकºयांना आयुष्यभर संघर्षच करावा लागत आहे. शेतकºयांच्या नशिबी संघर्षाचे जगणेच आले आहे. दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करूनही शेतीची माती होत आहे सरकार शेतामालाला भाव देत नाही. निसर्ग शेतकºयांच्या साथ देत नाही. वन्यप्राणी शेतातील पीक उद्धवस्त करीत आहेत. वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी स्वत:चा जीव धोक्यात घालून मचाणीवरुन हुसकावण्याचा प्रयत्न करीत आहे.पिकांच्या रक्षणासाठी जागली सुरू आहे. मात्र, वेकोलिच्या ढिगाºयामुळे वन्यप्राण्यांना अगदी शेताजवळच आश्रय मिळाला. जंगलाचा परिसर दूर असूनही केवळ वेकोलिच्या मनमानी कारभारामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. वेकोलिने शेताजवळ माती टाकणे बंद करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.वन्य प्राण्यांकडून भरदिवसा उभे पीक उद्ध्वस्त केले जात आहे. शेताच्या जवळच वेकोलिने मातीचे ढिगारे तयार केले. त्यावर झुडपी जंगल तयार झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी रब्बी पिकांचे जंगली प्राण्यांकडून नुकसान सुरू असल्याने शेतात जागली करावी लागत आहे.- तुषार चौथले, शेतकरी, पांचाळा