शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांसारख्या उड्या मारून गाठावे लागते शेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST

छायाचित्र मासळ (बु.) : यावर्षीच्या पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने एकही शेत पाणंद रस्ता दुरुस्त, तर सोडा खडीकरणही केला नाही. जुलै महिन्यात ...

छायाचित्र

मासळ (बु.) : यावर्षीच्या पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने एकही शेत पाणंद रस्ता दुरुस्त, तर सोडा खडीकरणही केला नाही. जुलै महिन्यात लागून पडलेल्या पावसामुळे शेतपांदण रस्ता चिखलयुक्त झाला आहे. चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांसारख्या अक्षरश: उड्या मारून शेतात जावे लागते. शेती हंगामासंदर्भात आगेकूच करणारा शेतकरी चिखलयुक्त रस्त्यामुळे चिंतातूर झाला आहे. अनेक गावांतील शिवारात जाणाऱ्या पाणंद रस्त्यांचा हा वनवास केव्हा संपणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

चिमूर तालुक्यातील मासळ परिसरातील मासळ (बु.), नंदारा, मासळ तुकुम, मानेमोहाळी, कोलारा तुकुम, टेकेपार, सातारा, मदनापूर, करबडा, चैती तुकुम, विहीरगाव आदी गावांतील शेतपाणंद रस्ते पावसामुळे चिखलमय झाले आहेत. ऐन हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी बी-बियाणे, खते शेतातील झोपडीत नेऊन ठेवतो. मात्र शेतीच्या हंगामापासून शेतकऱ्यांना उत्पन्न घरात येईपर्यंत याच चिखलमय पाणंद रस्त्यांवरून तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकऱ्यांसाठी शासन, प्रशासन विविध प्रकारच्या योजना राबविते; मात्र ग्रामीण भागात योजनांची पायमल्ली होत आहे. अनेक वर्षांपासून पाणंद रस्त्याची स्थिती जैसे थे आहे. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे.

बाॅक्स

पायी चालणे अवघड, बैलबंडी कशी जाणार?

हल्ली पावसात पाणंद रस्त्यात चिखल झाल्याने शेतकऱ्यांना पायी चालणे अवघड झाले आहे. मग या मार्गाने बैलबंडी, शेतीपयोगी साहित्य कसे नेता येणार, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक गावांतील शेतकरी, मजूरवर्ग अडचणीत सापडला आहे.

बाॅक्स

बेजबाबदार सचिवांवर कार्यवाही करा

परिसरातील अनेक ग्रामपंचायतींकडे मागील दोन वर्षांपासून खडीकरण करण्यासंबंधित प्रस्ताव मंजूर झाले आहेत. परंतु अनेक गावांच्या तत्कालीन सरपंच व सचिव यांच्या ढिसाळ नियोजनामुळे, तर काही गावांच्या ग्रामसचिवांच्या दुर्लक्षपणामुळे प्रस्ताव अजूनही नूतनीकरणासाठी पाठवला नसल्याचे समजते. अद्याप खडीकरणाची कामे झाली नाहीत, अशा बेजबाबदार सचिवांवर कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे

कोट

पावसाने पाणंद रस्ता खराब झाला आहे. मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने शेतातील कामासाठी मजूर, खत व बैलबंडी नेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पाणंद रस्त्याचे खडीकरण तातडीने करण्याची गरज आहे.

- नत्थू राजेराम खाटे, शेतकरी, नंदारा, ता. चिमूर.

210721\img_20210708_182159.jpg

शेतकरी चिखलयुक्त पांदन रस्त्यातून मार्ग काढतांना