शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांसारख्या उड्या मारून गाठावे लागते शेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST

छायाचित्र मासळ (बु.) : यावर्षीच्या पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने एकही शेत पाणंद रस्ता दुरुस्त, तर सोडा खडीकरणही केला नाही. जुलै महिन्यात ...

छायाचित्र

मासळ (बु.) : यावर्षीच्या पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने एकही शेत पाणंद रस्ता दुरुस्त, तर सोडा खडीकरणही केला नाही. जुलै महिन्यात लागून पडलेल्या पावसामुळे शेतपांदण रस्ता चिखलयुक्त झाला आहे. चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांसारख्या अक्षरश: उड्या मारून शेतात जावे लागते. शेती हंगामासंदर्भात आगेकूच करणारा शेतकरी चिखलयुक्त रस्त्यामुळे चिंतातूर झाला आहे. अनेक गावांतील शिवारात जाणाऱ्या पाणंद रस्त्यांचा हा वनवास केव्हा संपणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

चिमूर तालुक्यातील मासळ परिसरातील मासळ (बु.), नंदारा, मासळ तुकुम, मानेमोहाळी, कोलारा तुकुम, टेकेपार, सातारा, मदनापूर, करबडा, चैती तुकुम, विहीरगाव आदी गावांतील शेतपाणंद रस्ते पावसामुळे चिखलमय झाले आहेत. ऐन हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी बी-बियाणे, खते शेतातील झोपडीत नेऊन ठेवतो. मात्र शेतीच्या हंगामापासून शेतकऱ्यांना उत्पन्न घरात येईपर्यंत याच चिखलमय पाणंद रस्त्यांवरून तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकऱ्यांसाठी शासन, प्रशासन विविध प्रकारच्या योजना राबविते; मात्र ग्रामीण भागात योजनांची पायमल्ली होत आहे. अनेक वर्षांपासून पाणंद रस्त्याची स्थिती जैसे थे आहे. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे.

बाॅक्स

पायी चालणे अवघड, बैलबंडी कशी जाणार?

हल्ली पावसात पाणंद रस्त्यात चिखल झाल्याने शेतकऱ्यांना पायी चालणे अवघड झाले आहे. मग या मार्गाने बैलबंडी, शेतीपयोगी साहित्य कसे नेता येणार, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक गावांतील शेतकरी, मजूरवर्ग अडचणीत सापडला आहे.

बाॅक्स

बेजबाबदार सचिवांवर कार्यवाही करा

परिसरातील अनेक ग्रामपंचायतींकडे मागील दोन वर्षांपासून खडीकरण करण्यासंबंधित प्रस्ताव मंजूर झाले आहेत. परंतु अनेक गावांच्या तत्कालीन सरपंच व सचिव यांच्या ढिसाळ नियोजनामुळे, तर काही गावांच्या ग्रामसचिवांच्या दुर्लक्षपणामुळे प्रस्ताव अजूनही नूतनीकरणासाठी पाठवला नसल्याचे समजते. अद्याप खडीकरणाची कामे झाली नाहीत, अशा बेजबाबदार सचिवांवर कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे

कोट

पावसाने पाणंद रस्ता खराब झाला आहे. मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने शेतातील कामासाठी मजूर, खत व बैलबंडी नेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पाणंद रस्त्याचे खडीकरण तातडीने करण्याची गरज आहे.

- नत्थू राजेराम खाटे, शेतकरी, नंदारा, ता. चिमूर.

210721\img_20210708_182159.jpg

शेतकरी चिखलयुक्त पांदन रस्त्यातून मार्ग काढतांना