शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

शेत कोरडे आणि पाणी शेतकऱ्याच्या डोळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

पऱ्हे१५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्यांची रोवणी करण्यात येते.यावर्षीच्या हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आवते आणि पऱ्हे नियोजित वेळेतच भरले. पण अगदी हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाने आपला लहरीपणा दाखविला . जून व जुलै या संपलेल्या पावसाच्या दोन महिन्यात एकही मोठा पाऊस या धानपट्ट्यातील तालुक्यांत पडला नाही. काही शेतकऱ्यांनी मोटर आणि इंजिनच्या पाण्यावर रोवणी केली.

ठळक मुद्देशिवारातील वास्तव । आभाळाकडे लक्ष, पिकांच्या उभारीसाठी पाण्याची गरज

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : यावर्षी हंगामाच्या अगदी प्रारंभापासून पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांची अवस्था पळता भूई थोडी झाली आहे. मात्र याही परिस्थितीवर मात करत शेतकऱ्यांनी काही प्रमाणात नैसर्गिक पाणी, मोटारपंप व इतर साधनांनी पाणी करीत रोवणी आटोपली. मात्र पाण्याअभावी रोवणी काळवंडाला लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येऊ लागले आहे. एवढेच नाही तर रोवण्यासाठी तयार असलेले पऱ्हे सुकायला लागली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण धानपट्ट्या जवळपास अशीच स्थिती दिसून येत आहे.नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, पोंभूर्णा व चिमूर तालुक्यात धानाचे पीक घेतल्या जाते. या पिकावरच या तालुक्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. हे पीक घेण्यासाठी साधारणत: जूनच्या १५ तारखेनंतर आणि जुलै महिन्याच्या १० तारखेपर्यंत धानाचे आवते आणि पऱ्हेटाकले जातात. पऱ्हे१५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्यांची रोवणी करण्यात येते.यावर्षीच्या हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आवते आणि पऱ्हे नियोजित वेळेतच भरले. पण अगदी हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाने आपला लहरीपणा दाखविला . जून व जुलै या संपलेल्या पावसाच्या दोन महिन्यात एकही मोठा पाऊस या धानपट्ट्यातील तालुक्यांत पडला नाही. काही शेतकऱ्यांनी मोटर आणि इंजिनच्या पाण्यावर रोवणी केली. नागभीड, सिंदेवाही व ब्रह्मपुरी या तालुक्यांचे कृषी विभागाचे उपविभागीय कार्यालय नागभीड येथे आहे. उपविभागीय अधिकारी डी. एम. तापसकर यांना विचारणा केली असता या तिन्ही तालुक्यात अद्याप ३० ते ३२ टक्के रोवणी बाकी असल्याची माहिती त्यांनी दिली.४० टक्के शेतकऱ्यांनी काढला विमानागभीड उपविभागातील नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी या तालुक्यात ७८ हजार शेतकरी आहेत. या ७८ हजार शेतकºयांपैकी ३८ ते ४० हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घेतला आहे. मुदतवाढ मिळाली तर आणखी यात वाढ होण्याची शक्यता आहे.खत उपलब्ध, पण टाकू शकत नाहीसद्यस्थितीत कृषी केंद्रांमध्ये खत उपलब्ध आहे. मात्र रोज कडक आणि जीवघेणे उन्ह पडत असल्याने शेतकरी रोवणी केलेल्या धानास खताची मात्रा देण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. खताची मात्रा दिली आणि पाऊस आलाच नाही तर आधीच काळवंडत चाललेले धान पुन्हा काळवंडेल अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस