शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शेत कोरडे आणि पाणी शेतकऱ्याच्या डोळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

पऱ्हे१५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्यांची रोवणी करण्यात येते.यावर्षीच्या हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आवते आणि पऱ्हे नियोजित वेळेतच भरले. पण अगदी हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाने आपला लहरीपणा दाखविला . जून व जुलै या संपलेल्या पावसाच्या दोन महिन्यात एकही मोठा पाऊस या धानपट्ट्यातील तालुक्यांत पडला नाही. काही शेतकऱ्यांनी मोटर आणि इंजिनच्या पाण्यावर रोवणी केली.

ठळक मुद्देशिवारातील वास्तव । आभाळाकडे लक्ष, पिकांच्या उभारीसाठी पाण्याची गरज

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : यावर्षी हंगामाच्या अगदी प्रारंभापासून पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांची अवस्था पळता भूई थोडी झाली आहे. मात्र याही परिस्थितीवर मात करत शेतकऱ्यांनी काही प्रमाणात नैसर्गिक पाणी, मोटारपंप व इतर साधनांनी पाणी करीत रोवणी आटोपली. मात्र पाण्याअभावी रोवणी काळवंडाला लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येऊ लागले आहे. एवढेच नाही तर रोवण्यासाठी तयार असलेले पऱ्हे सुकायला लागली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण धानपट्ट्या जवळपास अशीच स्थिती दिसून येत आहे.नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, पोंभूर्णा व चिमूर तालुक्यात धानाचे पीक घेतल्या जाते. या पिकावरच या तालुक्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. हे पीक घेण्यासाठी साधारणत: जूनच्या १५ तारखेनंतर आणि जुलै महिन्याच्या १० तारखेपर्यंत धानाचे आवते आणि पऱ्हेटाकले जातात. पऱ्हे१५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्यांची रोवणी करण्यात येते.यावर्षीच्या हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आवते आणि पऱ्हे नियोजित वेळेतच भरले. पण अगदी हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाने आपला लहरीपणा दाखविला . जून व जुलै या संपलेल्या पावसाच्या दोन महिन्यात एकही मोठा पाऊस या धानपट्ट्यातील तालुक्यांत पडला नाही. काही शेतकऱ्यांनी मोटर आणि इंजिनच्या पाण्यावर रोवणी केली. नागभीड, सिंदेवाही व ब्रह्मपुरी या तालुक्यांचे कृषी विभागाचे उपविभागीय कार्यालय नागभीड येथे आहे. उपविभागीय अधिकारी डी. एम. तापसकर यांना विचारणा केली असता या तिन्ही तालुक्यात अद्याप ३० ते ३२ टक्के रोवणी बाकी असल्याची माहिती त्यांनी दिली.४० टक्के शेतकऱ्यांनी काढला विमानागभीड उपविभागातील नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी या तालुक्यात ७८ हजार शेतकरी आहेत. या ७८ हजार शेतकºयांपैकी ३८ ते ४० हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घेतला आहे. मुदतवाढ मिळाली तर आणखी यात वाढ होण्याची शक्यता आहे.खत उपलब्ध, पण टाकू शकत नाहीसद्यस्थितीत कृषी केंद्रांमध्ये खत उपलब्ध आहे. मात्र रोज कडक आणि जीवघेणे उन्ह पडत असल्याने शेतकरी रोवणी केलेल्या धानास खताची मात्रा देण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. खताची मात्रा दिली आणि पाऊस आलाच नाही तर आधीच काळवंडत चाललेले धान पुन्हा काळवंडेल अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस