शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

कुटुंबाचा आधार हिरावला, गाव झाले सुन्न

By admin | Updated: July 14, 2016 00:56 IST

मंगळवारच्या घटनेमुळे लाडज गाव सुन्न झाले आहे. वैनगंगेत नाव उलटण्याच्या घटनेला ३६ तास होऊनही अद्याप माधव मैंद व सचिन चनेकार...

३६ तासानंतरही पत्ता नाही : शोध मोहीम सुरूच रवी रणदिवे ब्रह्मपुरी मंगळवारच्या घटनेमुळे लाडज गाव सुन्न झाले आहे. वैनगंगेत नाव उलटण्याच्या घटनेला ३६ तास होऊनही अद्याप माधव मैंद व सचिन चनेकार या दोघांचा ठावठिकाणा लागलेला नाही. कितीतरी वर्षापासून गावकरी नावेने नदीतून ये-जा करतात, मात्र असा दुर्धर प्रसंग कधीच ओढवला नव्हता, त्यामुळे ही घटना अख्ख्या गावाच्या जिव्हारी लागली आहे. दिवसभर गावकरी नदीच्या काठावर बसून ‘ते’ दोघे आतातरी परत येतील, किमान त्यांची बातमी तरी कानी येईल, या आशेने प्रतिक्षेत होते. मात्र सायंकाळचा अंधार पडायला लागला तरी कसलीही बातमी कानावर न आल्याने गावकरी सुन्न मनाने पुन्हा गावाकडे परतले आहेत. मन विषन्न करणारे हे चित्र आहे लाडज या गावचे. घडलेल्या घटनेमुळे व त्यातल्या त्यात दोघे वाहून गेल्याने लाडजवासीयांची मानसिकता कमालीची व्याकुळली आहे. वाहून गेलेले माधव मैंद हे घरचे कर्ते पुरूष होते. घरी दीड एकर शेती, तीन मुले व पत्नी असा संसाराचा गाडा चालवित असताना वैनगंगेने असा अचानक कोप केला. सचिन चंडीकार हा अविवाहित असला तरी आईवडीलांचा आधार होता. हा आधारच नियतीने हिरावून नेल्याने आईवडीलांचे शब्दही आता मुके झाले आहेत. शून्यात दृष्टी लावून ते मुकपणे आसवे गाळत आहेत. दोघेही वाहून जाणारे कर्ते असल्याने व घरची परिस्थिती हालाखिची असल्याने कुटुंबासमोर मोठा प्रश्न पडला आहे. या घटनेमुळे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्या वैनगंगेने आजवर या गावच्या पिढ्या पोसल्या, तिच वैनगंगा अशी वैरी कशी होऊ शकते, हा प्रश्न गावालाच अस्वस्थ करून जात आहे. वैनगंगेच्या पुरामुळे गावाला धोका असल्याने १९९४ मध्ये सरकारने या गावाचे पुनर्वसन केले होते. मात्र निव्वळ सुपिक शेतजमिनीच्या प्रेमापोटी गावकरी गावातच राहात आहेत. आजवर ठिक चालत राहिले, मात्र मंगळवारच्या घटनेमुळे हे गाव भयभीत झाले आहे. जीवावर उदार होऊन शेती कसण्यापेक्षा पुनर्वसन झालेल्या नव्या ठिकाणी राहायला जायचे की याच काळ्या मातीची सेवा चालू ठेवायची, असा प्रश्न या गावाला पडला आहे. कालपासून दिवसभर त्यावरच गावाचे विचारमंथन सुरू आहे. प्रशासन व ग्रामस्थ यांच्या संयुक्त भुमिकेतून पुढे काहीतरी निर्णय निघणार की जगण्यामरण्यातील ही झुंज अशीच सुरू राहणार, हे येणारा काळच ठरवेल. लाडजला पुराने अनेकदा वेढले तरीही केवळ काळ्या आईच्या सेवेसाठी गावकरी संकटे झेलत राहीले. येथील सुपिक शेतीमुळे कष्टाचे चीज झाले. आर्थिक सुबत्ता आली. त्याच काळ्या आईला सोडून जाण्याच्या कल्पनेने गावकरी कमालीचे हळवे झाले आहेत. रोख पिके देणारी ही शेती या गावाचा आधार होती. त्या बळावरच या गावाने पोटची मुले उच्च शिक्षणासाठी दूर ठेवली होती. त्यामुळे येथील मातीशी या गावाचे एक भावनिक नाते निर्माण झाले आहे. म्हणूनच प्रशासनही गावकऱ्यांसमोर हतबल झाले आहे. मात्र आता हा मोह आवरण्याचा इशारा कालच्या घटनेने दिला आहे. तो सर्वांनीच समजून घेण्याची गरज आहे. लाडज येथे आमदारांची नागरिकांसोबत बैठक वैनगंगा नदीत वाहून गेलेले माधव मैंद व सचिन चनेकार यांचा शोध अद्यापही लागलेला नाही. आमदार बंटी भांगडिया, उपविभागीय अधिकारी उमेश काळे, पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर, उपपोलीस विभागीय अधिकारी प्रविण परदेशी, प्रभारी तहसीलदार पुंडकर यांनी गावात येवून गावकऱ्यांशी चर्चा केली. धोका लक्षात घेवून पुनर्वसन का गरजेचे आहे, हे पटविण्यचा प्रयत्न केला. या बैठकीला सर्वच गावकरी उपस्थित होते.