शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

वाहनचालकांच्या सुटकेसाठी कुटुंबीयांचे आंदोलन

By admin | Updated: December 13, 2014 22:36 IST

आपल्या रास्त मागण्यांसाठी कामबंद करून आंदोलन करणाऱ्या ८१ खासगी ट्रक चालकांना पोलिसांनी अटक करून त्यांची न्यायालयात रवानगी केली. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले

दुर्गापूर : आपल्या रास्त मागण्यांसाठी कामबंद करून आंदोलन करणाऱ्या ८१ खासगी ट्रक चालकांना पोलिसांनी अटक करून त्यांची न्यायालयात रवानगी केली. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन तात्काळ त्यांची सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी चालकांच्या कुटुंबियांनी वेकोलि दुर्गापूर कोळसा खाणीच्या कार्यालयापुढे शुक्रवारी धरणे आंदोलन केले. मात्र अद्यापही त्यांची सुटका न झाल्याने सदर प्रकरण चिघळण्याच्या मार्गावर आहे.वेकोलि दुर्गापूर कोळसा खाणीतील कोळसा इतरत्र वाहून नेण्याचे कंत्राट तीन फौजी कंपन्यांना देण्यात आले आहे. यात हेमकुंड, शंखमुगम, तेरावाली या ट्रान्सपोर्ट कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी आपले ट्रक चालविण्यासाठी चालकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर ट्रक चालकांना कोल इंडिया हाय पॉवर कमेटी कलकत्ताद्वारे वर्ष २०१३ मध्ये किमान वेतन श्रेणी ठरवून दिली. मात्र या खासगी कोळसा वाहून नेणाऱ्या फौजी कंपन्या किमान वेतन न देता आपल्या मनमर्जीनुसार वेतन देऊन त्यांच्यावर अन्याय करीत होत्या. तसेच त्यांच्याकडून आठ तासांऐवजी १२ तास काम करवून घेण्यात येत होते. काही चालकांना या कंपन्यांनी क्षुल्लक कारणावरून कामावरून काढुन टाकले होते. म्हणून या कंपन्यात कार्यरत वाहन चालकांनी कंपन्यांविरूद्ध कामबंद करून आपल्याला न्याय मिळावा, यासाठी १० डिसेंबरला उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या कार्यालयापुढे संप पुकारला. त्यामुळे त्या दिवशी खाणीतील कोळसा इतरत्र जाऊ शकला नाही. ताबडतोब या कंपन्यांनी १२ डिसेंबरला नवीन वाहन चालकांच्या नियुक्त्या केल्या व त्यांच्याद्वारे कोळसा वाहुन नेण्याचे काम सुरू केले.यास जुन्या वाहन चालकांनी विरोध करून परत काम बंद पाडल्याने सदर कोळसा वाहू कंपन्यांनी दुर्गापूर ठाण्यात तक्रार दाखल केली. दुर्गापूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तब्बल ८१ चालकांना अटक केली व न्यायालयाच्या निर्देशानुसार चंद्रपूर व नागपूर कारागृहात त्यांची रवानगी केली.१२ डिसेंबरला त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुला-मुलींनी उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या कार्यालयापुढे धरणे देऊन त्यांच्यावर लावलेल्या कलमा व त्यांची तात्काळ सुटका करण्यासाठी धरणे आंदोलन केले. त्यांच्या समवेत बीएमएस संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र अद्यापही सदर चालकांची सुटका झाली नाही. यापुढे हे आंदोलन तिव्र करण्याचा त्यांच्या कुटुंबियांनी इशारा दिला आहे. (वार्ताहर)