शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

आरोग्य योजनेतून कुटुंबातील सदस्यांची नावे गहाळ

By admin | Updated: September 13, 2014 01:13 IST

शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे...

भेजगाव : शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे आरोग्य पत्र प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत पात्र लाभार्थी कुटुंबापर्यंत वाटप करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर योजनेचे आरोग्यपत्र नागरिकांच्या हाती आले असले तरी, आरोग्यपत्रात अनेक सदस्यांची नावेच गहाळ झाली आहेत. त्यामुळे लाभार्थी संभ्रमात आहेत.आरोग्य योजना चांगली असली तरी कुटुंबातील काही सदस्यांची नावे नाही तर काहींची चुकीचे नाव असल्याने या योजनेपासून त्या सदस्यांंना लाभ घेता येणार नाही. परिणामत: शासनाची ही योजना फसवी ठरणार असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांमध्ये आहे. योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा दारिद्रयरेषेखालील पिवळे शिधापत्रीकाधारक, अंत्योदय व अन्नपूर्णा व दारिद्रय रेषेवरील केशरी शिधापत्रधारक यांचा योजनेत समावेश आहे.ग्रामीण भागात गरीबीचे प्रमाण जास्त असून महागाईच्या काळात सामान्य कुटुंब होरपळून निघत आहे. हातावर आणून पाणावर खाण्याची संख्या अधिक आहे. अशा कुटुंबाना आरोग्याची जटील समस्या भेडसावली की, कुटुंब फक्त मरण शोधतो. गरीबांच्या या समस्येवर जीवनदान देण्याच्या दृष्टीने शासनाने आरोग्य योजनेअंतर्गत आधार देण्याच्या संकल्पनेतून ही योजना कार्यान्वीत केली. मात्र, योजनेच्या सुरुवातीलाच आरोग्यपत्रात त्रृट्या असल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उभा आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही एक आरोग्य विमा योजना असून त्यात निवडक ९७१ गंभीर आजारावर व १७१ पाठपुरावा सेवांवर या योजने अंतर्गत रुग्णालयातून उपचार घेता येणार आहे. आरोग्य पत्रात गावातील बंडूजी लाकडे यांच्या कुटुंबात चार सदस्य असताना आरोग्यपत्रात फक्त कुटुंब प्रमुख बंडू लाकडे यांचेच नाव तर श्रीहरी गणविर यांच्या कुटुंबात तीन व्यक्ती असताना त्यांचे एकाचेच नाव असून भलत्याच व्यक्तीचे नाव आरोग्यपत्रात समाविष्ठ आहे. अशाप्रकारे अनेकांच्या आरोग्यपत्रात चुका आहेत. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्ष दीड लाख रुपये पर्यंत व मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडिच लाख रुपया पर्यंत महाराष्ट्र शासनाने विमा हप्ता करुन निवडक आजारांसाठी रुग्णाला मान्यताप्राप्त रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहे. मात्र आरोग्यपत्रातच नावेच नसल्याने अनेकांना जीव धोक्यात घालून उपचारापासून वंचित राहावे लागणार आहे. प्रशासनाने आरोग्यपत्रात सुधारणा करुन नवीन आरोग्यपत्र देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)