शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी हागणदारीमुक्तीला गालबोट

By admin | Updated: January 4, 2016 03:33 IST

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बल्लारपूर तालुका विदर्भात पहिल्यांदा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद

संकल्पाला तडा : नादुरुस्त शौचालयामुळे निर्माण होत आहे अडचणअनेकश्वर मेश्राम ल्ल बल्लारपूरस्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बल्लारपूर तालुका विदर्भात पहिल्यांदा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद पंचायत समितीने केला आहे. हागणदारीमुक्त तालुका प्रत्यक्षात आणण्यासाठी १६०० कुटुंबाचे नादुरुस्त शौचालयाचे बांधकाम पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र यासाठी सीएसआर निधीची आवश्यकता असून निधीअभावी तालुका हागणदारीमुक्तीला गालबोट लागण्याची शक्यता बळावली आहे. अशीच काहीसी परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यातही आहे.बल्लारपूर तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायती आहेत. येथील एकूण ९ हजार ९०६ कुटुंब संख्यापैकी ९ हजार ३५४ कुटुंबाने वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम करुन वापरात आणले आहे. तरीही आजघडीला ५५२ कुटुंबाने शौचालयाचे बांधकाम अद्याप सुरु केले नाही. निरायम आरोग्य जगण्यासाठी स्वच्छता अभियान महत्वाचा घटक आहे. यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून जनजागृती करीत आहे. स्वच्छतेचा बल्लारपूर पॅटर्न विदर्भातील पहिला ठराव, यासाठी पदाधिकारी अधिकारी व गावकरी समन्वयातून नागरिकांना प्रोत्साहित करीत आहेत. या मोहिमेला जिल्हा परिषद प्रशासनही साथ देत आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील ग्रामीण भारत स्वच्छतेचा संकल्प आकारास येत आहे. प्रत्येक घरी शौचालय बांधकाम करुन उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना प्रतिबंध लावण्यात येत आहे. यासाठी गावागावात लोकसहभाग काही प्रमाणात दिसून येत आहे. लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता कार्ड स्वत: लावण्याचा प्रसंग जागरुकता निर्माण करुन प्रेरणा देणारा ठरला आहे.विदर्भात स्वच्छतेचा बल्लारपूर पॅटर्न आकारास येत असला तरी तालुक्याच्या ग्रामीण भागात १ हजार ६०० कुटुंबाकडे नादुरुस्त व वापरात नसलेल्या शौचालयाची संख्या उघड झाली आहे. याला कारणीभूत शासनाचे कमी अनुदान ठरले आहे. परिणामी नादुरुस्त शौचालयाचे बांधकाम करुन उघड्यावर शौचास जाऊ नये, यासाठी निधीची तरतूद करवी म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घालण्यात आले आहे. पंचायत समिती स्तरावर ठराव पारित करुन वेकोलि, बिल्ट ग्राफीक्स पेपर प्रा. ली. कडे निधीची मागणी सामाजिक दायित्व विभागांमार्फत करण्यात आली. मात्र सीएसआर निधीअभावी संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त होण्यास अडचण निर्माण झाली आहे. परिणामी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण संकल्पना आकारास येणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.विद्यार्थ्यांचे तयार करणार गुड मार्निंग पथकनागरिकांना स्वच्छतागृहांची सवय लागावी, शौचालय वापराचे महत्व कळावे. उघड्यावर शौचास जाणाऱ्यात संकोच निर्माण व्हावा. स्वच्छता अभियानाची फलश्रुती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्याचे गुड मार्निंग पथक तयार करण्याची योजना संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे, गटशिक्षणाधिकारी संजय हेडावू यांनी आखली आहे. या पथकाच्या माध्यमातून गावागावात भल्या पहाटे उघड्यांवर शौचास जाण्यांचा गांधीगिरी पद्धतीने गुलाब पुष्प देऊन जागृती केली जाणार आहे. अशी आहेत नादुरुस्त शौचालयेकोठारी येथे ६५, इटोली १५०, नांदगाव (पोडे) ६५, हडस्ती ४१. गिलबिली १७६, किन्ही ७०, लावारी ८९, कळमना १५८, पळसगाव ९१, आमडी २८, दहेली ६८, कोर्टिमक्ता ८८, काटवली (बामणी) ७१. बामणी (दुधोली) ५१. मानोरा १०३, विसापूर १५७ कवडजई १३९ असे एकूण १७ ग्रामपंचायतीच्या १६०० कुटुंबांकडे नादुरुस्त व वापरात नसलेले शौचालय आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियान आरोग्यासाठी महत्वाचे आहे. या अभियानात बल्लारपूर तालुक्याचे लाभ अन्य तालुक्याच्या तुलनेत समाधानकारक आहे. नादुरुस्त शौचालयाचा प्रश्न निर्माण झाला असला तरी तालुक्याला हागदारीमुक्त करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न शासन स्तरावरुन केला जात असून हागणदारीमुक्त तालुका करण्यासंदर्भात निधीची पूर्तता करण्यात येईल.- सुधीर मुनगंटीवारपालकमंत्री चंद्रपूर