शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

निधीअभावी हागणदारीमुक्तीला गालबोट

By admin | Updated: January 4, 2016 03:33 IST

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बल्लारपूर तालुका विदर्भात पहिल्यांदा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद

संकल्पाला तडा : नादुरुस्त शौचालयामुळे निर्माण होत आहे अडचणअनेकश्वर मेश्राम ल्ल बल्लारपूरस्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बल्लारपूर तालुका विदर्भात पहिल्यांदा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद पंचायत समितीने केला आहे. हागणदारीमुक्त तालुका प्रत्यक्षात आणण्यासाठी १६०० कुटुंबाचे नादुरुस्त शौचालयाचे बांधकाम पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र यासाठी सीएसआर निधीची आवश्यकता असून निधीअभावी तालुका हागणदारीमुक्तीला गालबोट लागण्याची शक्यता बळावली आहे. अशीच काहीसी परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यातही आहे.बल्लारपूर तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायती आहेत. येथील एकूण ९ हजार ९०६ कुटुंब संख्यापैकी ९ हजार ३५४ कुटुंबाने वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम करुन वापरात आणले आहे. तरीही आजघडीला ५५२ कुटुंबाने शौचालयाचे बांधकाम अद्याप सुरु केले नाही. निरायम आरोग्य जगण्यासाठी स्वच्छता अभियान महत्वाचा घटक आहे. यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून जनजागृती करीत आहे. स्वच्छतेचा बल्लारपूर पॅटर्न विदर्भातील पहिला ठराव, यासाठी पदाधिकारी अधिकारी व गावकरी समन्वयातून नागरिकांना प्रोत्साहित करीत आहेत. या मोहिमेला जिल्हा परिषद प्रशासनही साथ देत आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील ग्रामीण भारत स्वच्छतेचा संकल्प आकारास येत आहे. प्रत्येक घरी शौचालय बांधकाम करुन उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना प्रतिबंध लावण्यात येत आहे. यासाठी गावागावात लोकसहभाग काही प्रमाणात दिसून येत आहे. लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता कार्ड स्वत: लावण्याचा प्रसंग जागरुकता निर्माण करुन प्रेरणा देणारा ठरला आहे.विदर्भात स्वच्छतेचा बल्लारपूर पॅटर्न आकारास येत असला तरी तालुक्याच्या ग्रामीण भागात १ हजार ६०० कुटुंबाकडे नादुरुस्त व वापरात नसलेल्या शौचालयाची संख्या उघड झाली आहे. याला कारणीभूत शासनाचे कमी अनुदान ठरले आहे. परिणामी नादुरुस्त शौचालयाचे बांधकाम करुन उघड्यावर शौचास जाऊ नये, यासाठी निधीची तरतूद करवी म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घालण्यात आले आहे. पंचायत समिती स्तरावर ठराव पारित करुन वेकोलि, बिल्ट ग्राफीक्स पेपर प्रा. ली. कडे निधीची मागणी सामाजिक दायित्व विभागांमार्फत करण्यात आली. मात्र सीएसआर निधीअभावी संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त होण्यास अडचण निर्माण झाली आहे. परिणामी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण संकल्पना आकारास येणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.विद्यार्थ्यांचे तयार करणार गुड मार्निंग पथकनागरिकांना स्वच्छतागृहांची सवय लागावी, शौचालय वापराचे महत्व कळावे. उघड्यावर शौचास जाणाऱ्यात संकोच निर्माण व्हावा. स्वच्छता अभियानाची फलश्रुती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्याचे गुड मार्निंग पथक तयार करण्याची योजना संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे, गटशिक्षणाधिकारी संजय हेडावू यांनी आखली आहे. या पथकाच्या माध्यमातून गावागावात भल्या पहाटे उघड्यांवर शौचास जाण्यांचा गांधीगिरी पद्धतीने गुलाब पुष्प देऊन जागृती केली जाणार आहे. अशी आहेत नादुरुस्त शौचालयेकोठारी येथे ६५, इटोली १५०, नांदगाव (पोडे) ६५, हडस्ती ४१. गिलबिली १७६, किन्ही ७०, लावारी ८९, कळमना १५८, पळसगाव ९१, आमडी २८, दहेली ६८, कोर्टिमक्ता ८८, काटवली (बामणी) ७१. बामणी (दुधोली) ५१. मानोरा १०३, विसापूर १५७ कवडजई १३९ असे एकूण १७ ग्रामपंचायतीच्या १६०० कुटुंबांकडे नादुरुस्त व वापरात नसलेले शौचालय आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियान आरोग्यासाठी महत्वाचे आहे. या अभियानात बल्लारपूर तालुक्याचे लाभ अन्य तालुक्याच्या तुलनेत समाधानकारक आहे. नादुरुस्त शौचालयाचा प्रश्न निर्माण झाला असला तरी तालुक्याला हागदारीमुक्त करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न शासन स्तरावरुन केला जात असून हागणदारीमुक्त तालुका करण्यासंदर्भात निधीची पूर्तता करण्यात येईल.- सुधीर मुनगंटीवारपालकमंत्री चंद्रपूर