शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

तीळ, गूळ व साखरेच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST

एकमेकांबद्दल स्नेहभाव निर्माण व्हावा या उद्देशाने मकरसंक्रांतीच्या दिवशी महिला एकमेकांना भेटवस्तू देऊन तिळगूळ देण्याची प्रथा आहे. त्यामुळे दरवर्षी ...

एकमेकांबद्दल स्नेहभाव निर्माण व्हावा या उद्देशाने मकरसंक्रांतीच्या दिवशी महिला एकमेकांना भेटवस्तू देऊन तिळगूळ देण्याची प्रथा आहे. त्यामुळे दरवर्षी मकरसंक्रातींच्या तोंडावर तीळ, गूळ, साखरेच्या दरात वाढ होत असते. मात्र यंदाचे चित्र वेगळे आहे. मागील वर्षी १ किलो तीळ १२५ ते १४० रुपयांना मिळायचे. मात्र यंदा १२० रुपयांपासून बाजारपेठेत उपलब्ध आहे. साखर ३६ रुपयेवरुन ३५ रुपये किलो तर गूळ ३५ रुपयांपासून बाजारपेठेत उपलब्ध आहे. केवळ तेलाचे भाव यंदा कडाडले आहेत.

बॉक्स

तीळ १२० रुपये किलो

मागील वर्षी तीळ १२५ रुपयांपासून बाजारपेठेत उपलब्ध होते. आता नव्याने तिळाचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे १२० रुपयांपासून १४० रुपयांपर्यंत तीळ उपलब्ध आहेत.

गूळ ३५ रुपये किलो

बाजारपेठेत हलक्या प्रतीच्या गुळापासून उच्च प्रतीचा गुळ उपलब्ध आहे. साधरणत: ३५ रुपये किलोपासून ६० रुपयांपर्यंत गूळ उपलब्ध असून मागणीही वाढली आहे.

साखरेच्या भावात घसरण

काही दिवसापूर्वी साखर ३६ ते ३८ रुपये प्रति किली विक्रीला होती. मात्र आता त्याचे दर घसरले असून ३५ रुपये प्रति किलो झाले आहे. त्यामुळे संक्रांतीचा गोडवा वाढणार आहे.

कोट

केवळ एक ते दोन रुपये प्रतिकिलोमागे भाव कमी झाले आहे. कोरोनामुळे सर्वाना अर्थिक अडचण भासत आहे. त्यामुळे काही प्रमाणात दरवाढ कमी झाली असली तरी यंदा संक्रांत कडवट होणार आहे.

- प्रतिभा कोडापे, गृहिणी

तिळाचे भाव मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहेत तर साखर व गुळाचे भाव स्थिर आहेत. संक्रांत काही दिवसांवर येऊन ठेपली असूनही पाहिजे त्या प्रमाणात ग्राहकांचा ओढा दिसून येत नाही.

- मोतीलाल टहलियानी, व्यापारी, मूल.