शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

परतीच्या पावसाने धान जोमात तर कापूस कोमात

By admin | Updated: September 26, 2016 01:09 IST

झाडीपट्टी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चिमूर तालुक्यात मागील काही वर्षापासून धानाची लागवड कमी झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कापूस उत्पादकांत चिंता : पेरा वाढला मात्र पीक हाती येईल काय?चिमूर : झाडीपट्टी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चिमूर तालुक्यात मागील काही वर्षापासून धानाची लागवड कमी झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. या सीजनमध्ये जुलै महिन्यापासून पावसाने चांगल्या प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र सध्या परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी जोमात असले तरी कापूस उत्पादन शेतकरी कोमात जाण्याच्या स्थितीत आहेत. गत दोन वर्षापासून निसर्गाने साथ न दिल्यने सोयाबीन शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यामुळे तालुक्यात सोयाबीन पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. मात्र धान उत्पादकांच्या संख्येत कोणताच परिणाम झाला नाही. आजही तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतल्या जात आहे. नगदी पीक म्हणून सोयाबीनने शेतकऱ्यांना दगा दिल्याने आता भिसी, शंकरपूर, मासळ, जांभुळघाट, खडसंगी, बोथली, वहानगाव, आमडी, रेगाबोंडी, साठगाव, आंबेनेरी, मोठेगाव या धानाच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली आहे.सध्या कापसाला फुल, पात्या, लागण्याला सुरुवात झाली आहे. कापसाचे पीक हातात येण्यास काही कालावधी उरला आहे. मात्र मागील पाच-सहा दिवसांपासून आकाशात काळे ढग दाटून येत असल्याने कापूस शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर मागील दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने तालुक्यातील काही भागात हजेरी लावली आहे. यात मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने सद्यातरी शेतकरी समाधानी आहे. मात्र निसर्गाने दगा दिल्यास शेतकऱ्याच्या हातात आलेले कापसाचे पीक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)बस्... आता पाऊस नको !नागभीड : नागभीड तालुक्यात जे धान पीक घेतल्या जाते, त्यासाठी आतापर्यंत पडलेले पाऊस पुरेसे आहे. आणखी पाऊस लांबला तर तो हलक्या धानासाठी घातक ठरण्याची भिती शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे. नागभीड तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी २६ ते २७ हजार क्षेत्रात धानाचे पीक घेतल्या जाते. यात हलके आणि भारी या दोन्ही धानाच्या जातीचा समावेश आहे. हलके धान साधरणत: ९० दिवसाचे तर भारी धान जवळपास १२० दिवसाचे असतात. सद्यस्थितीत हलके धानाचा ‘निसवा’ सुरू झाला आहे. त्यामुळे या धानाला आता पावसाची गरज नाही आणि भारी धानाच्या बाबतीत म्हटले तर यापुढे पाऊसच पडला नाही तरी या धानाला फटका बसण्याची शक्यता नाही. मात्र या पुढे पाऊस लांबला तर तो हलक्या धानासाठी घातक ठरणार आहे. एकंदर आतापर्यंत पडलेला पाऊस या तालुक्यातील धान पिकासाठी पुरेसा आहे.