शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

चार तालुक्यांनाच जादा सेंद्रीय खत पुरवठा, शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:46 IST

जिल्हा परिषद कृषी विभागाने भद्रावती, राजुरा, कोरपना व पोंभूर्णा तालुक्यांना सेंद्रीय खताचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला. तुलनेने अन्य तालुक्यांना अल्प खत पुरविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. खरीप हंगामातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन जादा खत पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

ठळक मुद्देपुरवठा करताना दुजाभाव : विरोधी सत्ताधाऱ्यांकडून टीका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद कृषी विभागाने भद्रावती, राजुरा, कोरपना व पोंभूर्णा तालुक्यांना सेंद्रीय खताचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला. तुलनेने अन्य तालुक्यांना अल्प खत पुरविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. खरीप हंगामातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन जादा खत पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. दरम्यान, या प्रश्नावरून जि. प. च्या विरोधी पक्षातील सदस्यांनी गुरूवारी स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये सेंद्रीय खत पुरवठ्याचाही समावेश आहे. खरीप हंगामाकरिता कृषी विभागाने सेंद्रीय खत पुरवठ्याचे नियोजन केले होते. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तालुकानिहाय पंचायत समितीस्तरावर सेंद्रीय खताचा पुरवठा करण्यात आला.जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना सारख्या प्रमाणावर खताचा पुरवठा करणे आवश्यक होते. मात्र, यात दुजाभाव करण्यात आला. चंद्रपूर तालुक्याला सेंद्रीय खताच्या ६५२ बॅग, बल्लारपूर तालुका ५००. मूल तालुका ८०० बॅग, सावली ८०० बॅग, सिंदेवाही ५०० बॅग, नागभीड ५०० बॅग, ब्रह्मपुरी ५००, चिमूर ५००, वरोरा तालुका ८००, भद्रावती पाच हजार २२० बॅग, राजुरा एक हजार ५०० बॅग, गोंडपिपरी ५०० बॅग, पोंभूर्णा एक हजार बॅग आणि जिवती तालुक्याला ५०० बॅगचा सेंद्रीय खताचा पुरवठा करण्यात आला. जिल्ह्यात चिमूर, ब्रह्मपुरी, वरोरा, सिंदेवाही तालुक्यात शेती करणाºयांची मोठी आहे.याशिवाय तालुक्यात जिल्हा परिषद सदस्यांची संख्याही जास्त असल्याने सेंद्रीय खताचा पुरवठा करताना समान न्याय देणे गरजेचे होते. परंतु, भद्रावती तालुक्याला पाच हजार २२०, राजुरा एक हजार ५००, कोरपना १ हजार ५००, पोंभूर्णा एक हजार सेंद्रीय खताचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे विरोधी पक्षातील सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना सेंद्रीय खताचा पुरवठा करावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी सदस्यांनी सभेप्रसंगी केली.मागणीनुसार पुरवठ्याचे उत्तरजिल्ह्यातील भद्रावती, राजुरा, कोरपना आणि पोंभूर्णा तालुक्यातून मागणी जास्त आली. त्यामुळे मागणीनुसार सेंद्रीय खताचा पुरवठा करण्यात आल्याचे आता जिल्हा परिषदेकडून सांगण्यात येत आहे. सेंद्रीय खतासाठी अजूनही निधी मिळणार आहे. त्यानंतर अन्य तालुक्यांनाही वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद