शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
11
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
12
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
13
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
15
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
16
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
17
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
18
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
19
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
20
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार

उघड्या ट्रान्सफार्मरचा नागरिकांच्या जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 6:00 AM

वीज वितरण कंपनीतील अधिकारी, वायरम व कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीज वितरण करणारी ट्रान्सफार्मर, डी.पी. तसेच तारांची दुरुस्ती याकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नसल्याची स्थिती आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये तसेच दुघर्टना घडू नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे असते.

ठळक मुद्देवीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष : गावांसह शहरातही तारा झाडवेलीच्या विळख्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: अनेक गावांत वीज तारा, खांब आणि ट्रान्सफार्मरची दुरवस्था झाली आहे. पूर्वी सार्वजनिक ठिकाणी असलेले खांब आता नागरिकांच्या घराजवळ पोहचले आहे. त्यामुळे लोंबकळणाऱ्या तारांपासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच जंगलेले खांब आणि उघड्या असलेल्या ट्रान्सफार्मरमुळे सर्वत्र विजेच्या झटक्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.वीज वितरण कंपनीतील अधिकारी, वायरम व कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीज वितरण करणारी ट्रान्सफार्मर, डी.पी. तसेच तारांची दुरुस्ती याकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नसल्याची स्थिती आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये तसेच दुघर्टना घडू नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे असते. परंतु याकडे वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात आहे. दुर्गम, डोंगराळ परिसरात, खेड्यात, शेतशिवारात गंजलेले खांब, दरवाजा तुटल्याने उघड्या असलेल्या डी.पी. च्या ग्रीपच्या ठिकाणी धोकादायक बांधलेल्या तारा असे काहीचे दृष्य ग्रामीण तसेच शहरी भागत दिसून येतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ४०-५० वर्षांपूर्वी उभ्या केलेल्या यंत्रणेवरुन वीज वितरणचा डोलारा आजही सुरु आहे. वाकलेले व अनेक वर्षांपासून सेवेत असल्याने जीर्ण झालेले खांब बदलवून त्याठिकाणी नवीन खांब बसविणे गरजेचे आहे. लोंबकळणाºया तारा वर ओढून आणि नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्याची गरज आहे. परंतु वीज वितरणचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. अनेकवेळा ग्रामीण भागात वीज संदर्भात तक्रार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. एवढेच नाही तर तब्बल दोन ते तीन दिवसापर्यंत अंधारात राहण्याची वेळ येते. त्यामुळे वीज वितरण कंपनीने लक्ष देवून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.उघड्या डीपीतून वीज प्रवास३० ते ४० वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या ग्रामीण भागातील डीपी बॉक्सची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या यंत्रसामग्रीला जंग चढला असून दरवाजे तुटले आहे, पेटीला भोक पडले आहे. वायर जळणे, असे प्रकार सर्रास सुरु आहे. पावसाळ्यात यावर पाणी पडल्यास विजेच्या ठिणग्या बाहेर पडून वीज प्रवाह बंद होण्याच्या प्रकारातही मोठी वाढ झाली आहे. पूर्वी गावाच्या बाहेर असलेल्या डीपी गाव विस्तारामुळे जवळ आल्याने दुर्घटना घडण्याची भिंती आहे. कृषी पंपाच्या जोडण्याची तर फार दूरवस्था आहे. सदर पोलवरुन शेतकºयांच्या पंपाला वीज पुरवठा दिला जातो. बहुतांश कृषी पंपाना वीज मिटरच लावलेली नाही. त्यामुळे याठिकाणी नेहमी दुर्घटना होण्याची भीती असते. वीज चिंतरणने शेतकºयांच्या जिवाशी खेळण्यापेक्षा या कामात सुधारणा करून दिलासा देण्याची गरज आहे.

टॅग्स :electricityवीज