शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

निर्यात बंदीमुळे राईस मिल उद्योग संकटात

By admin | Updated: March 25, 2015 01:31 IST

केंद्र शासनाने तांदूळ निर्यातीवर बंदी घातल्यामुळे धान उत्पादकांसोबतच राईस मिल उद्योगावर अवकळा आली आहे.

नागभीड : केंद्र शासनाने तांदूळ निर्यातीवर बंदी घातल्यामुळे धान उत्पादकांसोबतच राईस मिल उद्योगावर अवकळा आली आहे. जोपर्यंत तांदळावरील निर्यात बंदी केंद्र शासन उठवत नाही तोवर हीच स्थिती राहील असे बोलल्या जात आहे. त्यामुळे धानाची आवक घटली असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल, सावली आदी तालुके धान पिकासाठी प्रसिद्ध आहेत. या तालुक्यात धान हेच एकमेव पीक घेतल्या जाते. याच एका पिकावर संपूर्ण तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. या तालुक्यात उत्पादीत झालेल्या तांदळाची देश-विदेशात मागणी आहे. त्यामुळे या तालुक्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच धान पिकावर असल्याने धानावरील या प्रक्रियेसाठी राईस मिल मोठ्या प्रमाणावर उभे करण्यात आले आहेत.आज प्रादेशिकतेच्या दृष्टीने विचार केला तर नागभीड तालुक्याचे नागभीड आणि तळोधी (बाळा) असे दोन भाग पडतात. नागभीड पेक्षा तळोधी भागाला घोडाझरीच्या रूपाने ओलिताची सोय उपलब्ध असल्याने तळोधी भागात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पण यावर्षी केंद्र शासनाने तांदळावर निर्यात बंदी घातल्याने धानाला मागणीच नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाचे भाव एक हजार रुपयाने घसरल्याने शेतकरीही धान विकायला तयार नाही. त्यामुळे राईस मिलपर्यंत धान पोचतच नसल्याचे चित्र आहे.एका माहितगाराने दिलेल्या माहितीनुसार, नागभीड तालुक्यात राईस मिलची संख्या २५ ते ३० च्या घरात आहे. यातील १२ ते १३ राईस मिल अत्याधुनिक आहेत. अत्याधुनिक राईस मिलवर किमान १०० ते १५० लोक अवलंबून आहेत. तर साध्या मिलवर १० ते १५ लोकांचा उदरनिर्वाह चालत आहे. पण सद्यस्थितीत राईस मिल अतिशय खराब स्थितीतून मार्गक्रमण करीत असल्याने राईस मिलवर अवलंबून असलेल्या या मजूरांसमोरही मोठा बाका प्रसंग उद्भवला आहे. अनेक राईस मिल मालकांनी कर्ज उभे करून हे प्रकल्प उभे केले आहेत. पण यावर्षी पाहिजे त्या प्रमाणात मिलिंग होत नसल्याने त्यांच्यासमोर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.केंद्र शासनाने तांदुळ निर्यातीवरील बंदी उठविल्यास याचा फायदा शेतकरी व राईस मिल उद्योगांना होणार आहे. यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)