शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

बहुजन समाजाचे शोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:26 IST

देशात आरएसएस पुरस्कृत भाजपा सरकारकडून देशातील बहुसंख्य बहुजन समाजाचे शोषण सुरू आहे. या समाजाला विकासापासून वंचित ठेवण्याचे धोरण भाजप सरकार राबवित आहे. देशात एकाधिकारशाही आणून बहुजनांना सत्तेपासून व प्रशासनापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र भाजपा सरकार राबवित असल्याचा आरोप भारिप - बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी केला.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : चंद्रपूर येथे संवाद मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशात आरएसएस पुरस्कृत भाजपा सरकारकडून देशातील बहुसंख्य बहुजन समाजाचे शोषण सुरू आहे. या समाजाला विकासापासून वंचित ठेवण्याचे धोरण भाजप सरकार राबवित आहे. देशात एकाधिकारशाही आणून बहुजनांना सत्तेपासून व प्रशासनापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र भाजपा सरकार राबवित असल्याचा आरोप भारिप - बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी केला.वंचित बहुजन आघाडी संवाद यात्रा शनिवारी चंद्रपुरात दाखल झाली. यावेळी राजीव गांधी कामगार सभागृहात संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बहुजन समाजातील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली.कार्यक्रमाला माजी आमदार ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने, माजी आमदार हरिदास भदे, विजय मोरे, कृष्णाजी नागपुरे, एल. के. मडावी, कुशल मेश्राम, जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, माजी नगरसेवक बंडू हजारे, महासचिव धिरज बांबोळे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, देशात काही निवडक उद्योजकांची मक्तेदारी सुरू आहे. या उद्योजकांच्या माध्यमातून देशातील जनतेला लुटण्याचे धोरण मोदी सरकार राबवित आहे. याद्वारेच भाजपा आणि आरएसएस देशात एकाधिकारशाहीचे राज्य तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. जर एकाधिकारशाही देशात अस्तित्वात आली तर बहुजनांना कोणत्याच संधी मिळणार नाही. त्यामुळे बहुजनांनी वेळीच सावध होणे आवश्यक आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आरएसएस, भाजपाचे हे डाव उधळून लावू, यासाठी बहुजनांनी साथ द्यावी, असे आवाहन अ‍ॅड. आंबेडकर यांनी केले.राज्यातील सत्ता काही कुटुंबाच्या हातात केंद्रीत झाली असून, बहुजणांना सत्तेपासून रोखण्याचे काम सुरू आहे. देशात बहुजणांची संख्या सर्वाधिक असताना हा बहुजन समाज सत्तेपासून दूर आहे. ओबीसी, धनगर, आदिवासी, माळी आणि बौद्धांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी संघटीत व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने, माजी आमदार हरिदास भदे, विजय मोरे, कृष्णाजी नागपुरे, एल. के. मडावी यांनी मार्गदर्शन करताना भाजप सरकारवर टिका करीत सर्वांनी संघटीत होण्याचा सल्ला दिला.कार्यक्रमाचे आयोजन भारिप- बमसंचे जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे महासचिव धीरज बांबोळे, बंडू ठेंगरे, खुशाल मेश्राम, रूपचंद निमगडे, सुमित मेश्राम, राजू किर्तक, तनुजा रायपुरे, लता साव, कल्पना अलोणे, निशा ठेंगरे, पी. डब्लू. मेश्राम, कुसूर दुपारे यांनी केले होते. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील बहुजन जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.