शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

बहुजन समाजाचे शोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:26 IST

देशात आरएसएस पुरस्कृत भाजपा सरकारकडून देशातील बहुसंख्य बहुजन समाजाचे शोषण सुरू आहे. या समाजाला विकासापासून वंचित ठेवण्याचे धोरण भाजप सरकार राबवित आहे. देशात एकाधिकारशाही आणून बहुजनांना सत्तेपासून व प्रशासनापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र भाजपा सरकार राबवित असल्याचा आरोप भारिप - बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी केला.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : चंद्रपूर येथे संवाद मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशात आरएसएस पुरस्कृत भाजपा सरकारकडून देशातील बहुसंख्य बहुजन समाजाचे शोषण सुरू आहे. या समाजाला विकासापासून वंचित ठेवण्याचे धोरण भाजप सरकार राबवित आहे. देशात एकाधिकारशाही आणून बहुजनांना सत्तेपासून व प्रशासनापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र भाजपा सरकार राबवित असल्याचा आरोप भारिप - बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी केला.वंचित बहुजन आघाडी संवाद यात्रा शनिवारी चंद्रपुरात दाखल झाली. यावेळी राजीव गांधी कामगार सभागृहात संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बहुजन समाजातील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली.कार्यक्रमाला माजी आमदार ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने, माजी आमदार हरिदास भदे, विजय मोरे, कृष्णाजी नागपुरे, एल. के. मडावी, कुशल मेश्राम, जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, माजी नगरसेवक बंडू हजारे, महासचिव धिरज बांबोळे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, देशात काही निवडक उद्योजकांची मक्तेदारी सुरू आहे. या उद्योजकांच्या माध्यमातून देशातील जनतेला लुटण्याचे धोरण मोदी सरकार राबवित आहे. याद्वारेच भाजपा आणि आरएसएस देशात एकाधिकारशाहीचे राज्य तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. जर एकाधिकारशाही देशात अस्तित्वात आली तर बहुजनांना कोणत्याच संधी मिळणार नाही. त्यामुळे बहुजनांनी वेळीच सावध होणे आवश्यक आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आरएसएस, भाजपाचे हे डाव उधळून लावू, यासाठी बहुजनांनी साथ द्यावी, असे आवाहन अ‍ॅड. आंबेडकर यांनी केले.राज्यातील सत्ता काही कुटुंबाच्या हातात केंद्रीत झाली असून, बहुजणांना सत्तेपासून रोखण्याचे काम सुरू आहे. देशात बहुजणांची संख्या सर्वाधिक असताना हा बहुजन समाज सत्तेपासून दूर आहे. ओबीसी, धनगर, आदिवासी, माळी आणि बौद्धांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी संघटीत व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने, माजी आमदार हरिदास भदे, विजय मोरे, कृष्णाजी नागपुरे, एल. के. मडावी यांनी मार्गदर्शन करताना भाजप सरकारवर टिका करीत सर्वांनी संघटीत होण्याचा सल्ला दिला.कार्यक्रमाचे आयोजन भारिप- बमसंचे जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे महासचिव धीरज बांबोळे, बंडू ठेंगरे, खुशाल मेश्राम, रूपचंद निमगडे, सुमित मेश्राम, राजू किर्तक, तनुजा रायपुरे, लता साव, कल्पना अलोणे, निशा ठेंगरे, पी. डब्लू. मेश्राम, कुसूर दुपारे यांनी केले होते. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील बहुजन जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.