शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांची रिसोर्स बँक देणार जादा उत्पादनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 05:00 IST

पुरस्कार प्राप्त शेतकरी हे आपल्या शेतात नावीण्यपूर्ण प्रयोग करून त्यातून तावून-सुलाखून तयार झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या प्रयोगाचा आणि अनुभवाचा फायदा अन्य शेतकऱ्यांना व्हावा यासाठी कृषी विभागाने हे पाऊल उचलले आहे. निवडलेल्या पुरस्कारप्राप्त व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांना आता कृषी विद्यापीठे व तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना हवा तेव्हा कृषी सल्ला मिळण्याची सोय होणार आहे.

ठळक मुद्देनाविण्यपूर्ण उपक्रम : जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पारंपरिक शेतीला टाळून जास्त उत्पन्न घेणारे आणि सतत नाविण्याचा विचार करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांना शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार प्रदान केला जातो. या प्रगतीशील शेतकऱ्यांकडे इतरांना दिशा देणारे बरेच काही अनुभव गाठीशी असतात. अशा शेतकऱ्यांची रिर्सार्स बँक तयार केले जाणार आहे. या बँकेत जिल्ह्यातील प्रगतीशील पुरस्कारप्राप्त शेतकरीही सहभागी होणार आहेत.पुरस्कार प्राप्त शेतकरी हे आपल्या शेतात नावीण्यपूर्ण प्रयोग करून त्यातून तावून-सुलाखून तयार झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या प्रयोगाचा आणि अनुभवाचा फायदा अन्य शेतकऱ्यांना व्हावा यासाठी कृषी विभागाने हे पाऊल उचलले आहे. निवडलेल्या पुरस्कारप्राप्त व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांना आता कृषी विद्यापीठे व तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना हवा तेव्हा कृषी सल्ला मिळण्याची सोय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणत्या हंगामात कोणती पिके घेता येतील, ते घेताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, त्याला कोणती खते, किटकनाशके द्यावी, त्याचे मार्केट कसे असेल, अशा प्रश्नांची उत्तरे त्यांच्या गावाजवळच मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे.पिकांबद्दल शेतकऱ्यांना मिळणार तातडीने सल्लानिसर्गच्या अवकृपेमुळे शेतकरी संकटात सापडतात. त्यामुळे शेतात कोणती पिके घ्यावी, खते, कीटकनाशके द्यावी, त्याचे मार्केट कसे असेल? अशा प्रश्नांची उत्तरे त्यांना त्यांच्या गावाजवळच मिळावी यासाठी कृषी विभागाने पुरस्कार प्राप्त व नावीण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांची ह्यरिसोर्स बँकह्ण ची स्थापना झाली. त्याद्वारे गरजु शेतकऱ्यांना तातडीने सल्ला मिळणार आहे.नवीन तंत्रज्ञानाची माहितीशेतकऱ्यांना नव्याने उमेदीने पिके घेण्यासाठी कृषी सल्ल्याची गरज असते. अशावेळी कृषी विद्यापीठातील तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध उपक्रमाद्वारे प्रयत्न केले जातात. मात्र तरीही शेतकऱ्यापर्यंत आवश्यक माहिती पोहचण्यासाठी मर्यादा येतात. याद्वारे नवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे, असा दावा कृषी विभागाकडून केला आहे.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी