शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

माजी मालगुजारी तलाव दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम आखा

By admin | Updated: December 13, 2015 00:41 IST

जलसंपदा विभागाकडे असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम आखण्याचे निर्देश अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी..

मुनगंटीवारांचे निर्देश : नागपुरात पार पडली विशेष बैठकचंद्रपूर: जलसंपदा विभागाकडे असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम आखण्याचे निर्देश अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जलसंपदा विभागाला दिले. वनसभागृह नागपूर येथे माजी मालगुजारी तलावाची दुरुस्ती व सिंचन क्षमतेची पुनर्स्थापना करण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल, विभागीय आयुक्त अनूप कुमार, उपसचिव टाटू, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आर.एम. चव्हाण, अधिक्षक अभियंता गोसीखुर्द आर.एन. ठाकरे, अधिक्षक अभियंता जे.एम. शेख, अधिक्षक अभियंता आर.के. ढवळे, अभियंता राजेश सोनोने आदी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. चंद्रपूर जिल्हयातील मामा तलावांच्या देखभाल दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद यापूर्वी करण्यात आली आहे. या कामाचे अचूक नियोजन करण्याच्या सूचना ना. मुनगंटीवार यांनी दिल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील १३२ मामा तलाव जलसंपदा विभागाच्या अखत्यारित असून यासाठी निधीचे नियोजन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम जलसंपदा विभागाने १५ दिवसांत तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक तलावाची निविदा कधी निघणार, काम कधी होणार, याचा तपशिलवार अहवाल तयार करावा असेही त्यानी सांगितले. माजी मालगुजारी तलाव दुरुस्तीचे मापदंड सुधारित करुन देण्यासंबधीचा शासन आदेश लवकरच काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. माजी मालगुजारी तलावात मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यानी केल्या. मत्स्य व्यवसायासाठी तलावातील पाणी राखून ठेवण्यासंबंधी नियोजन करावे. देखभाल दुरुस्ती झाल्यानंतर सिंचन वाढले पाहिजे, असे त्यानी सांगितले. मामा तलावातील गाळ प्राधान्याने काढावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. गोसेखुर्द धरणातील पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील तलावांमध्ये सोडण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. गोसेखुर्द तलावात भरपूर पाणीसाठा असून तो पूर्णपणे उपयोगात न आल्याने जास्तीचा साठा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पाच्या कालव्यात व माजी मालगुजारी तलावात भरुन देण्याची मागणी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी केली आहे. यावर शनिवारी गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसह ना.सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत विस्तृत चर्चा केली. कशा पध्दतीने पाणी सोडता येईल , त्याचा किती गावांना फायदा होईल, या संबंधीचा गावनिहाय अहवाल सादर करण्याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी दिले. पळसगांव आमडी उपसा सिंचन योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करावे. यासाठी त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. (प्रतिनिधी)