शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

माजी मालगुजारी तलाव दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम आखा

By admin | Updated: December 13, 2015 00:41 IST

जलसंपदा विभागाकडे असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम आखण्याचे निर्देश अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी..

मुनगंटीवारांचे निर्देश : नागपुरात पार पडली विशेष बैठकचंद्रपूर: जलसंपदा विभागाकडे असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम आखण्याचे निर्देश अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जलसंपदा विभागाला दिले. वनसभागृह नागपूर येथे माजी मालगुजारी तलावाची दुरुस्ती व सिंचन क्षमतेची पुनर्स्थापना करण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल, विभागीय आयुक्त अनूप कुमार, उपसचिव टाटू, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आर.एम. चव्हाण, अधिक्षक अभियंता गोसीखुर्द आर.एन. ठाकरे, अधिक्षक अभियंता जे.एम. शेख, अधिक्षक अभियंता आर.के. ढवळे, अभियंता राजेश सोनोने आदी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. चंद्रपूर जिल्हयातील मामा तलावांच्या देखभाल दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद यापूर्वी करण्यात आली आहे. या कामाचे अचूक नियोजन करण्याच्या सूचना ना. मुनगंटीवार यांनी दिल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील १३२ मामा तलाव जलसंपदा विभागाच्या अखत्यारित असून यासाठी निधीचे नियोजन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम जलसंपदा विभागाने १५ दिवसांत तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक तलावाची निविदा कधी निघणार, काम कधी होणार, याचा तपशिलवार अहवाल तयार करावा असेही त्यानी सांगितले. माजी मालगुजारी तलाव दुरुस्तीचे मापदंड सुधारित करुन देण्यासंबधीचा शासन आदेश लवकरच काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. माजी मालगुजारी तलावात मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यानी केल्या. मत्स्य व्यवसायासाठी तलावातील पाणी राखून ठेवण्यासंबंधी नियोजन करावे. देखभाल दुरुस्ती झाल्यानंतर सिंचन वाढले पाहिजे, असे त्यानी सांगितले. मामा तलावातील गाळ प्राधान्याने काढावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. गोसेखुर्द धरणातील पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील तलावांमध्ये सोडण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. गोसेखुर्द तलावात भरपूर पाणीसाठा असून तो पूर्णपणे उपयोगात न आल्याने जास्तीचा साठा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पाच्या कालव्यात व माजी मालगुजारी तलावात भरुन देण्याची मागणी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी केली आहे. यावर शनिवारी गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसह ना.सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत विस्तृत चर्चा केली. कशा पध्दतीने पाणी सोडता येईल , त्याचा किती गावांना फायदा होईल, या संबंधीचा गावनिहाय अहवाल सादर करण्याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी दिले. पळसगांव आमडी उपसा सिंचन योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करावे. यासाठी त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. (प्रतिनिधी)