शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आजही नागरिक करतात पायदळ वारी

By admin | Updated: December 31, 2014 23:23 IST

तालुक्यातील काही गावात आजही रस्ते पोहचले नाही. काही गावात पोहचले तेथे रस्त्याची दुरवस्था आहे. त्यामुळे ग्रामस्थ ८ ते १० किमी अंतर पायदळ चालून शहराची एस.टी. पकडत असल्याचे

रत्नाकर चटप - नांदाफाटातालुक्यातील काही गावात आजही रस्ते पोहचले नाही. काही गावात पोहचले तेथे रस्त्याची दुरवस्था आहे. त्यामुळे ग्रामस्थ ८ ते १० किमी अंतर पायदळ चालून शहराची एस.टी. पकडत असल्याचे चित्र कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी गावात आहे.तेलंगना सीमेलगत असलेल्या थिप्पा, मांगलहिरा, कमलापूर, धनकदेवी, मरकागोंदी, उमलहिरा, शिवापूर या गावामध्ये जाण्यासाठी प्रवाशांना पायदळ पायपीट करावी लागत आहे. शहराकडे जायचे असल्यास कोरपना, पारडी येथूनच बस पकडावी लागते. काही जवळच्या गावापर्यंत खाजगी आॅटो जातात तेही दिवसातून एक-दोनवेळाच जाते. त्यामुळे नागरिक वेळ न गमावता पायदळ चालत आपला प्रवास पार करतात. काही वर्षापूर्वी गावागावांना पोचमार्गाने जोडण्यात आले. मात्र त्यानंतर रस्त्याची झालेली दैनावस्था बघता आता खाजगी वाहनही या गावांमध्ये जाताना दिसत नाही.काही गावे कोरपना तालुक्याच्या ठिकाणापासून १५ ते १८ किमी अंतरावर पहाडाजवळ आहेत. गावामध्ये रस्ते नसल्याने आणि दळणवळणाची अपुरी साधने असल्याने अनेक समस्या येथे आहेत. पुर्वी बांधलेल्या पोचमार्गाची साधी डागडुजी आणि दुरूस्ती झालेली नाही. त्यामुळे रस्ता उखडला आहे. खड्यातून प्रवाश्यांना प्रवास करावा लागत आहे. अपुऱ्या साधनामुळे गावात वैद्यकिय सुविधा नाही. मुलांच्या शिक्षणाचा अभाव असुन बोलीभाषेचा अधिक प्रभाव स्थानिकांवर आजही आहे. गावात दिर्घआजाराने पडलेल्या रुग्णांना बैलगाडीने कोरपना येथे आणावे लागते. त्यामुळे अनेकदा रुग्णांना तपासणीपुर्वीच मृत्यूला कवटाळावे लागत असल्याचे चित्र आहे.काही गावातील रस्त्यांची स्थिती बघून अधिकारी, कर्मचारी या गावांमध्ये जाणे टाळतात. काही गावात रस्त्यांच्या डागडुजीचे काम करण्यात आले. मात्र ते निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याने त्याचा काहीही उपयोग नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांच्या आहे. रस्त्यांवर खड्डे आणि धुळ असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काहींच्या आरोग्याच्या समस्याही वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांची सुविधा महत्त्वाची आहे.