शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

आजही नागरिक करतात पायदळ वारी

By admin | Updated: December 31, 2014 23:23 IST

तालुक्यातील काही गावात आजही रस्ते पोहचले नाही. काही गावात पोहचले तेथे रस्त्याची दुरवस्था आहे. त्यामुळे ग्रामस्थ ८ ते १० किमी अंतर पायदळ चालून शहराची एस.टी. पकडत असल्याचे

रत्नाकर चटप - नांदाफाटातालुक्यातील काही गावात आजही रस्ते पोहचले नाही. काही गावात पोहचले तेथे रस्त्याची दुरवस्था आहे. त्यामुळे ग्रामस्थ ८ ते १० किमी अंतर पायदळ चालून शहराची एस.टी. पकडत असल्याचे चित्र कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी गावात आहे.तेलंगना सीमेलगत असलेल्या थिप्पा, मांगलहिरा, कमलापूर, धनकदेवी, मरकागोंदी, उमलहिरा, शिवापूर या गावामध्ये जाण्यासाठी प्रवाशांना पायदळ पायपीट करावी लागत आहे. शहराकडे जायचे असल्यास कोरपना, पारडी येथूनच बस पकडावी लागते. काही जवळच्या गावापर्यंत खाजगी आॅटो जातात तेही दिवसातून एक-दोनवेळाच जाते. त्यामुळे नागरिक वेळ न गमावता पायदळ चालत आपला प्रवास पार करतात. काही वर्षापूर्वी गावागावांना पोचमार्गाने जोडण्यात आले. मात्र त्यानंतर रस्त्याची झालेली दैनावस्था बघता आता खाजगी वाहनही या गावांमध्ये जाताना दिसत नाही.काही गावे कोरपना तालुक्याच्या ठिकाणापासून १५ ते १८ किमी अंतरावर पहाडाजवळ आहेत. गावामध्ये रस्ते नसल्याने आणि दळणवळणाची अपुरी साधने असल्याने अनेक समस्या येथे आहेत. पुर्वी बांधलेल्या पोचमार्गाची साधी डागडुजी आणि दुरूस्ती झालेली नाही. त्यामुळे रस्ता उखडला आहे. खड्यातून प्रवाश्यांना प्रवास करावा लागत आहे. अपुऱ्या साधनामुळे गावात वैद्यकिय सुविधा नाही. मुलांच्या शिक्षणाचा अभाव असुन बोलीभाषेचा अधिक प्रभाव स्थानिकांवर आजही आहे. गावात दिर्घआजाराने पडलेल्या रुग्णांना बैलगाडीने कोरपना येथे आणावे लागते. त्यामुळे अनेकदा रुग्णांना तपासणीपुर्वीच मृत्यूला कवटाळावे लागत असल्याचे चित्र आहे.काही गावातील रस्त्यांची स्थिती बघून अधिकारी, कर्मचारी या गावांमध्ये जाणे टाळतात. काही गावात रस्त्यांच्या डागडुजीचे काम करण्यात आले. मात्र ते निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याने त्याचा काहीही उपयोग नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांच्या आहे. रस्त्यांवर खड्डे आणि धुळ असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काहींच्या आरोग्याच्या समस्याही वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांची सुविधा महत्त्वाची आहे.