शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
2
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
4
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
5
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
6
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
7
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
8
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
9
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
10
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
11
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
12
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
13
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
14
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
18
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
19
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब

बल्लारपुरात आजही रझाकाराच्या चर्चा

By admin | Updated: June 3, 2015 01:30 IST

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतातील संस्थानिक खालसा करुन त्यांचे भारतात विलीन करुन अखंड भारत बांधण्याचे काम केले.

काही नागरिक आजही हयात : अनेकांनी सोसला जुलूम वसंत खेडेकर बल्लारपूरस्वातंत्र्यप्राप्तीनंतर, भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतातील संस्थानिक खालसा करुन त्यांचे भारतात विलीन करुन अखंड भारत बांधण्याचे काम केले. सारे संस्थानिक याकरिता तयार झालेत. परंतु, निजामचा संस्थानिक भारतात विलीन व्हायला तयारच होईना. त्याला स्वतंत्रच राहायचे होते. निजामचा कल पाकिस्तानाकडे होता. निजामाजवळ रझाकार नावाचे सैनिक होते. निजामाचे गुणगाण करणे, भारताची यथेच्छ निंदा करुन भारत समर्थक तेथील जनतेवर जुलूम व अत्याचार करणे, हेच या सेनेचे काम! यामुळे रझाकारांची सर्वत्र दहशत होती, ती आजही चर्चिली जाते.निजाम स्टेट मधील कुणी भारताचे गुणगाण करतो का, घरांवर तिरंगा फडकवितो का, निजामा विरुद्ध बोलतो का, करा त्यांचेवर अत्याचार, जाळा त्यांची घरे असे राक्षसी कृत्य रझाकार करीत असत. निजाम स्टेटची सीमा विदर्भ क्षेत्रातील वर्धा नदीपर्यंत होती. तिकडे मराठवाड्याचा काही भाग निजामात होता. आपल्याकडील या भागापुरते बोलायचे झाल्यास, राजूरा परिसर निजामात येत होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण, या स्वातंत्र्याचा जल्लोष निजाम स्टेट मध्ये केला गेला नाही. तेथील जनतेला तो करु दिला गेला नाही. गांधीजींच्या विचाराच्या प्रचाराला तेथे बंदी होती. आम्ही भारतात विलीन होणार नाही ही निजाम स्टेटच्या बादशहाची आणि रजाकार यांची प्रतिज्ञाच होती. पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार पटेल यांचे निजाम भारतात विलीन करण्याचे स्वप्न धुळीला मिळवू अशी ते वल्गना करीत. अशाही स्थितीत निजामातील भारत समर्थक भारतात विलीन होण्याच्या दुर्षेने पेटून उठले होते. रझाकारांविरुद्ध लोकांचा असंतोष भडकू लागला होता. भितीच्या ठिकाणी संतापची आग पसरत ‘भारत माता की जय’ आणि ‘म. गांधी की जय’चे नारे गुंजू लागले होते. त्यांचा हा आवाज दडपण्याचा प्रयत्न निजामाच्या सेनेकडून होत होता. निजाम सहजासहजी नमत नसल्याचे बघून सरदार पटेल यांनी कडक पाऊल उचलले आणि निजामाविरुद्ध सैनिकी कारवाई करुन भारतात विलीन केले. ही कारवाई मराठवाडा सोबतच विदर्भातील शेवटच्या टोकावरील बल्लारपूर जवळील वर्धा नदीवरील दुधोली रेल्वे पुलाजवळून करण्यात आली होती. दुधोली जवळ सैनिकी छावणी उभारुन नदी पलीकडे रझाकारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते, छावणीतील जवानांना बल्लारपूरवरुन रेल्वेने पाणी, खाण्याचे पदार्थ पाठविले जात असे, तशी आठवण येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी शितलसिंह बजगोती यांनी लोकमतला सांगितले. ठरलेल्या दिवशी १६ सप्टेंबर १९४८ ला पुलावरुन निजाम विरुद्ध कारवाई सुरु झाली. निजाम स्टेट मधील स्वातंत्र्याविरांनी या कारवाईत भारतीय जवानांना रझाकारांचे अड्डे दाखविण्याला मदत केली. त्यात राजूरा, सास्ती, पेलोरा येथील स्वातंत्र्य प्रेमींचा समावेश होता. या घटनांची आज परत आठवण होण्याचे कारण या घटनांवर बनलेला रझाकार हा नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट! रझाकारांची अरेरावी, त्यांची दडपशाही या साऱ्या गोष्टी या चित्रपटात दाखविल्या आहेत, निजामातील लोकांनी रझाकारांना न जुमानता स्वातंत्र्याकरिता कसा कसा लढा दिला याचा प्रसंग आणि संवादातून माहिती देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. यात प्रतिनिधी रूपात एक खेडे दाखविले आहे. ते मराठवाड्यातील की राजूरा कडील हे समजायला मार्ग नाही. कारण, त्या खेड्यातील भाषा कधी मराठवाड्याची तर कधी राजुरा भागात बोलली जाणारी दिसते. निजामावर भारताकडून जी कारवाई करण्यात आली, त्यात काही महत्वाची ठिकाणं आहेत. या चित्रपटाच्या शेवटी त्या स्थळांचा यात उल्लेख करावयाला हवा होता. रझाकारांकडून झालेल्या अत्याचाराच्या घटना राजुरा- बल्लारपूर भागात आजही चर्चिल्या जातात. ही कारवाई बघितलेले काही साक्षीदार आजही हयात आहेत. सिद्धार्थ जाधव, ज्योती सुभाष यांनी व इतर सर्वच कलावंतानी चांगली कामे केली आहेत. हा चित्रपट आजच्या पिढीला त्याकाळचा इतिहास सांगतात.