शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही घोडणकप्पीचे कोलाम पितात नाल्यातील पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST

फोटो बी.यू. बोर्डेवार राजुरा : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. मात्र, अजूनही ग्रामीण दऱ्याखोऱ्यांतील आदिवासी कोलाम नाल्यातील ...

फोटो

बी.यू. बोर्डेवार

राजुरा : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. मात्र, अजूनही ग्रामीण दऱ्याखोऱ्यांतील आदिवासी कोलाम नाल्यातील पाणी पीत आहेत. ही मोठी शोकांतिका आहे. असेच एक गाव आहे घोडणकप्पी. जिथे रस्ता नाही, पाणीही नाही.

शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना दररोज डोंगरावरची खडकाळ वाट चढावी लागते. महिलांना दररोज पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून गावालगतच्या ओढ्यात खड्डा करून त्यात पाणी झिरपण्याची प्रतीक्षा करावी लागते. ताटव्यांनी उभारलेल्या झोपड्या आणि सभोवताली डंख मारण्यासाठी टपलेल्या सापाच्या भीतीचे सावट. प्रश्न हेच आपले जीवन, समस्या हेच आपले नशीब, असे मानून पिढ्यांमागून पिढ्या पुढे सरकत आहेत. रोजगार नाही, जनजागृती नाही. अधिकारी नाही, पदाधिकारी नाही. कुठल्या शासकीय योजना नाहीत, तेच अज्ञान, तीच बुवाबाजी.

याबाबत येथील कोलाम बांधवांनी अनेकदा ओरड केली. मात्र, त्यांची ओरड त्यांच्या गावापर्यंतच राहिली. ती प्रशासनापर्यंत पोहोचलीच नाही. पोहोचली असेल तरी ती अधिकाऱ्यांना ऐकायची नसावी. त्यामुळे त्यांच्या समस्या आजही कायम आहेत. आता तर या बांधवांनी ओरड करणेही बंद केले आहे. वाट्याला आलेले खरतड आयुष्य हेच नशीब म्हणून ते जगत आहेत. राजुरा तालुक्यात अनेक कोलाम वस्त्या असून, पहाडाच्या लगत असलेल्या अनेक कोलाम वस्त्या अजूनही दुर्लक्षित राहिल्या आहेत.

बॉक्स

या उपेक्षित वस्तीवर तिरंगा फडकवू या

७४ वर्षांत सरकारने दुर्लक्षिलेल्या या वस्तीवर स्वातंत्र्याचे गीत गाऊ या, थोडेसे श्रमदान करून घोडणकप्पीचा रस्ता निर्माण करू या, स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावू या, घोडणकप्पीत तिरंगा फडकवू या, असे आवाहन कोलाम विकास फाउंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी केले आहे.

130821\img-20210813-wa0283.jpg

नाल्यातील पाणी घेताना कोलम