शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही घोडणकप्पीचे कोलाम पितात नाल्यातील पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST

फोटो बी.यू. बोर्डेवार राजुरा : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. मात्र, अजूनही ग्रामीण दऱ्याखोऱ्यांतील आदिवासी कोलाम नाल्यातील ...

फोटो

बी.यू. बोर्डेवार

राजुरा : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. मात्र, अजूनही ग्रामीण दऱ्याखोऱ्यांतील आदिवासी कोलाम नाल्यातील पाणी पीत आहेत. ही मोठी शोकांतिका आहे. असेच एक गाव आहे घोडणकप्पी. जिथे रस्ता नाही, पाणीही नाही.

शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना दररोज डोंगरावरची खडकाळ वाट चढावी लागते. महिलांना दररोज पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून गावालगतच्या ओढ्यात खड्डा करून त्यात पाणी झिरपण्याची प्रतीक्षा करावी लागते. ताटव्यांनी उभारलेल्या झोपड्या आणि सभोवताली डंख मारण्यासाठी टपलेल्या सापाच्या भीतीचे सावट. प्रश्न हेच आपले जीवन, समस्या हेच आपले नशीब, असे मानून पिढ्यांमागून पिढ्या पुढे सरकत आहेत. रोजगार नाही, जनजागृती नाही. अधिकारी नाही, पदाधिकारी नाही. कुठल्या शासकीय योजना नाहीत, तेच अज्ञान, तीच बुवाबाजी.

याबाबत येथील कोलाम बांधवांनी अनेकदा ओरड केली. मात्र, त्यांची ओरड त्यांच्या गावापर्यंतच राहिली. ती प्रशासनापर्यंत पोहोचलीच नाही. पोहोचली असेल तरी ती अधिकाऱ्यांना ऐकायची नसावी. त्यामुळे त्यांच्या समस्या आजही कायम आहेत. आता तर या बांधवांनी ओरड करणेही बंद केले आहे. वाट्याला आलेले खरतड आयुष्य हेच नशीब म्हणून ते जगत आहेत. राजुरा तालुक्यात अनेक कोलाम वस्त्या असून, पहाडाच्या लगत असलेल्या अनेक कोलाम वस्त्या अजूनही दुर्लक्षित राहिल्या आहेत.

बॉक्स

या उपेक्षित वस्तीवर तिरंगा फडकवू या

७४ वर्षांत सरकारने दुर्लक्षिलेल्या या वस्तीवर स्वातंत्र्याचे गीत गाऊ या, थोडेसे श्रमदान करून घोडणकप्पीचा रस्ता निर्माण करू या, स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावू या, घोडणकप्पीत तिरंगा फडकवू या, असे आवाहन कोलाम विकास फाउंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी केले आहे.

130821\img-20210813-wa0283.jpg

नाल्यातील पाणी घेताना कोलम