शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३८ वर्षांनंतरही अतिक्रमणधारक शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: September 12, 2015 01:02 IST

तालुक्यातील मौजा अंतरगाव पारडवाही येथील सन १९५९ मधील आराजी ८९.२२ हेक्टर जागेवर सन १९७७-७८ या वर्षात

मूल : तालुक्यातील मौजा अंतरगाव पारडवाही येथील सन १९५९ मधील आराजी ८९.२२ हेक्टर जागेवर सन १९७७-७८ या वर्षात अतिक्रमन करुन उपजिविका करणाऱ्या शेतकऱ्यांना ३८ वर्षानंतरही न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. कागदाची जुळवाजुळव केल्यानंतर शासनाने तीन पिढ्यांचा पुरावा आणण्याची अट घातल्याने पुरावा आणणार कुठून, असा प्रश्न अतिक्रमणधारक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारणा नियम २०१२ ची अंमलबजावणी करण्याकरिता गैर आदिवासी वनहक्क वैयक्तिक दावे तपासणीकरिता मूल तालुक्यातील तलाठी साजा क्र. ४ मधील भूमापन क्र. १५९ मधील ८९.२२ हेक्टर आर शेतजमिनीवरील ६० अतिक्रमणधारकांनी प्रस्ताव सादर करण्यात आला. गेल्या १९७७-७८ या वर्षापासून ३८ वर्षानंतरही या शेतीवर शेकडो कुटुंब शेती करीत आहेत. याबाबत तहसीलदार मूल येथे नोंदसुद्धा आहे. कागदांची जुळवाजुळव करुन दावे सादर करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार गेल्या ३८ वर्षापासून सुरु आहे. मध्यंतरीच्या काळात सादर केलेल्या प्रस्तावाला पावसाळ्यात पाणी लागल्याने तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सदर प्रस्ताव सुकविण्यासाठी तहसील कार्यालयाच्या पटांगणावर ठेवले. त्यावेळी मोकाट फिरणाऱ्या जनावरांनी तो प्रस्तावच खाऊन फस्त केल्याने तहसील कार्यालयातील संबंधित लिपिकांची भंबेरी उडाली होती. त्यावेळीसुद्धा अतिक्रमणधारकांनी कागदाची जुळवाजुळव करुन दावे तयार केले. मात्र निराशा दिसत असल्याचा आरोप चंद्रभान कामडी व इतरांनी केला आहे.सदर शेती अतिक्रमणधारकाच्या नावे न झाल्याने दरवर्षी पाण्याचे साधन नसल्याने एका पावसाने पिके गमवावी लागत आहे. गेल्या ३८ वर्षापासून अतिक्रमणधारकांच्या नावे शेतजमीन झाली असती तर सिंचनाची सोय करता आली असती. मात्र नावावर शेती नसल्याने सिंचनापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. अतिक्रमणानंतर वनविभागाने अतिक्रमण करण्यास मनाई केली होती. मात्र वनहक्क समितीच्या सदस्यांनी या शेतजमिनीवरचा ताबा न सोडता शासनदरबारी तक्रार केली. त्यावेळी वनविभागाने दंडसुद्धा ठोठावला. तो दंड शेतकऱ्यांनी भरला. सातबाऱ्यावर त्यांची नोंदसुद्धा आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २८ नोव्हेंबर १९९१ च्या शासन निर्णयानुसार अतिक्रमणधारकांना स्थायी पट्टे देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णयाची अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.(तालुका प्रतिनिधी)