शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

३८ वर्षांनंतरही अतिक्रमणधारक शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: September 12, 2015 01:02 IST

तालुक्यातील मौजा अंतरगाव पारडवाही येथील सन १९५९ मधील आराजी ८९.२२ हेक्टर जागेवर सन १९७७-७८ या वर्षात

मूल : तालुक्यातील मौजा अंतरगाव पारडवाही येथील सन १९५९ मधील आराजी ८९.२२ हेक्टर जागेवर सन १९७७-७८ या वर्षात अतिक्रमन करुन उपजिविका करणाऱ्या शेतकऱ्यांना ३८ वर्षानंतरही न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. कागदाची जुळवाजुळव केल्यानंतर शासनाने तीन पिढ्यांचा पुरावा आणण्याची अट घातल्याने पुरावा आणणार कुठून, असा प्रश्न अतिक्रमणधारक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारणा नियम २०१२ ची अंमलबजावणी करण्याकरिता गैर आदिवासी वनहक्क वैयक्तिक दावे तपासणीकरिता मूल तालुक्यातील तलाठी साजा क्र. ४ मधील भूमापन क्र. १५९ मधील ८९.२२ हेक्टर आर शेतजमिनीवरील ६० अतिक्रमणधारकांनी प्रस्ताव सादर करण्यात आला. गेल्या १९७७-७८ या वर्षापासून ३८ वर्षानंतरही या शेतीवर शेकडो कुटुंब शेती करीत आहेत. याबाबत तहसीलदार मूल येथे नोंदसुद्धा आहे. कागदांची जुळवाजुळव करुन दावे सादर करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार गेल्या ३८ वर्षापासून सुरु आहे. मध्यंतरीच्या काळात सादर केलेल्या प्रस्तावाला पावसाळ्यात पाणी लागल्याने तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सदर प्रस्ताव सुकविण्यासाठी तहसील कार्यालयाच्या पटांगणावर ठेवले. त्यावेळी मोकाट फिरणाऱ्या जनावरांनी तो प्रस्तावच खाऊन फस्त केल्याने तहसील कार्यालयातील संबंधित लिपिकांची भंबेरी उडाली होती. त्यावेळीसुद्धा अतिक्रमणधारकांनी कागदाची जुळवाजुळव करुन दावे तयार केले. मात्र निराशा दिसत असल्याचा आरोप चंद्रभान कामडी व इतरांनी केला आहे.सदर शेती अतिक्रमणधारकाच्या नावे न झाल्याने दरवर्षी पाण्याचे साधन नसल्याने एका पावसाने पिके गमवावी लागत आहे. गेल्या ३८ वर्षापासून अतिक्रमणधारकांच्या नावे शेतजमीन झाली असती तर सिंचनाची सोय करता आली असती. मात्र नावावर शेती नसल्याने सिंचनापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. अतिक्रमणानंतर वनविभागाने अतिक्रमण करण्यास मनाई केली होती. मात्र वनहक्क समितीच्या सदस्यांनी या शेतजमिनीवरचा ताबा न सोडता शासनदरबारी तक्रार केली. त्यावेळी वनविभागाने दंडसुद्धा ठोठावला. तो दंड शेतकऱ्यांनी भरला. सातबाऱ्यावर त्यांची नोंदसुद्धा आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २८ नोव्हेंबर १९९१ च्या शासन निर्णयानुसार अतिक्रमणधारकांना स्थायी पट्टे देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णयाची अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.(तालुका प्रतिनिधी)