शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

संविधानामुळे सामाजिक न्यायाची प्रतिष्ठापना

By admin | Updated: March 11, 2016 01:38 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे वर्ष आहे. त्यांनी जगाला मार्गदर्शन करण्याची शक्ती संविधानाच्या माध्यमातून दिली.

खुशाल तेलंग यांचे प्रतिपादन : समतापर्व रॅलीचे विसापूर व नांदगाव (पोडे) येथे स्वागतबल्लारपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे वर्ष आहे. त्यांनी जगाला मार्गदर्शन करण्याची शक्ती संविधानाच्या माध्यमातून दिली. मात्र विद्यमान सरकार संविधानाला नाकारण्याची भूमिका पार पाडताना दिसत आहे. त्यांची तशी मानसिकता प्रकट होत आहे. लोकशाही प्रगल्भ होत असताना हुकूमशाहीच्या वल्गना केल्या जात आहे. संविधानाच्या माध्यमातून देशात समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाकडे वाटचाल सुरु असून सामाजिक न्यायाची प्रतिष्ठापना करीत आहे, असे प्रतिपादन समता अभियान पर्व व संविधान सन्मान रॅलीचे संयोजक खुशाल तेलंग यांनी मंगळवारी नांदगाव (पोडे) व विसापूर येथील कार्यक्रमात केले.अखिल भारतीय समता सैनिक दल जिल्हा शाखेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून समता अभियान पर्व व संविधान सन्मान रॅलीचा चंद्रपूर येथून प्रारंभ झाला. या रॅलीचे स्वागत बल्लारपूर, विसापूर व नांदगाव (पोडे) येथे करण्यात आले. यावेळी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ही रॅली ७ मार्च पासून ८ एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील १२५ ठिकाणी सामाजिक जागृती व प्रबोधनातून संवाद साधणार आहे. रॅली सोबत समता सैनिक दलाचे पथक व्यवस्था सांभाळत आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर रॅलीचे आगमन झाले. येथे सामाजिक कार्यकर्ते तुळशिराम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधन सभा घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खुशाल तेलंग, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी सचिव जी. के. उपरे, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, पी. एल. शेंडे, मनोहर जयकर, पंढरी मानकर, प्रजेश घडसे, भाऊराव तुंबडे यांची उपस्थिती होती.दरम्यान समता सैनिक दलाच्या पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना दिली. प्रास्ताविक प्रजेश घडसे यांनी केले. रिता जिलटे, जी. के. उपरे व प्रमोद देठे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संचालन व आभार भाऊराव तुंबडे यांनी केले. यावेळी समाज बांधवाची मोठ्या प्रमाणत उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)