शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

आॅटोरिक्षा चालकांचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करा

By admin | Updated: December 23, 2014 23:02 IST

राज्यातील आॅटोरिक्षा चालकांचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी महाराष्ट्र आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना चंद्रपूरने केली होती. राज्य शासनाने तसे आश्वासन दिले होते.

चंद्रपूर : राज्यातील आॅटोरिक्षा चालकांचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी महाराष्ट्र आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना चंद्रपूरने केली होती. राज्य शासनाने तसे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही महामंडळ स्थापन करण्यात न आल्याने शासनाचे आश्वासन फोल ठरले आहे. शासनाने आश्वासनाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आॅटोरिक्षा संघटनेचे विदर्भ सचिव राजेंद्र खांडेकर यांनी केली आहे.राज्य सरकारने ७ आॅक्टोबर २०१३ रोजी अध्यादेशाद्वारे आॅटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळासाठी अभ्यास समिती स्थापन केली. अशासकीय सदस्य म्हणून अभ्यास समितीत माझाही सहभाग होता. त्यामुळे समितीचे अध्यक्ष तथा राज्याचे कामगार आयुक्त, समिती सचिव, सदस्यांनी राज्यातील विविध भागात जाऊन मंडळाविषयी आॅटोरिक्षा चालकांचे म्हणणे, सूचना ऐकून घ्याव्या हा प्रस्ताव अभ्यास समितीत मान्य करून घेण्यात आला. त्यानुसार अभ्यास समितीने विदर्भ-नागपूर, मराठवाडा आदी भागात जाऊन आॅटोरिक्षा चालकांशी संवाद साधला. यावेळेला त्या त्या विभागातील आॅटोरिक्षा संघटना प्रतिनिधींची बैठक कृती समितीने घेतली. या सर्व प्रक्रियेबद्दल आॅटोरिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. समितीने सर्वसाधारणत: दिलेल्या मुदतीच्या आसपास जानेवारीत कामगार मंत्र्यांकडे तर फेब्रुवारीत कामगार सचिवांकडे कल्याणकारी मंडळाविषयी समितीचा अहवाल, कायद्याचे व मंडळाचे स्वरूप सादर केले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत बैठक झाली. समितीने केलेल्या सर्व मागण्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, अजुनही आॅटोरिक्षा चालकांचे कल्याणकारी महामंडळ स्थापीत झाले नाही. नव्या सरकारने यावर तोडगा काढावा, अन्यथा आॅटोरिक्षा चालक रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा खांडेकर यांनी दिला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)