शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

राजोली परिसरात बीएसएनएल सेवेचा बोजवारा

By admin | Updated: October 6, 2016 01:34 IST

भारत संचार निगम या भारताच्या अग्रण्य दुरसंचार कंपनीची सेवा गेल्या काही महिन्यापासून पूर्णत: विस्कळीत झाली आहे.

राजोली : भारत संचार निगम या भारताच्या अग्रण्य दुरसंचार कंपनीची सेवा गेल्या काही महिन्यापासून पूर्णत: विस्कळीत झाली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासिन आणि हलगर्जी कारभारामुळे राजोली परिसरातील बीएसएनएल ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून आर्थिक भुर्दंडही बसत असल्याचे चित्र दिसत आहे.स्थानिय दुरसंचार केंद्रातील वीज पुरवठा खंडीत झाल्याबरोबर बीएसएनएलची दूरसंचार सेवा ठप्प पडत असून मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असतात. या केंद्रातील स्वयंचलीत बॅटरी सिस्टम नादुरूस्त असल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत झाला, तरीही सेवा ठप्प पडलेलीच असते. त्यामुळे आॅनलाईन सोबत जोडलेल्या शासकीय, निमशासकीय बँक आणि खासगी कार्यालयातील कामकाज बंद पडलेले असून त्याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत असते. ही बाब संबंधीत अधिकाऱ्याना माहित असूनही त्याकडे कानाडोळा केल्या जात असल्याचे ग्राहकात बोलले जात आहे. महिन्याच्या मुदतीतील विविध प्रीपेड प्लान ग्राहकांनी रिचार्ज केलेले असतात. परंतु येथील दूरसंचार सेवा १५ ते २० दिवसच सुरू राहत असल्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.मूल तालुक्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या उदासिन व बेजबाबदार प्रवृत्तीचा प्रत्यय येत असल्याचे ग्राहकाचे म्हणणे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी बीएसएनएल मोबाईल धारकांनी केली आहे. (वार्ताहर)