शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी पाच वर्षांनंतर तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 22:29 IST

पर्यटनासाठी पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेला घोडाझरी तलाव पाच वर्षांनंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लोचा आनंद लुटण्यासाठी तसेच घोडाझरीच्या नितळ, नैसर्गिक सौंदर्यांने डोळ्याचे पारणे फेडण्यासाठी पर्यटकांची पावले घोडाझरीची वाट चालू लागली आहेत.

ठळक मुद्देओव्हरफ्लोची झलक : पर्यटकांची मांदियाळी, नैसर्गिक सौंदर्य डोळे दीपवणारे

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : पर्यटनासाठी पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेला घोडाझरी तलाव पाच वर्षांनंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लोचा आनंद लुटण्यासाठी तसेच घोडाझरीच्या नितळ, नैसर्गिक सौंदर्यांने डोळ्याचे पारणे फेडण्यासाठी पर्यटकांची पावले घोडाझरीची वाट चालू लागली आहेत.नागभीड-चंद्रपूर राज्य महामार्गापासून ५ किमी तर नागभीडपासून ९ किमी अंतरावर हे स्थळ आहे. अतिशय मनोवेधक अशा गर्द वनराईने नटलेल्या जंगलातील रस्त्याने या तलावावर जावे लागते. जवळपास पाच किमीचा हा रस्ता आहे. पाच किमीच्या प्रवासात अनेक छोट्या-मोठ्या प्राण्यांचे दर्शन पर्यटकांसाठी पर्वणीच असते. यानंतर दर्शन होते ते विशाल अशा घोडाझरी तलावाचे.तिन्ही बाजूला असलेल्या नैसर्गिक टेकड्यांमध्ये बांध घालून इंग्रजांनी १९०५ मध्ये या तलावाची निर्मिती केली. जेव्हा इंग्रजांनी या तलावाची निर्मिती केली तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे सिंचन हा मुख्य हेतू होता. परंतु मागील अनेक वर्षांपासून सिंचनासोबतच पर्यटन हा हेतुही मोठ्या प्रमाणावर साध्य होत आहे. पर्यटनासाठी घोडाझरीची भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्याने येथे येणारा पर्यटक दिवसभरासाठी या स्थळाच्या मोहात पडतो. घोडाझरीच्या नव्या व्यवस्थापनाने याठिकाणी विविध सोयी पर्यटकांचा उपलब्ध करुन दिला. त्यामुळे त्यांचा आनंद आणखीच द्विगुणीत होत आहे.घोडाझरीतील या निसर्गसौंदयार्चा आनंद लुटण्यासाठी पर्यटक वर्षभर या ठिकाणी येत असतात. परंतु, घोडाझरीने आपली ओळख पावसाळी पर्यटनासाठीच निर्माण केली आहे. घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला की, ते नितळ नैसर्गिक देखावे, तो विशाल तलाव , तलावाभोवतीच्या त्या हिरव्या गर्द वनराईचे थबथबलेले विहंगम दृश्य डोळ्यांत साठविण्यासाठी आणि त्याचबरोबर सांडव्यावरून पडणाºया फेसाळलेल्या पाण्यात मनसोक्त डूंबण्यासाठी विदर्भातील अनेक पर्यटक या ठिकाणी गर्दी करीत असतात.पाच वर्षे दिली हुलकावणीसन २०१३ मध्ये हा तलाव ओव्हरफ्लो झाला होता. त्यानंतर पूरेशा पावसाअभावी हा तलाव ओव्हरफ्लो झालाच नाही. तब्बल पाच वर्षांनी म्हणजे रविवारी हा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. गेली दोन दिवस पावसाने उसंत घेतली. त्यामुळे तलाव ओव्हरफ्लो होतो की नाही, अशी शंका पर्यटकांमध्ये होती. मात्र डोंगराच्या झरपट्याने घोडाझरी तलाव तुडुंब भरला असून सांडव्यावरून पाणीसुद्धा फेकले जात आहे. दरवर्षी १५ आॅगस्टला या ठिकाणी मोठी गर्दी असते. आता ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांना आनंद घेता येणार आहे.

टॅग्स :Ghodazari Damघोडाझरी धरणtourismपर्यटन