शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

घोडाझरी पाच वर्षांनंतर तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 22:29 IST

पर्यटनासाठी पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेला घोडाझरी तलाव पाच वर्षांनंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लोचा आनंद लुटण्यासाठी तसेच घोडाझरीच्या नितळ, नैसर्गिक सौंदर्यांने डोळ्याचे पारणे फेडण्यासाठी पर्यटकांची पावले घोडाझरीची वाट चालू लागली आहेत.

ठळक मुद्देओव्हरफ्लोची झलक : पर्यटकांची मांदियाळी, नैसर्गिक सौंदर्य डोळे दीपवणारे

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : पर्यटनासाठी पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेला घोडाझरी तलाव पाच वर्षांनंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लोचा आनंद लुटण्यासाठी तसेच घोडाझरीच्या नितळ, नैसर्गिक सौंदर्यांने डोळ्याचे पारणे फेडण्यासाठी पर्यटकांची पावले घोडाझरीची वाट चालू लागली आहेत.नागभीड-चंद्रपूर राज्य महामार्गापासून ५ किमी तर नागभीडपासून ९ किमी अंतरावर हे स्थळ आहे. अतिशय मनोवेधक अशा गर्द वनराईने नटलेल्या जंगलातील रस्त्याने या तलावावर जावे लागते. जवळपास पाच किमीचा हा रस्ता आहे. पाच किमीच्या प्रवासात अनेक छोट्या-मोठ्या प्राण्यांचे दर्शन पर्यटकांसाठी पर्वणीच असते. यानंतर दर्शन होते ते विशाल अशा घोडाझरी तलावाचे.तिन्ही बाजूला असलेल्या नैसर्गिक टेकड्यांमध्ये बांध घालून इंग्रजांनी १९०५ मध्ये या तलावाची निर्मिती केली. जेव्हा इंग्रजांनी या तलावाची निर्मिती केली तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे सिंचन हा मुख्य हेतू होता. परंतु मागील अनेक वर्षांपासून सिंचनासोबतच पर्यटन हा हेतुही मोठ्या प्रमाणावर साध्य होत आहे. पर्यटनासाठी घोडाझरीची भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्याने येथे येणारा पर्यटक दिवसभरासाठी या स्थळाच्या मोहात पडतो. घोडाझरीच्या नव्या व्यवस्थापनाने याठिकाणी विविध सोयी पर्यटकांचा उपलब्ध करुन दिला. त्यामुळे त्यांचा आनंद आणखीच द्विगुणीत होत आहे.घोडाझरीतील या निसर्गसौंदयार्चा आनंद लुटण्यासाठी पर्यटक वर्षभर या ठिकाणी येत असतात. परंतु, घोडाझरीने आपली ओळख पावसाळी पर्यटनासाठीच निर्माण केली आहे. घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला की, ते नितळ नैसर्गिक देखावे, तो विशाल तलाव , तलावाभोवतीच्या त्या हिरव्या गर्द वनराईचे थबथबलेले विहंगम दृश्य डोळ्यांत साठविण्यासाठी आणि त्याचबरोबर सांडव्यावरून पडणाºया फेसाळलेल्या पाण्यात मनसोक्त डूंबण्यासाठी विदर्भातील अनेक पर्यटक या ठिकाणी गर्दी करीत असतात.पाच वर्षे दिली हुलकावणीसन २०१३ मध्ये हा तलाव ओव्हरफ्लो झाला होता. त्यानंतर पूरेशा पावसाअभावी हा तलाव ओव्हरफ्लो झालाच नाही. तब्बल पाच वर्षांनी म्हणजे रविवारी हा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. गेली दोन दिवस पावसाने उसंत घेतली. त्यामुळे तलाव ओव्हरफ्लो होतो की नाही, अशी शंका पर्यटकांमध्ये होती. मात्र डोंगराच्या झरपट्याने घोडाझरी तलाव तुडुंब भरला असून सांडव्यावरून पाणीसुद्धा फेकले जात आहे. दरवर्षी १५ आॅगस्टला या ठिकाणी मोठी गर्दी असते. आता ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांना आनंद घेता येणार आहे.

टॅग्स :Ghodazari Damघोडाझरी धरणtourismपर्यटन