शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By admin | Updated: July 9, 2016 00:59 IST

गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दिवसभर कायम राहिला. जिल्ह्यातील सर्व भागात हा पाऊस झाला.

जलसाठ्यात वाढ : संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीतचंद्रपूर : गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दिवसभर कायम राहिला. जिल्ह्यातील सर्व भागात हा पाऊस झाला. या संततधार पावसाने शुक्रवारी जराही उसंत घेतली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, जिल्ह्यातील एकाही गावाचा संपर्क तुटल्याचे वृत्त नाही. आज दिवसभर जिल्ह्यात ७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ३५३.१६ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात अधेमधे पाऊस बरसत आहे. मात्र हा पाऊस अर्धा-एक तासच पडत असल्याने जलसाठ्यात पाहिजे तशी वाढ झालेली नाही. शिवाय जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडला तर काही भाग कोरडाच राहत होता. दरम्यान, गुरुवारी दिवसभर पाऊस आला नाही. मात्र मागील सहा दिवस ढगाळ वातावरण कायम राहिले. गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजतापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. चंद्रपूरसह बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती, मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, भद्रावती, वरोरा, चिमूर या सर्व तालुक्यात एकाचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. रात्रीपासून पडत असलेला पाऊस सकाळी थांबेल असे वाटत होते. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची झड कायम होती. दिवसभरही पावसाने उसंत घेतली नाही. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने जिल्हाभरात जवजीवनावर मोठा परिणाम झाला. नागरिकांना रेनकोट, छत्र्या घेऊनच बाहेर पडावे लागत होते. एरवी गजबजलेली चंद्रपूरची बाजारपेठ आज दिवसभर पावसाच्या झडीमुळे ग्राहकांअभावी ओस पडल्याचे दिसून येत होते. सध्या जिल्ह्यात कापूस आणि धान पिकांच्या जवळपास ९० टक्के पेरण्या झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक भागात पावसाची उसंत नसल्याने पेरण्या खोळंबल्याचे दिसून येते. आजही दिवसभर पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना काहीच करता आले नाही. विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांच्या आधीच पेरण्या झाल्या आहेत, त्यांच्यासाठी आजचा पाऊस अत्यंत लाभदायक ठरला आहे. जमिनीत पाणी साठले की चिखल करता येणे शेतकऱ्यांना शक्य आहे. तसे झाले तर पुढील आठवड्यात धानपट्यात रोवणीच्या कामांनाही प्रारंभ होईल.आतापर्यंत एकदाही दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे सोयाबीनच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. ३० ते ४० टक्केच सोयाबीनच्या पेरण्या होऊ शकल्या. मात्र आज जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडल्यामुळे सोयाबीन उत्पादकांना याचा चांगला फायदा होणार आहे. (शहर प्रतिनिधी)शासनाच्या आकडेवारीमुळे संभ्रमावस्थागुरुवारी जिल्ह्यात एकूण १३७.९ मिमी पावसाची नोंद झाली. म्हणजेच सरासरी ९.१९ मिमी पाऊस झाला. तर शुक्रवारी दिवसभर ७५ मिमी पाऊस पडल्याची माहिती आहे. शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत एकूण ५, २९७.५ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. म्हणजेच सरासरी ३५३.१६ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. मात्र शेतकरी आणि जाणकारांचे मते जिल्ह्यात आतापर्यंत ५२९७.५ मिमी पाऊस पडलाच नाही. त्यामुळे शासकीय आकडेवारीमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आठवडी बाजारांवर परिणामआज शुक्रवारी चिमूर, कोरपना यासह अनेक ठिकाणी आठवडी बाजार होता. सकाळपासून सुरू असलेला पाऊस नंतर थांबेल, अशी आशा असल्याने दुकानदारांनी नेहमीप्रमाणे आठवडी बाजारांसाठी तयारी केली. मात्र दिवसभर संततधार पाऊस सुरू असल्याने आठवडी बाजारांवरही परिणाम झाला. बाजारात ग्राहकांची गर्दीच नसल्याने आठवडी बाजारावर अवकाळा आल्याचे दिसून येत होते. नदी-नाल्यांचा जलस्तर वाढलामागील सहा दिवसात अधेमधे पाऊस पडत राहिला. मात्र पावसाच्या सरी दमदार नसल्याने नदी-नाल्यात व सिंचन प्रकल्पातील जलसाठा पाहिजे तसा वाढला नाही. मात्र गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दिवसभर संततधार पाऊस पडल्याने नदी-नाल्यातील जलस्तर वाढला आहे. सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे.