शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By admin | Updated: July 9, 2016 00:59 IST

गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दिवसभर कायम राहिला. जिल्ह्यातील सर्व भागात हा पाऊस झाला.

जलसाठ्यात वाढ : संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीतचंद्रपूर : गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दिवसभर कायम राहिला. जिल्ह्यातील सर्व भागात हा पाऊस झाला. या संततधार पावसाने शुक्रवारी जराही उसंत घेतली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, जिल्ह्यातील एकाही गावाचा संपर्क तुटल्याचे वृत्त नाही. आज दिवसभर जिल्ह्यात ७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ३५३.१६ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात अधेमधे पाऊस बरसत आहे. मात्र हा पाऊस अर्धा-एक तासच पडत असल्याने जलसाठ्यात पाहिजे तशी वाढ झालेली नाही. शिवाय जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडला तर काही भाग कोरडाच राहत होता. दरम्यान, गुरुवारी दिवसभर पाऊस आला नाही. मात्र मागील सहा दिवस ढगाळ वातावरण कायम राहिले. गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजतापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. चंद्रपूरसह बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती, मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, भद्रावती, वरोरा, चिमूर या सर्व तालुक्यात एकाचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. रात्रीपासून पडत असलेला पाऊस सकाळी थांबेल असे वाटत होते. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची झड कायम होती. दिवसभरही पावसाने उसंत घेतली नाही. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने जिल्हाभरात जवजीवनावर मोठा परिणाम झाला. नागरिकांना रेनकोट, छत्र्या घेऊनच बाहेर पडावे लागत होते. एरवी गजबजलेली चंद्रपूरची बाजारपेठ आज दिवसभर पावसाच्या झडीमुळे ग्राहकांअभावी ओस पडल्याचे दिसून येत होते. सध्या जिल्ह्यात कापूस आणि धान पिकांच्या जवळपास ९० टक्के पेरण्या झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक भागात पावसाची उसंत नसल्याने पेरण्या खोळंबल्याचे दिसून येते. आजही दिवसभर पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना काहीच करता आले नाही. विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांच्या आधीच पेरण्या झाल्या आहेत, त्यांच्यासाठी आजचा पाऊस अत्यंत लाभदायक ठरला आहे. जमिनीत पाणी साठले की चिखल करता येणे शेतकऱ्यांना शक्य आहे. तसे झाले तर पुढील आठवड्यात धानपट्यात रोवणीच्या कामांनाही प्रारंभ होईल.आतापर्यंत एकदाही दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे सोयाबीनच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. ३० ते ४० टक्केच सोयाबीनच्या पेरण्या होऊ शकल्या. मात्र आज जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडल्यामुळे सोयाबीन उत्पादकांना याचा चांगला फायदा होणार आहे. (शहर प्रतिनिधी)शासनाच्या आकडेवारीमुळे संभ्रमावस्थागुरुवारी जिल्ह्यात एकूण १३७.९ मिमी पावसाची नोंद झाली. म्हणजेच सरासरी ९.१९ मिमी पाऊस झाला. तर शुक्रवारी दिवसभर ७५ मिमी पाऊस पडल्याची माहिती आहे. शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत एकूण ५, २९७.५ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. म्हणजेच सरासरी ३५३.१६ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. मात्र शेतकरी आणि जाणकारांचे मते जिल्ह्यात आतापर्यंत ५२९७.५ मिमी पाऊस पडलाच नाही. त्यामुळे शासकीय आकडेवारीमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आठवडी बाजारांवर परिणामआज शुक्रवारी चिमूर, कोरपना यासह अनेक ठिकाणी आठवडी बाजार होता. सकाळपासून सुरू असलेला पाऊस नंतर थांबेल, अशी आशा असल्याने दुकानदारांनी नेहमीप्रमाणे आठवडी बाजारांसाठी तयारी केली. मात्र दिवसभर संततधार पाऊस सुरू असल्याने आठवडी बाजारांवरही परिणाम झाला. बाजारात ग्राहकांची गर्दीच नसल्याने आठवडी बाजारावर अवकाळा आल्याचे दिसून येत होते. नदी-नाल्यांचा जलस्तर वाढलामागील सहा दिवसात अधेमधे पाऊस पडत राहिला. मात्र पावसाच्या सरी दमदार नसल्याने नदी-नाल्यात व सिंचन प्रकल्पातील जलसाठा पाहिजे तसा वाढला नाही. मात्र गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दिवसभर संततधार पाऊस पडल्याने नदी-नाल्यातील जलस्तर वाढला आहे. सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे.