शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

लंच ब्रेकच्या ‘त्या’ आदेशामुळे सामान्यांमध्ये आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:51 IST

शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लंच टाईम आता अर्ध्या तासांचाच राहणार आहे. दुपारच्या जेवणासाठी दुपारी एक ते दोनची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कार्यालयातील सर्वांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देअर्ध्या तासातच करावे लागणार भोजन : कार्यालयीन वेळेतील सामूहिक भोजनाला आळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लंच टाईम आता अर्ध्या तासांचाच राहणार आहे. दुपारच्या जेवणासाठी दुपारी एक ते दोनची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कार्यालयातील सर्वांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.आता शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या जेवणासाठी अर्ध्या तासाची वेळ निश्चित केली आहे. १८ सप्टेंबर २००१ च्या शासन परिपत्रकाद्वारे मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाºयांसाठी दुपारी एक ते दोन दरम्यान अर्ध्या तासाची जेवणाची वेळ निश्चित केली आहे. पण मंत्रालया व्यतिरिक्त इतर राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांसाठी दुपारची जेवणाची वेळ निश्चित नव्हती. त्यामुळे जनतेशी थेट संबंध असलेल्या कार्यालयात सर्वसामान्य लोक तक्रारी व गाºहाणी घेऊन येतात. तेव्हा बरेचदा अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. याबाबत संबंधित कार्यालयात विचारणा केल्यास जेवणाची वेळ असल्याचे सांगण्यात येत होेते. विविध सरकारी कार्यालयात दुपारच्या जेवणाची वेळ कार्यालयाच्या सोयीने ठरवली जाते. त्यामुळे नागरिकांचे कामे होत नाहीत. त्यामुळे कर्मचाºयांच्या जेवणाची वेळ निश्चित करण्याचा सरकारचा विचार होता, असे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात नमूद केले आहे. यामुळे मात्र नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.पालिका, पंचायतमध्येही लागू करावानगरपालिका, पंचायत समिती, महावितरण, टपाल कार्यालय, कृषी कार्यालय आदी अनेक सरकारी कार्यालयात दुपारी १ ते ३ या वेळेत अधिकारी कर्मचारी दिसत नाही. सोहब जेवायला गेले, ही नेहमीची सबब सांगितली जाते. विशेष म्हणजे, दुपारी १ ला घरी जेवायला गेलेले अनेक कर्मचारी थेट ड्युटी संपतेवेळी येतात. सर्वशासकीय कार्यालयाची हिच स्थिती आहे. त्यामुळे नव्याने काढण्यात आलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी कितपत होते, हे काही दिवसातच कळणार आहे.विभागप्रमुखांना घ्यावी लागणार दक्षतानवीन आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाºयांसाठी दुपारच्या भोजनासाठी दुपारी १ ते २ या दरम्यान अर्ध्या तासाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. दुपारच्या जेवणासाठी अधिकारी व कर्मचारी ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेणार नाही. एकाच विभाग अथवा शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी एकाच वेळेस जेवणासाठी जाणार नाही, याची कार्यालयाच्या विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे आदेश जारी केले.