शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

लंच ब्रेकच्या ‘त्या’ आदेशामुळे सामान्यांमध्ये आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:51 IST

शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लंच टाईम आता अर्ध्या तासांचाच राहणार आहे. दुपारच्या जेवणासाठी दुपारी एक ते दोनची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कार्यालयातील सर्वांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देअर्ध्या तासातच करावे लागणार भोजन : कार्यालयीन वेळेतील सामूहिक भोजनाला आळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लंच टाईम आता अर्ध्या तासांचाच राहणार आहे. दुपारच्या जेवणासाठी दुपारी एक ते दोनची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कार्यालयातील सर्वांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.आता शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या जेवणासाठी अर्ध्या तासाची वेळ निश्चित केली आहे. १८ सप्टेंबर २००१ च्या शासन परिपत्रकाद्वारे मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाºयांसाठी दुपारी एक ते दोन दरम्यान अर्ध्या तासाची जेवणाची वेळ निश्चित केली आहे. पण मंत्रालया व्यतिरिक्त इतर राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांसाठी दुपारची जेवणाची वेळ निश्चित नव्हती. त्यामुळे जनतेशी थेट संबंध असलेल्या कार्यालयात सर्वसामान्य लोक तक्रारी व गाºहाणी घेऊन येतात. तेव्हा बरेचदा अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. याबाबत संबंधित कार्यालयात विचारणा केल्यास जेवणाची वेळ असल्याचे सांगण्यात येत होेते. विविध सरकारी कार्यालयात दुपारच्या जेवणाची वेळ कार्यालयाच्या सोयीने ठरवली जाते. त्यामुळे नागरिकांचे कामे होत नाहीत. त्यामुळे कर्मचाºयांच्या जेवणाची वेळ निश्चित करण्याचा सरकारचा विचार होता, असे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात नमूद केले आहे. यामुळे मात्र नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.पालिका, पंचायतमध्येही लागू करावानगरपालिका, पंचायत समिती, महावितरण, टपाल कार्यालय, कृषी कार्यालय आदी अनेक सरकारी कार्यालयात दुपारी १ ते ३ या वेळेत अधिकारी कर्मचारी दिसत नाही. सोहब जेवायला गेले, ही नेहमीची सबब सांगितली जाते. विशेष म्हणजे, दुपारी १ ला घरी जेवायला गेलेले अनेक कर्मचारी थेट ड्युटी संपतेवेळी येतात. सर्वशासकीय कार्यालयाची हिच स्थिती आहे. त्यामुळे नव्याने काढण्यात आलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी कितपत होते, हे काही दिवसातच कळणार आहे.विभागप्रमुखांना घ्यावी लागणार दक्षतानवीन आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाºयांसाठी दुपारच्या भोजनासाठी दुपारी १ ते २ या दरम्यान अर्ध्या तासाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. दुपारच्या जेवणासाठी अधिकारी व कर्मचारी ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेणार नाही. एकाच विभाग अथवा शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी एकाच वेळेस जेवणासाठी जाणार नाही, याची कार्यालयाच्या विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे आदेश जारी केले.