शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
3
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
4
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
5
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
7
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
8
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
9
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
10
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
11
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
12
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
13
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
14
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
15
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
16
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
17
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
18
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
19
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
20
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना

लंच ब्रेकच्या ‘त्या’ आदेशामुळे सामान्यांमध्ये आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:51 IST

शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लंच टाईम आता अर्ध्या तासांचाच राहणार आहे. दुपारच्या जेवणासाठी दुपारी एक ते दोनची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कार्यालयातील सर्वांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देअर्ध्या तासातच करावे लागणार भोजन : कार्यालयीन वेळेतील सामूहिक भोजनाला आळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लंच टाईम आता अर्ध्या तासांचाच राहणार आहे. दुपारच्या जेवणासाठी दुपारी एक ते दोनची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कार्यालयातील सर्वांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.आता शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या जेवणासाठी अर्ध्या तासाची वेळ निश्चित केली आहे. १८ सप्टेंबर २००१ च्या शासन परिपत्रकाद्वारे मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाºयांसाठी दुपारी एक ते दोन दरम्यान अर्ध्या तासाची जेवणाची वेळ निश्चित केली आहे. पण मंत्रालया व्यतिरिक्त इतर राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांसाठी दुपारची जेवणाची वेळ निश्चित नव्हती. त्यामुळे जनतेशी थेट संबंध असलेल्या कार्यालयात सर्वसामान्य लोक तक्रारी व गाºहाणी घेऊन येतात. तेव्हा बरेचदा अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. याबाबत संबंधित कार्यालयात विचारणा केल्यास जेवणाची वेळ असल्याचे सांगण्यात येत होेते. विविध सरकारी कार्यालयात दुपारच्या जेवणाची वेळ कार्यालयाच्या सोयीने ठरवली जाते. त्यामुळे नागरिकांचे कामे होत नाहीत. त्यामुळे कर्मचाºयांच्या जेवणाची वेळ निश्चित करण्याचा सरकारचा विचार होता, असे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात नमूद केले आहे. यामुळे मात्र नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.पालिका, पंचायतमध्येही लागू करावानगरपालिका, पंचायत समिती, महावितरण, टपाल कार्यालय, कृषी कार्यालय आदी अनेक सरकारी कार्यालयात दुपारी १ ते ३ या वेळेत अधिकारी कर्मचारी दिसत नाही. सोहब जेवायला गेले, ही नेहमीची सबब सांगितली जाते. विशेष म्हणजे, दुपारी १ ला घरी जेवायला गेलेले अनेक कर्मचारी थेट ड्युटी संपतेवेळी येतात. सर्वशासकीय कार्यालयाची हिच स्थिती आहे. त्यामुळे नव्याने काढण्यात आलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी कितपत होते, हे काही दिवसातच कळणार आहे.विभागप्रमुखांना घ्यावी लागणार दक्षतानवीन आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाºयांसाठी दुपारच्या भोजनासाठी दुपारी १ ते २ या दरम्यान अर्ध्या तासाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. दुपारच्या जेवणासाठी अधिकारी व कर्मचारी ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेणार नाही. एकाच विभाग अथवा शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी एकाच वेळेस जेवणासाठी जाणार नाही, याची कार्यालयाच्या विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे आदेश जारी केले.